कोरोना पुन्हा कहर करणार? KP.1 आणि KP.2 प्रकार किती धोकादायक

जगात पुन्हा एकदा कोरोनाच्या नव्या प्रकाराने कहर करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे अनेक देशांमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोनाचा हा नवा प्रकार भारतात देखील दाखल झाला आहे. भारतात दाखल झालेल्या कोरोनाच्या प्रकारामुळे किती धोका आहे जाणून घ्या.

कोरोना पुन्हा कहर करणार? KP.1 आणि KP.2 प्रकार किती धोकादायक
Follow us
| Updated on: May 27, 2024 | 10:30 PM

कोरोनाने कहर केल्यानंतर आता पुन्हा एकदा रुग्ण वाढू लागले आहेत. कोरोनाचा KP.1 आणि KP.2 हा नवीन प्रकार आता वेगाने वाढत आहे. त्यामुळे देशात कोरोनाची लागण झालेल्या लोकांची संख्या वाढत आहे. सरकार यावर लक्ष ठेवून आहे. या प्रकाराच्या लागणमुळे अजून गंभीर आजार किंवा मृत्यूच्या संख्येत वाढ झाल्याची पुष्टी झालेली नाही.

कोणतेही गंभीर लक्षण नाही

दिल्ली एम्सच्या कम्युनिटी मेडिसिनचे प्रोफेसर सांगतात की, कोरोना व्हायरसचे उत्परिवर्तन होत राहतात. पुढे ही नवनवीन रूपे येत राहतील. प्रकरणांमध्ये चढ-उतार होतील. पुढील 50 वर्षांपर्यंतही असे होऊ शकते. संसर्ग होण्याची तीव्रता किंवा मृत्यू दर वाढतोय की नाही यावर लक्ष ठेवावे लागेल. याची लागण झालेल्या लोकांना सामान्य सर्दी आहे. त्यापेक्षा कोणतेही गंभीर लक्षण दिसत नाहीत. त्यामुळे घाबरण्याची किंवा रणनीती बदलण्याची गरज नाही.

भारतात KP.1 आणि KP.2 व्हायरस दाखल

केवळ भारतातच नाही तर जगातील विविध देशांमध्येही कोरोनाचा रुग्ण वाढत आहे. हा नवीन प्रकार अनेक देशात पसरतो आहे. भारतात KP.1 आणि KP.2 ची 300 हून अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, KP.1 आणि KP.2 हे Omicron च्या JN.1 उप-वंशातील उत्परिवर्तनामुळे अस्तित्वात आले आहेत.

चिंता करण्याची गरज नाही

या प्रकारामुळे प्रकरणे वेगाने वाढू शकतात. परंतु, आत्तापर्यंत या दोन नवीन उत्परिवर्तनांमुळे रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या इतकी नाही की त्यामुळे चिंता वाढेल. यामुळे मृत्यूदरात ही कोणतीही मोठी वाढ झालेली नाही. या प्रकारामुळे इन्फेक्शन होत आहे पण त्यात कोणतीही तीव्रता नाही. कोरोनाच्या या नवीन स्वरूपामुळे आणि प्रकारामुळे नक्कीच चिंता वाढली आहे, परंतु आतापर्यंत त्याचे वर्तन असे नाही की तो एक समस्या बनेल. पण तरीही नजर आणि देखरेख ठेवली जात आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.