AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WITT: देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकासाचा नवा अध्याय लिहीत आहे – डॉ. रामेश्वर राव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत विकासाचा एक नवा अध्याय लिहीत आहे. पंतप्रधान मोदींच्या डिजिटल इंडियाच्या दृष्टिकोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळाली आहे, असं माय होम्स ग्रुपचे चेअरमन डॉ. रामेश्वर राव यांनी म्हटलं आहे.

WITT: देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात विकासाचा नवा अध्याय लिहीत आहे - डॉ. रामेश्वर राव
Follow us
| Updated on: Mar 28, 2025 | 7:24 PM

टिव्ही 9 नेटवर्कचा मेगा ईव्हेट असलेल्या व्हाट इंडिया थिंक्स टुडे (What India Thinks Today) या कार्यक्रमाला आज दिल्लीमध्ये सुरुवात झाली. हा दोन दिवसांचा कार्यक्रम असणार आहे. भारत मंडपममध्ये हा कार्यक्रम सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. यावेळी माय होम्स ग्रुपचे चेअरमन डॉ. रामेश्वर राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत केलं.

या कार्यक्रमात बोलताना डॉ.रामेश्वर राव यांनी म्हटलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत विकासाचा एक नवा अध्याय लिहीत आहे. पंतप्रधान मोदींच्या डिजिटल इंडियाच्या दृष्टिकोनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळाली आहे. आज संकट काळात संपूर्ण जग भारताकडे मोठ्या आशेनं पाहत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सर्वसमावेशक विकासाचं स्वप्न आणि युद्ध हा पर्यायच नसलेलं जग निर्माण करण्याचा त्यांचा संकल्प सध्याच्या परिस्थितीमध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आज आपला देश मार्गदर्शकाची भूमिका बजावत आहे, असं माय होम्स ग्रुपचे चेअरमन डॉ. रामेश्वर राव यांनी म्हटलं आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, 1.45 अब्ज लोकांच्या स्वप्नांना पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या पद्धतीनं दिशा देत आहेत. ज्या पद्धतीनं भारत जागतिक विकासाचा प्रमुख चालक बनत आहे, ते पाहून एक तरुण उद्योजक म्हणून मी खूप प्रेरित झालो आहे. जागतिक बँक आणि आयएमएफ देखील आज भारताच्या विकासाची, प्रगतिची कबुली देत आहे. मोदी सरकारने केवळ आर्थिक आघाडीवर भारताला स्थिर बनवलं नाही तर जगाला स्थिरता आणि विकासाचं एक नवं मॉडेल देखील दिलं आहे, असंही यावेळी रामेश्वर राव यांनी म्हटलं आहे.

डिजिटल इंडियाला प्रोत्साहन देण्यासाठी मोदीजी प्रयत्न करत आहेत. त्यांचे हे प्रयत्न इतक्या वेगानं यशस्वी होत आहेत की, आता काही विकसित देशही ते स्वीकारण्यासाठी उत्सुक आहेत. आपले कौशल्य वाढवण्याची हीच योग्य वेळ असल्याचंही यावेळी रामेश्वर राव यांनी म्हटलं आहे.

'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य
'तो हल्ला भयानक, पण मला खात्री...', पहलगामवर ट्रम्प यांचं मोठं वक्तव्य.
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?
दहशतवाद्यांचं काऊंटडाऊन सुरू... भारताकडून यादीच जाहीर, आता पुढे काय?.
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
VIDEO: गोळ्यांचा आवाज, आर्त किंकाळ्या.. हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू
भारत-पाक सीमेवर हायअलर्ट, रखरखत्या उन्हातही BSF कडून युद्धाभ्यास सुरू.
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी
पाकड्यांची मस्ती उतरेना...सामान्य वेषात अन् पठाणी सूटमध्ये LOC वर रेकी.
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय
छुप्या दहशतवादी कारवायांवर आता ध्रुवची नजर,'पहलगाम'नंतर आर्मीचा निर्णय.
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं..
पाकिस्तानची कोंडी अन् चीन धावल मदतीला, भारताशी दोन हात करायला पुरवलं...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्...
हल्ल्याचा कट फेब्रुवारीतच शिजला? हल्ल्याआधी अतिरेक्यांचा जलसा अन्....
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय...
'पाक'विरोधात 'वॉटर स्ट्राईक' अन् चिनाब नदी पाहताना एक माणूस म्हणतोय....
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी
'आम्ही पण...', सिंधू जल करार स्थगितीवर पाकच्या PM ची भारताला थेट धमकी.