घरातील तुळशीला अचानक वाळवणे किंवा तीच्यावर पांढरा रोग येणे हे आर्थिक संकटाचे लक्षण आहे. त्यामुळे चूक कुठे होत आहे, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. तुमची चुक वेळीस सुधारा.
विनाकारण काच वारंवार फुटत असेल तर ते आर्थिक संकटाचेही लक्षण असू शकते. तुटलेली किंवा तडकलेली काच घरात कधीही ठेवू नका. ताबडतोब बाहेर फेकून द्या. जून्या तुटलेल्या गोष्टी देखील लगेच घराबाहेर टाकाव्यात.
तुमच्या घरात वारंवार भांडणे होत असतील, लोकांचा राग येत असेल, तर तुम्ही घरातील वातावरण सुरळीत करण्याचा प्रयत्न करा. अशा घरात पैशाची नेहमीच कमतरता असते.
ज्या घरात मोठ्यांचा अपमान होतो, त्या घरात लक्ष्मी कधीही राहू शकत नाही. ज्येष्ठांचा अपमान केल्याने तुमच्या घरची स्थिती बिघडू लागते.
ज्या घरात पूजा होत नाही त्या घरात नकारात्मकता वास करते. अशा ठिकाणी देव राहत नाही. अशा ठिकाणी नेहमी गरिबी राहते.