Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo Gallery : आता उठवू सारे रान, हंडाभर पाण्यासाठी नगरच्या रणरागिणींचा एल्गार…!

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी जवळील कोऱ्हाळे गावठाण परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून नळाला पाणी नाही. त्यामुळे संतप्त महिलांनी हंडा मोर्चा काढून ग्रामपंचायतीला टाळे ठोकले.

| Updated on: Mar 24, 2022 | 4:42 PM
अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी जवळील कोऱ्हाळे गावठाण परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून नळाला पाणी येत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी हंडा मोर्चा काढत ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. दोन तास ठिय्या आंदोलन करूनही ठोस आश्वासन मिळत नसल्याने महिलांनी कार्यालयास टाळे ठोकले.

अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी जवळील कोऱ्हाळे गावठाण परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून नळाला पाणी येत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिलांनी हंडा मोर्चा काढत ग्रामपंचायत कार्यालयात ठिय्या आंदोलन केले. दोन तास ठिय्या आंदोलन करूनही ठोस आश्वासन मिळत नसल्याने महिलांनी कार्यालयास टाळे ठोकले.

1 / 7
आंदोलक महिलांना उद्या पाणी सोडू, असे लेखी आश्वासन ग्रामपंचायतीकडून देण्यात आले. मात्र, त्यानंतरही पाणी मिळत नसल्याने पुन्हा महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. सकाळपासून भर उन्हात आंदोलन करत असूनही ग्रामपंचायतीकडून दखल घेण्यात आली नाही.

आंदोलक महिलांना उद्या पाणी सोडू, असे लेखी आश्वासन ग्रामपंचायतीकडून देण्यात आले. मात्र, त्यानंतरही पाणी मिळत नसल्याने पुन्हा महिलांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. सकाळपासून भर उन्हात आंदोलन करत असूनही ग्रामपंचायतीकडून दखल घेण्यात आली नाही.

2 / 7
ग्रामपंचायतीने कर वसुलीची नोटीस काढल्याने अनेक ग्रामस्थांनी कराची रक्कम अदा केली. मात्र, तरीही ग्रामपंचायत वेगवेगळी कारणे सांगून विशिष्ट भागातील रहिवाशांना पाणी उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप करत महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली.

ग्रामपंचायतीने कर वसुलीची नोटीस काढल्याने अनेक ग्रामस्थांनी कराची रक्कम अदा केली. मात्र, तरीही ग्रामपंचायत वेगवेगळी कारणे सांगून विशिष्ट भागातील रहिवाशांना पाणी उपलब्ध करून देत नसल्याचा आरोप करत महिलांनी ग्रामपंचायतीवर हंडा मोर्चा काढला. यावेळी महिलांनी जोरदार घोषणाबाजी केली.

3 / 7
४. आश्वासन देऊनही पाळले नाही. त्यानंतर आंदोलनाची साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे महिला संतापल्या. त्यांनी कोऱ्हाळे ग्रामपंचायतीला टाळे ठोकले. मात्र, त्यात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. त्यामुळे टँकरने पाणी देण्याचे ग्रामपंचायतीने मान्य केल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.

४. आश्वासन देऊनही पाळले नाही. त्यानंतर आंदोलनाची साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे महिला संतापल्या. त्यांनी कोऱ्हाळे ग्रामपंचायतीला टाळे ठोकले. मात्र, त्यात पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी फुटली. त्यामुळे टँकरने पाणी देण्याचे ग्रामपंचायतीने मान्य केल्यानंतर महिलांनी आंदोलन मागे घेतले.

4 / 7
महाराष्ट्रात यंदा जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी पुराने हाहाकार उडवला. मात्र, पाण्याच्या नियोजनाचा अभाव असल्याने सातत्याने कुठे ना कुठे तरी पाणी टंचाईची ओरड सुरू असते. त्यात महापालिका, नगपरिषद आणि ग्रामपंचायतींचा कारभार कौतुकास्पद असतो. त्याचा फटका नागरिकांना बसतो.

महाराष्ट्रात यंदा जोरदार पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी पुराने हाहाकार उडवला. मात्र, पाण्याच्या नियोजनाचा अभाव असल्याने सातत्याने कुठे ना कुठे तरी पाणी टंचाईची ओरड सुरू असते. त्यात महापालिका, नगपरिषद आणि ग्रामपंचायतींचा कारभार कौतुकास्पद असतो. त्याचा फटका नागरिकांना बसतो.

5 / 7
सत्ता कोणत्याही पक्षाची असो निदान पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य सुविधांची दिलेली आश्वासने तरी पाळावीत, अशी मागणी यावेळी कोऱ्हाळे येथील आंदोलक महिलांनी केली. दिवसभरातील चार तास जर पाणी आणण्यात जात असतील, तर आम्ही करायचे काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

सत्ता कोणत्याही पक्षाची असो निदान पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य सुविधांची दिलेली आश्वासने तरी पाळावीत, अशी मागणी यावेळी कोऱ्हाळे येथील आंदोलक महिलांनी केली. दिवसभरातील चार तास जर पाणी आणण्यात जात असतील, तर आम्ही करायचे काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

6 / 7
अहमदनगर जिल्ह्यातील कोऱ्हाळे येथील महिला हे पाण्यासाठी भटकणारे एक प्रतिकात्मक उदाहरण म्हणता येईल. महाराष्ट्रातील अनेक खेडेगावात अजूनही पाण्याची बोंब आहे. दिवाळी संपली की, पाणी संकट सुरू होते. अनेक महापालिका हद्दीतही रोज पाणी येत नाही. हे सर्व संपणार कधी, याचे उत्तर काळच देईल.

अहमदनगर जिल्ह्यातील कोऱ्हाळे येथील महिला हे पाण्यासाठी भटकणारे एक प्रतिकात्मक उदाहरण म्हणता येईल. महाराष्ट्रातील अनेक खेडेगावात अजूनही पाण्याची बोंब आहे. दिवाळी संपली की, पाणी संकट सुरू होते. अनेक महापालिका हद्दीतही रोज पाणी येत नाही. हे सर्व संपणार कधी, याचे उत्तर काळच देईल.

7 / 7
Follow us
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.