AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेतीसाठी विहिरीचे खोदकाम करायला 50 फूट खाली गेले अन्… काही सेकंदातच…

| Updated on: Apr 08, 2025 | 9:37 PM
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात जानमपल्ली येथे आज सकाळी विहीर खोदण्याचे काम करत असताना अचानक ढिगारा कोसळला. या दुर्घटनेत दोन शेतकरी मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन आणि गावकऱ्यांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात जानमपल्ली येथे आज सकाळी विहीर खोदण्याचे काम करत असताना अचानक ढिगारा कोसळला. या दुर्घटनेत दोन शेतकरी मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन आणि गावकऱ्यांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

1 / 7
जानमपल्ली येथील 'धन्नाडा समाक्का' यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरू होते. शेतकऱ्यांनी शेतीच्या उपयोगासाठी सुमारे ५० फूट खोल विहीर खोदली होती.

जानमपल्ली येथील 'धन्नाडा समाक्का' यांच्या शेतात विहिरीचे खोदकाम सुरू होते. शेतकऱ्यांनी शेतीच्या उपयोगासाठी सुमारे ५० फूट खोल विहीर खोदली होती.

2 / 7
खालच्या भागातील माती कोसळल्याने जवळपास दहा फुटांची वाळू आणि माती खाली काम करणाऱ्या दोन मजुरांवर पडली. उप्पाला रवी आणि कोंडा समय्या (कोंडा सोमय्या) अशी या दोन मजुरांची नावे आहेत.

खालच्या भागातील माती कोसळल्याने जवळपास दहा फुटांची वाळू आणि माती खाली काम करणाऱ्या दोन मजुरांवर पडली. उप्पाला रवी आणि कोंडा समय्या (कोंडा सोमय्या) अशी या दोन मजुरांची नावे आहेत.

3 / 7
आज सकाळी सुमारे साडेदहा वाजता ही घटना घडली. ढिगारा कोसळल्याची माहिती मिळताच गावातील नागरिक तातडीने घटनास्थळी धावले. त्यांनी आपल्या परीने माती आणि वाळू काढण्याचे प्रयत्न सुरू केले.

आज सकाळी सुमारे साडेदहा वाजता ही घटना घडली. ढिगारा कोसळल्याची माहिती मिळताच गावातील नागरिक तातडीने घटनास्थळी धावले. त्यांनी आपल्या परीने माती आणि वाळू काढण्याचे प्रयत्न सुरू केले.

4 / 7
त्यानंतर पोलीस प्रशासनालाही घटनेची माहिती देण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी नाईक यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्यात सहभाग घेतला.

त्यानंतर पोलीस प्रशासनालाही घटनेची माहिती देण्यात आली. उपविभागीय पोलीस अधिकारी नाईक यांच्यासह पोलीस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचावकार्यात सहभाग घेतला.

5 / 7
सध्या घटनास्थळी ४२ अंश सेल्सियस तापमान आहे. गावातील नागरिक आणि प्रशासकीय यंत्रणा एकत्रितपणे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी माती आणि वाळू बाजूला करण्याचे काम करत आहेत.

सध्या घटनास्थळी ४२ अंश सेल्सियस तापमान आहे. गावातील नागरिक आणि प्रशासकीय यंत्रणा एकत्रितपणे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी माती आणि वाळू बाजूला करण्याचे काम करत आहेत.

6 / 7
या घटनेनंतर सुमारे आठ तास उलटून गेले असले तरी अद्याप या दोन्ही शेतकऱ्यांचा शोध लागलेला नाही. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन्ही मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला असावा, अशी भीती गावकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

या घटनेनंतर सुमारे आठ तास उलटून गेले असले तरी अद्याप या दोन्ही शेतकऱ्यांचा शोध लागलेला नाही. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या दोन्ही मजुरांचा गुदमरून मृत्यू झाला असावा, अशी भीती गावकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

7 / 7
Follow us
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.