AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Photo: रब्बी पिकांनी शिवार बहरला, पोषक वातावरणामुळे उत्पादन वाढीची अपेक्षा

नांदेड : यंदा प्रथमच रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला होता. मराठवाड्यात रब्बी हंगामात ज्वारी हे मुख्य पीक असताना यंदा हरभाऱ्याचा पेरा वाढला आहे. बदलती परस्थिती आणि पावसामुळे लांबलेल्या पेरण्या यामुळे शेतकऱ्यांनी हा बदल केला मात्र, पेरणीनंतर पीक उगवण होण्यापूर्वीच अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे रब्बी हंगामाबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. शिवाय मध्यंतरी वाढलेला गारठा यामुळे देखील पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला होता. पण आता वातावरण निवळले असून शेतकऱ्यांकडे मूबलक प्रमाणात पाणीसाठा असल्याने नांदेड जिल्हा शिवारात गहू, हरभरा, ज्वारी ही सगळीच पीके बहरू लागली आहे.

| Updated on: Feb 07, 2022 | 9:51 AM
हरभरा क्षेत्रात वाढ : पोषक वातावरणामुळे हरभरा पीक मोठ्या जोमात बहरलेले आहे. मध्यंतरी निसर्गाच्या लहरीपणामुळे या पिकावरही किडीचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र, वातावरण निवळताच शेतकऱ्यांनी फवारणी करुन पाणी दिल्याने आता हे पीकही बहरू लागले आहे. सध्याचे वातावरण हे पीक वाढीसाठी उत्तम आहे. शिवाय शेतकऱ्यांकडे पाणीसाठाही मुबलक प्रमाणात असल्याने चिंता नाही. त्यामुळे खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्याची ही संधी असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.

हरभरा क्षेत्रात वाढ : पोषक वातावरणामुळे हरभरा पीक मोठ्या जोमात बहरलेले आहे. मध्यंतरी निसर्गाच्या लहरीपणामुळे या पिकावरही किडीचा प्रादुर्भाव झाला होता. मात्र, वातावरण निवळताच शेतकऱ्यांनी फवारणी करुन पाणी दिल्याने आता हे पीकही बहरू लागले आहे. सध्याचे वातावरण हे पीक वाढीसाठी उत्तम आहे. शिवाय शेतकऱ्यांकडे पाणीसाठाही मुबलक प्रमाणात असल्याने चिंता नाही. त्यामुळे खरिपात झालेले नुकसान भरुन काढण्याची ही संधी असल्याचे कृषितज्ञ रामेश्वर चांडक यांनी सांगितले आहे.

1 / 5
नांदेड : नैसर्गिक संकटाची शर्यत पार करीत अखेर रब्बी हंगामातील पिके बहरली आहेत. हंगामाच्या सुरवातीपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे गहू, हरभरा, ज्वारी ही पिके धोक्यात होती. यंदा वाढीव उत्पादनाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला होता. आता वातारवण पोषक असल्याने उत्पादनात वाढ होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे. हंगामी पीक म्हणून कोथिंबरची लागवडही शेतकऱ्यांनी केली असून दर वाढीमुळे याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

नांदेड : नैसर्गिक संकटाची शर्यत पार करीत अखेर रब्बी हंगामातील पिके बहरली आहेत. हंगामाच्या सुरवातीपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे गहू, हरभरा, ज्वारी ही पिके धोक्यात होती. यंदा वाढीव उत्पादनाच्या अपेक्षेने शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला होता. आता वातारवण पोषक असल्याने उत्पादनात वाढ होईल असा आशावाद व्यक्त केला जात आहे. हंगामी पीक म्हणून कोथिंबरची लागवडही शेतकऱ्यांनी केली असून दर वाढीमुळे याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.

2 / 5
 शेती मशागतीचे कामे जोमात : मध्यंतरी अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे शेती कामे करण्याची संधीच शेतकऱ्यांना मिळाली नाही. सध्या वातावरण निवळले आहे. शिवाय सकाळी गारवा आणि दिवसभर ऊन यामुळे रब्बी हंगामातील पिकांची वाढ जोमात होत आहे. मोहरी क्षेत्रामध्ये यंदा प्रथमच वाढ झाली असून या कडधान्यातून उत्पादन पदरी पडेल असा आशावाद आहे.

शेती मशागतीचे कामे जोमात : मध्यंतरी अवकाळी पाऊस आणि वातावरणातील बदलामुळे शेती कामे करण्याची संधीच शेतकऱ्यांना मिळाली नाही. सध्या वातावरण निवळले आहे. शिवाय सकाळी गारवा आणि दिवसभर ऊन यामुळे रब्बी हंगामातील पिकांची वाढ जोमात होत आहे. मोहरी क्षेत्रामध्ये यंदा प्रथमच वाढ झाली असून या कडधान्यातून उत्पादन पदरी पडेल असा आशावाद आहे.

3 / 5
यवतमाळ जिल्ह्यामध्ये यंदा प्रथमच उन्हाळी ज्वारीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

यवतमाळ जिल्ह्यामध्ये यंदा प्रथमच उन्हाळी ज्वारीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे.

4 / 5
रानभाज्या : रब्बी हंगामात केवळ उत्पादनावरच भर दिला जात नाही तर वातावरणामुळे रानभाज्याचे उत्पादनही घेतले जात आहे. विक्रीसाठी नाही पण किमान घरगुती वापरासाठी म्हणून शेतकरी याची लागवड करतात. मुख्य पिकांबरोबर रानभाज्यानेही शिवार बहरलेले आहे. यंदा पोषक वातावरणामुळे खरिपापेक्षा रब्बी हंगामातच शिवार नंदनवन झाल्याचे चित्र आहे.

रानभाज्या : रब्बी हंगामात केवळ उत्पादनावरच भर दिला जात नाही तर वातावरणामुळे रानभाज्याचे उत्पादनही घेतले जात आहे. विक्रीसाठी नाही पण किमान घरगुती वापरासाठी म्हणून शेतकरी याची लागवड करतात. मुख्य पिकांबरोबर रानभाज्यानेही शिवार बहरलेले आहे. यंदा पोषक वातावरणामुळे खरिपापेक्षा रब्बी हंगामातच शिवार नंदनवन झाल्याचे चित्र आहे.

5 / 5
Follow us
कांदा उत्पादनाला अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांवर आर्थिक संकट
कांदा उत्पादनाला अवकाळीचा फटका; शेतकऱ्यांवर आर्थिक संकट.
हिंदीची सक्ती नाही, मग तसा जीआर काढा; सुभाष देसाई यांची मागणी
हिंदीची सक्ती नाही, मग तसा जीआर काढा; सुभाष देसाई यांची मागणी.
पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती
पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक, अधिकारी मारले; लेफ्टनंट जनरल घईंची माहिती.
पाकिस्तानी ऑफिशियल भिखमंगे; ओवेसींनी पुन्हा पाकिस्तानची लक्तरं काढली
पाकिस्तानी ऑफिशियल भिखमंगे; ओवेसींनी पुन्हा पाकिस्तानची लक्तरं काढली.
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.