AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs NZ : विराट कोहलीला तिसरं स्थान पुन्हा ठरतंय अनलकी! आठ वर्षानंतर तसंच घडलं

न्यूझीलंडच्या गोलंदाजीसमोर भारतीय गोलंदाजी एकदम पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. एकही फलंदाज धड कामगिरी करू शकला नाही. विराट कोहलीसह पाच फलंदाजांना तर आपलं खातंही खोलता आलं नाही. न्यूझीलंडविरुद्ध भोपळाही फोडू न शकलेल्या विराट कोहलीच्या नावावर नकोसा विक्रम प्रस्थापित झाला आहे.

| Updated on: Oct 17, 2024 | 3:17 PM
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावल्याचं दिसत आहे. कारण पहिल्या डावात भारताचा संपूर्ण संघ फक्त 46 धावांवर बाद झाला आहे. या डावात भारताच्या पाच फलंदाजांना आपलं खातंही खोलता आलं नाही. विराट कोहलीकडून फार अपेक्षा होत्या. पण अपेक्षाभंग झाला.

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत टीम इंडियावर पराभवाची नामुष्की ओढावल्याचं दिसत आहे. कारण पहिल्या डावात भारताचा संपूर्ण संघ फक्त 46 धावांवर बाद झाला आहे. या डावात भारताच्या पाच फलंदाजांना आपलं खातंही खोलता आलं नाही. विराट कोहलीकडून फार अपेक्षा होत्या. पण अपेक्षाभंग झाला.

1 / 6
विराट कोहली आठ वर्षानंतर तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरला होता. शुबमन गिल या कसोटीत नसल्याने विराट कोहली तिसऱ्या स्थानावर उतरला होता. तसेच सरफराज खानला चौथ्या स्थानावर पसंती दिली गेली.

विराट कोहली आठ वर्षानंतर तिसऱ्या स्थानावर फलंदाजीसाठी उतरला होता. शुबमन गिल या कसोटीत नसल्याने विराट कोहली तिसऱ्या स्थानावर उतरला होता. तसेच सरफराज खानला चौथ्या स्थानावर पसंती दिली गेली.

2 / 6
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली फलंदाजीसाठी उतरला. पण 9 चेंडूंचा सामना करत खातंही न खोलता तंबूत परतला. विलिय ओराउरकेच्या गोलंदाजीवर विकेट देऊन बसला. उसळी घेतलेला चेंडू कोहलीच्या ग्लव्ह्जला लागला आणि गलीला क्षेत्ररक्षण करणाऱ्या ग्लेन फिलिप्सच्या हाती गेला.

रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली फलंदाजीसाठी उतरला. पण 9 चेंडूंचा सामना करत खातंही न खोलता तंबूत परतला. विलिय ओराउरकेच्या गोलंदाजीवर विकेट देऊन बसला. उसळी घेतलेला चेंडू कोहलीच्या ग्लव्ह्जला लागला आणि गलीला क्षेत्ररक्षण करणाऱ्या ग्लेन फिलिप्सच्या हाती गेला.

3 / 6
विराट कोहली यापूर्वी 2016 मध्ये तिसर्‍या स्थानावर फलंदाजीला उतरला होता. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याला दुहेरी आकडाही गाठता आला नव्हता. तेव्हा त्याने पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 4 धावा केल्या होत्या.

विराट कोहली यापूर्वी 2016 मध्ये तिसर्‍या स्थानावर फलंदाजीला उतरला होता. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याला दुहेरी आकडाही गाठता आला नव्हता. तेव्हा त्याने पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 4 धावा केल्या होत्या.

4 / 6
2016 पूर्वीही विराट कोहली तीन कसोटी सामन्यात तिसऱ्या स्थानावर उतरला होता. तेव्हा त्याला अर्धशतकी खेळीही करता आली नाही. 2012 मध्ये तिसऱ्या स्थानावर उतरला होता. तेव्हा इंग्लंडविरुद्ध 13 धावांची नाबाद खेळी केली होती.

2016 पूर्वीही विराट कोहली तीन कसोटी सामन्यात तिसऱ्या स्थानावर उतरला होता. तेव्हा त्याला अर्धशतकी खेळीही करता आली नाही. 2012 मध्ये तिसऱ्या स्थानावर उतरला होता. तेव्हा इंग्लंडविरुद्ध 13 धावांची नाबाद खेळी केली होती.

5 / 6
2013 मध्ये मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 34 धावा केल्या होत्या. 2013 मध्ये दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजीसाठी उतरला तेव्हा पहिल्या डावात 1 आणि दुसऱ्या डावात 41 धावांची खेळी केली होती.

2013 मध्ये मोहालीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 34 धावा केल्या होत्या. 2013 मध्ये दिल्लीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध फलंदाजीसाठी उतरला तेव्हा पहिल्या डावात 1 आणि दुसऱ्या डावात 41 धावांची खेळी केली होती.

6 / 6
Follow us
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.