Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

New Delhi : मंत्रीपद मिळवून देण्यासाठी 100 कोटींची मागणी! राहुल कुल आणि जयकुमार गोरेंची फसवणूक करण्याचा प्रयत्न

हा सर्व प्रकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर मी घातला. कारण यापूर्वीदेखील असे प्रकार झाले होते. त्यामुळे असे प्रकार होणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचना मुंबईच्या आयुक्तांना दिल्या.

New Delhi : मंत्रीपद मिळवून देण्यासाठी 100 कोटींची मागणी! राहुल कुल आणि जयकुमार गोरेंची फसवणूक करण्याचा प्रयत्न
राहुल कुल/जयकुमार गोरेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 20, 2022 | 2:57 PM

नवी दिल्ली : नवीन मंत्रिमंडळात मंत्रीपद मिळवून देण्यासाठी 100 कोटींची मागणी करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) याप्रकरणी चौघांना अटक केली आहे. आमदार राहुल कुल यांना आमिष दाखवून फसवणूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ठाण्यातील दोघांचा यामध्ये समावेश आहे. सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. मुंबईच्या ओबेरॉय हॉटेलमध्ये हा सापळा लावण्यात आला होता. कारवाईवेळी आमदार राहुल कुल यांच्यासोबत जयकुमार गोरेदेखील (Jaykumar Gore) उपस्थित होते. याप्रकरणी राहुल कुल म्हणाले, की मला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. मी त्याला ओळखत नव्हतो. मंत्रीपद मिळवून देण्यासाठी काहीतरी करू शकतो, असे ती व्यक्ती म्हणाल्याचे राहुल कुल (Rahul Kul) यांनी सांगितले. दरम्यान, जयकुमार गोरे आणि राहुल कुल सध्या नवी दिल्लीत आहेत.

‘आकडा आमच्या कल्पनेबाहेरचा’

हा सर्व प्रकार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर मी घातला. कारण यापूर्वीदेखील असे प्रकार झाले होते. त्यामुळे असे प्रकार होणार नाहीत, याची काळजी घेण्याच्या सूचना मुंबईच्या आयुक्तांना दिल्या. त्यांनी क्राइमचे जॉइन्ट सीपी यांना सांगितले. जो आकडा त्या व्यक्तीने सांगितला होता, तो सर्वांच्या कल्पनेच्या पलिकडचा होता. मात्र अशाप्रकारे फसवणूक होत असल्याचे माझ्या प्रथमदर्शनी लक्षात आले. आपल्यासारख्यांनी अशा फसवणुकीला बळी पडू नये, म्हणून पुढे आले पाहिजे यादृष्टीनेच आम्ही ही सर्व प्रक्रिया केली आहे, असे राहुल कुल म्हणाले.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले राहुल कुल?

‘आम्ही अडकण्याचा प्रश्नच नव्हता’

जयकुमार गोरे म्हणाले, की आम्ही अडकण्याचा प्रश्नच नव्हता. कारण आम्हाला काही अपेक्षाच नव्हती. पहिल्या फोनपासून आम्ही दोघे सोबत होतो. त्यावेळेसच आम्हाला कळाले होते, की हा फेक माणूस आहे. त्यामुळे आमची कोणतीही फसवणूक झालेली नाही. आम्ही कोणत्या आमिषाला बळीदेखील पडलेलो नाहीत. मात्र अशा प्रवृत्तींना अटकाव झाला पाहिजे, म्हणूनच पोलीस कारवाई झाली. आता पुढील चौकशी पोलीस करतील, असे जयकुमार गोरे यांनी सांगितले. दरम्यान, चौघांना अटक करण्यात आली आहे, त्यातील दोघे ठाण्यातील आहेत.

काय म्हणाले जयकुमार गोरे?

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.