AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादा यांच्या गटातील एका मंत्र्याने दिला राजीनामा, रोहीत पवार यांचा गौप्यस्फोट

राज ठाकरे यांनी दिल्लीवारी केली आहे. यावर राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहीत पवार यांनी प्रतिक्रीया दिली आहे. राज ठाकरे यांनी ईडी कारवाईला घाबरून जर भूमिका बदलली असेल तर ते चुकीचे आहे. त्यांनी महाशक्तीच्या विरोधात महाराष्ट्रासाठी लढण्याची गरज असल्याचे रोहीत पवार यांनी म्हटले आहे.

अजितदादा यांच्या गटातील एका मंत्र्याने दिला राजीनामा, रोहीत पवार यांचा गौप्यस्फोट
rohit pawarImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: Mar 18, 2024 | 8:52 PM

मुंबई | 18 मार्च 2024 : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे दिल्लीला रवाना झाल्याने महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडाली आहे. राज ठाकरे यांच्या सोबत त्यांचे पुत्र अमित ठाकरे देखील आहेत. राज ठाकरे यांची गेल्या काही दिवसातील ही दुसरी वारी असल्याचे म्हटले जात आहे. मनसेची महायुतीत त्यामुळे एण्ट्री होणार का असा सवाल केला जात आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहीत पवार यांनी आपली प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. आज महाराष्ट्राच्या हितासाठी सामान्य लोकांच्या हीतासाठी या महाशक्तीविरोधात लढणाऱ्या व्यक्तीची गरज असताना राज ठाकरे यांनी भाजपात जाऊ नये अशी मागणीही रोहीत पवार यांनी केली आहे. तसेच अजितदादा गटातील एका मंत्र्याने राजीनामा दिल्याचा गौप्यस्फोटही रोहीत पवार यांनी केला आहे.

रोहीत पवार पुढे म्हणाले की राज ठाकरे यांच्या भाषणाचा आपणही चाहते आहोत. त्यांनी केंद्राविरोधात लढण्यासाठी महाराष्ट्राच्या हीतासाठी महाविकास आघाडीत यायला हवे. साल 2019 मध्ये भाजपाने छोट्या पक्षांना फाट्यावर मारले होते. मात्र आता पक्ष फोडूनही या दोन्ही पक्षांचा काही उपयोग नसल्याचे त्यांच्या ध्यानात आले आहे. म्हणून त्यांनी छोट्या पक्षांना भाव देण्याचे धोरण आरंभले असल्याचे पवार यांनी म्हटले आहे. अजितदादा गटातील एका मंत्र्याने एक-दीड महिन्यांपूर्वीच राजीनामा दिला आहे. कृषी खात्याशी संबंधित हा मंत्री आहे. शेतक-यांच्या कुठल्याही प्रश्नावर सध्या चर्चा होत नाही, त्यामुळे कंटाळून त्याने राजीनामा दिला आहे. शेतकरी सध्या वाऱ्यावर आहेत. अजितदादा गटातील अनेक आमदार भाजपात जाणार आहेत आणि उरलेले आमच्याकडे येणार असल्याचा दावाही रोहीत पवार यांनी केला आहे.

नाशिकची जागा आम्हाला मिळावी

नाशिकची जागा आम्हाला मिळावी अशी आमची मागणी आहे. मात्र सध्या यावर चर्चा सुरू आहे. आम्ही जास्त जागा लढू शकतो. मात्र आघाडीत चर्चा करून निर्णय घ्यावा लागतो, त्यामुळे नाशिकच्या जागांवर लवकरच निर्णय होईल असे रोहीत पवार यांनी म्हटले आहे. रोहीत पवार यांच्या बारामती एग्रो कंपनीने खरेदी केलेल्या कारखान्याची ईडीने मोठी कारवाई केली आहे.

पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक
पहलगाम हल्ल्यात केंद्रीय सरकारने मान्य केली चूक.
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?
पाणी रोखल्यानं पाकची तडफड का? सिंधू पाणी करार स्थगित, नेमकं काय होणार?.
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर
काश्मीरातून रुपाली ठोंबरे पुण्यात,अंधारेंनी मारली मिठी अन् अश्रू अनावर.
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?
भारताकडून पाकची कोंडी, तब्बल 20 देशांना..आता पाकिस्तान 'चेकमेट' होणार?.
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'
पाकसोबतचा सिंधू पाणी करार स्थगित, मोदींचा पाकवर 'कायदेशीर स्ट्राईक'.
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?
पहलगाम हल्ल्यानंतर देश हळहळला, आता BSF जवान पाकिस्तानात गेला, घडल काय?.
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय
पाकच्या उलट्या बोंबा... भारताविरोधात पाकिस्तानं घेतले 'हे' मोठे निर्णय.
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल
तर रक्ताचे पाट वाहतील, भारताच्या निर्णयानंतर सईदचा तो व्हिडिओ व्हायरल.
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान
'जे कधीही विमानात बसले नाही, त्यांना..' नरेश म्हस्केंचं वादग्रस्त वधान.
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?
दिल्लीच्या पाकिस्तानी उच्चायुक्तालयात केक? पहलगाम हल्ल्याचं दुःख नाही?.