Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गद्दार सरकार आल्यावरच एक इंजिन फेल का गेलं?; आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

या सरकारवर कुणाचाही विश्वास नाही. तुमचाही नाही. माझाही नाही. उद्योजकांचाही नाही. राज्यात अस्थिरता आली आहे. त्यामुळे कुणी गुंतवणूक करत नाही.

गद्दार सरकार आल्यावरच एक इंजिन फेल का गेलं?; आदित्य ठाकरे यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल
आदित्य ठाकरेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 28, 2022 | 12:54 PM

मुंबई: राज्याचा आणखी एक प्रकल्प गुजरातमध्ये गेला आहे. त्यावरून माजी मंत्री आदित्य ठाकरे (aaditya thackeray) यांनी थेट शिंदे सरकारवर हल्ला चढवला आहे. महाराष्ट्राने (maharashtra) पहिल्यांदा 80 हजार कोटी गुंतवणूक आपल्या राज्यात आणण्यासाठी करार केले होते. केंद्र सरकार हेच होतं. राज्य सरकार महाविकास आघाडीचं (mahavikas aghadi) होतं. तरीही डबल इंजिन सुरू होतं. मग हे गद्दार सरकार आल्यावर एक इंजिन फेल का गेलं? आमचं केंद्रा सोबत चांगलं चाललं होतं, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आदित्य ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा घणाघाती हल्ला चढवला आहे.

आपले मुख्यमंत्री मंडळं, दहीहंडी, राजकीय भेटी, फोडोफोडी हेच करत आहेत. हे सोडून मुख्यमंत्री कोणत्याही राज्यात गेले नाही. शिवराज सिंह चौहान आपल्या राज्यात आले. नवीन पटनायक आपल्या राज्यात आले. त्यांनी इकडच्या उद्योजकांशी चर्चा केली. तसंच मला गेल्या तीन महिन्यात आपल्या मुख्यमंत्र्यांनी इतर राज्यात जाऊन एखाद्या उद्योजकांशी चर्चा केल्याचं एक उदाहरण दाखवा. त्यांनी काहीच केलं नाही, असं आव्हानच आदित्य ठाकरे यांनी दिले आहे.

हे सुद्धा वाचा

आपल्या राज्यातील उद्योगही निघून जात आहे. या खोके सरकारवर कोणत्याही उद्योजकांचा विश्वास नाही. त्यामुळे प्रत्येक उद्योग आपल्या राज्यात येणार होता, तो येत नाही. गुंतवणूक आपल्या राज्यात येणार होती. ती इतर राज्यात जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

या सरकारवर कुणाचाही विश्वास नाही. तुमचाही नाही. माझाही नाही. उद्योजकांचाही नाही. राज्यात अस्थिरता आली आहे. त्यामुळे कुणी गुंतवणूक करत नाही. निवडणुकीला सामोरे जायला जो माणूस तयार नाही. ज्याच्यात हिंमत नाही. तो गुंतवणूक काय आणू शकतो?; असा सवाल त्यांनी केला.

कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख पप्पू असा केला. त्यावर आदित्य यांनी टीका केली आहे. मी त्यांच्याबरोबर बसत नाही. जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी जे विचारलं ते कदाचित करत नाही. त्यामुळे त्यांना वाईट वाटत असेल. काल खाती वाटप झालं. उद्योगमंत्र्याने शेतीबद्दल ट्विट केलं आहे. कृष मंत्र्यांनी एक्साईजच्या विषयाला हात घातला आहे. कृषी मंत्री कोण आहे हे शेतकऱ्यांना माहीत नाही. उद्योजकांना उद्योग मंत्री कोण आहेत हे माहीत नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्र नेमका चाललाय कुठं? अशी शेरेबाजी त्यांनी केली.

त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.