अजित पवार यांच्यावरील गुन्हा मागे का घेतला? अमित शाह यांचा खुलासा काय?

अमित शाह यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर सविस्तर भूमिका मांडली. "पंतप्रधान नरेंद्र मोदी जूनमध्ये पंतप्रधान होतील. तसेच 2029 मध्येही मोदी नेतृत्व करतील", असं मोठं वक्तव्य अमित शाह यांनी केलं.

अजित पवार यांच्यावरील गुन्हा मागे का घेतला? अमित शाह यांचा खुलासा काय?
अमित शाह आणि अजित पवार यांचा फोटो
Follow us
| Updated on: May 27, 2024 | 7:45 PM

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या पाच वर्षात प्रचंड घडामोडी घडल्या आहेत. या घडामोडींवरुन विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला जातोय. तर दुसरीकडे महाराष्ट्रातील दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या मनातही राजकारणाबाबत वेगवेगळ्या प्रकारचं मतं निर्माण झाली आहेत. आता आगामी लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जनसामान्य कुणाला मतदान करतात ते आगामी काळात स्पष्ट होईलच. पण त्याआधी अमित शाह यांनी महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर आपली भूमिका मांडली आहे.

“आम्हाला 2019 मध्ये महाराष्ट्रात विधानसभेला बहुमत मिळालं. पण उद्धव ठाकरेंना शरद पवार यांनी त्यांच्यासोबत सहभागी करुन घेतलं. आम्ही युती म्हणून निवडणूक लढवली होती”, असं अमित शाह म्हणाले आहेत. “भ्रष्टाचार करणाऱ्या नेते मंडळींवर कारवाई होणारच”, असंदेखील अमित शाह म्हणाले आहेत. अमित शाह यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडींवर सविस्तर भूमिका मांडली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी जूनमध्ये पंतप्रधान होतील. तसेच 2029 मध्येही मोदी नेतृत्व करतील”, असं मोठं वक्तव्य अमित शाह यांनी केलं.

अमित शाह नेमकं काय-काय म्हणाले?

“विधानसभेला आम्हाला बहुमत मिळालं. पण शरद पवारांनी आमचे मित्र उद्धव ठाकरे यांना त्यांच्यासोबत सामील करुन घेतलं. ठाकरे आमचे मित्र होते. आम्ही युती म्हणून निवडणूक लढवली होती. तेव्हा कुणी त्यांना नैतिक आणि नीतीमत्तेचे प्रश्न विचारले नाहीत”, असं अमित शाह म्हणाले.

अजित पवार यांच्यावरील गुन्हा मागे का घेतला?

अजित पवार यांच्यावर गुन्हा दाखल, पण नंतर मागे का घेतला? असा प्रश्न अमित शाह यांना विचारण्यात आला. त्यावर शाह यांनी सविस्तर भूमिका मांडली. “एक गुन्हा दाखल झाला की 4 ते 5 गुन्हे दाखल होतात. एक भ्रष्टाचाराचा, एक सत्तेचा गैरवापर केल्याचा, एक प्रशासकीय त्रुटींवर आणि एक पुराव्याशी छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल होतो. मुख्य प्रकरणात चारही प्रकरणं गुंफली जातात. मुख्य आरोपपत्राबद्दल कुणी बोलत नाही. पण चार प्रकरणं बंद झाल्याचा मुद्दा उपस्थित करतात. भाजपमध्ये सामील झालेल्या नेत्यांवरील प्रत्येक प्रकरणात योग्य प्रक्रियेचे पालन केले जाणार”, अशी प्रतिक्रिया अमित शाह यांनी दिली.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.