Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात, पण आता…; मंत्रिमंडळ विस्ताराला होत असलेल्या विलंबावर बच्चू कडू यांची नाराजी

Bacchu Kadu News : अजित पवार यांना युतीत घेताना प्रहारला विश्वासात घ्यायला पाहिजे होतं; बच्चू कडू यांनी खंत बोलून दाखवली...

प्रत्येक गोष्टीला काही मर्यादा असतात, पण आता...; मंत्रिमंडळ विस्ताराला होत असलेल्या विलंबावर बच्चू कडू यांची नाराजी
Follow us
| Updated on: Jul 06, 2023 | 3:34 PM

अमरावती : अजित पवार हे महायुतीत सहभागी झाले आहेत. त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे शिवसेनेत नाराजी असल्याचं बोललं जात आहे. प्रहारचे नेते आमदार बच्चू कडू यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली आहे.

मी मंत्रिपदासाठी थोडी बोलत आहे. एकंदरीत या व्यवस्थेमध्ये कोण कसं अडचणीत येत आहे. ते मी सांगत आहे. शेवटी काही मर्यादा असतात. किती वेळ थांबायचं, किती वेळ सहन करायचं याच्याही काही मर्यादा आहेत. जर मर्यादा तुटल्या तर कोणीच कुणाच नसतं, असं म्हणत बच्चू कडू यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

मी जे काही करेल ते मीडियाला सांगून करणार नाही. आतमधून सर्व शिजू द्यावं लागतं.व्यवस्थित पाहू आणि मग योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ. मग तुम्हाला माहित पडेल की मी काय करू शकतो, असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीवर टीका करत अनेक आमदार शिवसेनेमधून बाहेर पडले होते. आता विचारात न घेता राष्ट्रवादीला सत्तेत घेतलं याचा परिणाम शिंदे गटातील 40 आमदारांवर होणार आहे. त्या चाळीस लोकांनी मतदारांना आता काय उत्तर द्यायचं?, असं म्हणत बच्चू कडू यांनी शिवसेमा आमदार आणि त्यांच्या समर्थकांची होणारी अडचण बोलून दाखवली.

पहिल्याला मारायचा आणि दुसऱ्याला हाती घ्यायचं. दुसऱ्याला मारायचा तिसऱ्याला हाती घ्यायचं. ही जी काही भूमिका आहे हे थांबलं पाहिजे, असं म्हणत बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

भाजपसोबत जाऊन चुकी झाल्याचं म्हणून काय फायदा आहे. एकदा चुकलेल्या माणसाला दुरुस्त करता येतं चूक वाटून घेण्यात काही अर्थ नसतो. आता दुरुस्त करावं लागेल जेव्हा वेळ येईल तेव्हा दुरुस्त करू, असं बच्चू कडू म्हणालेत.

काहींना वाटत असेल की आपला पक्ष मोठा होईल पण ते गोत्यात जाणार आहेत, असं म्हणत बच्चू कडू यांनी भाजपला टोला लगावला आहे.

आपला पक्ष वाढत असताना दुसऱ्याचे मरण होऊ नये याची काळजी सगळ्यांनी घेतली पाहिजे. एवढा मोठा निर्णय घेत असताना आमचा प्रहार पक्ष आहे. आम्हाला सुद्धा विचारात घ्यायला पाहिजे होतं, असं म्हणत बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सुनीता विल्यम्स 'ग्रह'वापसी, बघा अवकाशातून पृथ्वीवर परण्याचा प्रवास
सुनीता विल्यम्स 'ग्रह'वापसी, बघा अवकाशातून पृथ्वीवर परण्याचा प्रवास.
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल
संभाजीनगरचे जिल्हाधिकारी औरंगजेबच्या कबरीजवळ दाखल.
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका
ते काही आक्रमक झाले नाही, भेदरले होते; ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर टीका.
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला
अमरावतीत पोलीस अलर्ट मोडवर; संवेदनशील भागात बंदोबस्त वाढवला.
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य
'...मोदींकडे मागणी करा', कबरीच्या वादावर ठाकरेंचं पहिल्यांदाच भाष्य.
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार
डिसीपी निकेतन कदम यांनी सांगितला नागपूरचा थरार.
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल
'अबू आझमी उद्धव ठाकरेंचा कोण लागतो?', भाजपच्या नेत्याचा आक्रमक सवाल.
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान
मुख्यमंत्र्यांचा मी लाडका आहे, ते मला काय बोलतील? नितेश राणेंचं विधान.
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?
नागपुरच्या राड्यात 33 पोलिसांसह 4 DCP जखमी, हिंसेला सुरूवात कुठून ?.
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख
नागपूरच्या राड्यानंतर मुख्यमंत्र्यांनी केला 'छावा' चित्रपटाचा उल्लेख.