Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मराठा आरक्षण कायदा फुलप्रुफ होता तर सर्वोच्च न्यायालयात टिकला का नाही?; अशोक चव्हाणांचा फडणवीसांना सवाल

मराठा आरक्षण कायदा इतका फुलप्रुफ होता तर सर्वोच्च न्यायालयात टिकला का नाही?, असा सवाल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला. (Ashok Chavan slams devendra fadnavis on maratha reservation)

मराठा आरक्षण कायदा फुलप्रुफ होता तर सर्वोच्च न्यायालयात टिकला का नाही?; अशोक चव्हाणांचा फडणवीसांना सवाल
काँग्रेस नेते अशोक चव्हाण
Follow us
| Updated on: Dec 15, 2020 | 5:51 PM

मुंबई: मराठा आरक्षण कायदा फुलप्रुफ आहे. या कायद्याला कोणताही अडथळा येणार नाही, असं तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत होते. हा कायदा इतका फुलप्रुफ होता तर सर्वोच्च न्यायालयात टिकला का नाही?, असा सवाल राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी फडणवीस यांना केला. (Ashok Chavan slams devendra fadnavis on maratha reservation)

विधानसभेत पुरवणी मागण्यांवर सुरू असलेल्या चर्चेत भाग घेताना अशोक चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांना हा सवाल केला. फडणवीस यांनी मराठा आरक्षणासाठी फुलप्रुफ कायदा आणू म्हणून सांगितलं होतं. या कायद्यामुळे काहीच अडचण येणार नसल्याचा दावाही त्यांनी केला होता. तुमचा कायदा एवढाच फुलप्रुफ होता तर सर्वोच्च न्यायालयात तो टिकला का नाही? असा सवाल करतानाच आम्ही तर तुम्ही आणलेला आरक्षण कायदा मान्य केला. त्यावर चर्चाही केली नाही आणि आक्षेपही घेतला नव्हता, असं चव्हाण म्हणाले.

मराठा आरक्षणाचा सोक्षमोक्ष लावणार

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी तत्कालीन फडणवीस सरकारने नेमलेलेच वकील सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहेत. एकूण नऊ ते दहा निष्णांत वकील हा खटला लढवत आहेत. पण काही ना काही मुद्द्यांवर विषय अडत आहे. पण आम्हीही कोणत्याही परिस्थितीत मागे हटणार नाही. आता या प्रकरणावर कोर्टात दररोज सुनावणी होणार असून या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.

मराठा आरक्षणावरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न

सरकार कुणाचं आहे हे महत्त्वाचं नाही. आपण सर्वांनी मिळून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी कंबर कसली पाहिजे. आजच्या परिस्थितीत काय केलं पाहिजे याचा सर्वांनीच विचार केला पाहिजे, असं सांगतानाच काही लोक मात्र गोबेल्स नीती वापरून मराठा आरक्षणावरून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

ओबीसींचं आरक्षण कायम राहील

यावेळी त्यांनी ओबीसींचं आरक्षण कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं. ओबीसी आरक्षणाबाबत काही वेगळा विचार नाही. या आरक्षणात काही फरक पडणार नाही. पण काही लोक ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. विधानपरिषदेच्या निकालानंतर खासकरून मराठा विरुद्ध ओबीसी असं वातावरण निर्माण केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. (Ashok Chavan slams devendra fadnavis on maratha reservation)

संबंधित बातम्या:

मराठा तरुणांसाठी टोकाचा संघर्ष करू, आझाद मैदानात फडणवीसांचा एल्गार

LIVE UPDATES : आ बैल मुझे मार अशी सरकारची सुप्रीम कोर्टातील भूमिका : देवेंद्र फडणवीस

(Ashok Chavan slams devendra fadnavis on maratha reservation)

'मुंडेंनाच कराड नको', म्हणणाऱ्या निलंबित PSI वर अ‍ॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा
'मुंडेंनाच कराड नको', म्हणणाऱ्या निलंबित PSI वर अ‍ॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा.
भिडे गुरुजींना कुत्र्याचा कडकडून चावा; काय आहे प्रकृतीचे अपडेट?
भिडे गुरुजींना कुत्र्याचा कडकडून चावा; काय आहे प्रकृतीचे अपडेट?.
'छावा फिल्म वाईट अन्..', 'छावा'तल्या अभिनेत्याचा काही दृश्यांवर आक्षेप
'छावा फिल्म वाईट अन्..', 'छावा'तल्या अभिनेत्याचा काही दृश्यांवर आक्षेप.
संभाजी भिडेंना कुत्रं चावल्यावर सांगली पालिका अ‍ॅक्शन मोडवर
संभाजी भिडेंना कुत्रं चावल्यावर सांगली पालिका अ‍ॅक्शन मोडवर.
धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको झालेत; कासले यांचा गंभीर आरोप
धनंजय मुंडेंनाच वाल्मिक कराड नको झालेत; कासले यांचा गंभीर आरोप.
'मी राक्षेला चितपट केलं, मी खरा...', 'महाराष्ट्र केसरी'चं मोठं वक्तव्य
'मी राक्षेला चितपट केलं, मी खरा...', 'महाराष्ट्र केसरी'चं मोठं वक्तव्य.
मुंबईकरांनो 'म.रे'वरून प्रवास करताय? तुमचा प्रवास होणार 'कूल'
मुंबईकरांनो 'म.रे'वरून प्रवास करताय? तुमचा प्रवास होणार 'कूल'.
शिंदे - शाहांच्या भेटीबद्दल राऊतांचा गौप्यस्फोट
शिंदे - शाहांच्या भेटीबद्दल राऊतांचा गौप्यस्फोट.
गाडीच्या डिक्कीतून निघाला हात बाहेर... नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल
गाडीच्या डिक्कीतून निघाला हात बाहेर... नेमकं काय घडलं? व्हिडीओ व्हायरल.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 27 खून; राऊतांचा गंभीर आरोप
सिंधुदुर्ग जिल्ह्यात 27 खून; राऊतांचा गंभीर आरोप.