Assembly Election 2023 | काँग्रेसने विधासभेतील पराभवाचे खापर कोणावर फोडले?

Assembly Election 2023 | राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा पराभव का झाला? याची कारणे शोधली जाणार आहे. परंतु काँग्रेस कार्यकर्त्यांनी ही कारणे शोधली आहे. त्यांनी पराभवाचे खापर कोणत्या नेत्यांवर फोडले नाही...नवी दिल्लीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलनही केले...

Assembly Election 2023 | काँग्रेसने विधासभेतील पराभवाचे खापर कोणावर फोडले?
congress protest in new delhi
Follow us
| Updated on: Dec 03, 2023 | 1:10 PM

नवी दिल्ली | 3 डिसेंबर 2023 : पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीपैकी चार राज्यांत रविवारी मतमोजणी झाली. दुपारी १ वाजेपर्यंत निवडणूक निकाल जवळपास स्पष्ट झाले. काँग्रेसने या निवडणुकीत आपल्याकडे असणारी दोन राज्य गमवली. भाजपने मात्र एक राज्य कायम ठेवत आणखी दोन राज्यात सत्ता मिळवली. तेलंगणात मात्र काँग्रेसला यश मिळत आहे. परंतु राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसचा पराभव का झाला? त्यासाठी कोणाला ‘बलि का बरका’ बनवला गेला, हे आता समोर आले आहे. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पराभवाचे खापर इलेक्ट्रीक व्होटर मशिन म्हणजे EVM वर फोडले आहे. कार्यकर्त्यांनी इव्हीएम विरोधात घोषणाबाजी करत प्रदर्शन केले.

काँग्रेसने पुन्हा फोडले EVM

काँग्रेसची राजस्थानमध्ये सत्ता होती. त्या ठिकाणी अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्याकडे पक्षाची कामान होती. राहुल गांधी यांनी या ठिकाणी सभा घेतल्या होत्या. राजस्थानमधील कलानुसार काँग्रेस १९९ जागांपैकी केवळ ७० जागांवर आघाडीवर आहे. भाजपने ११४ जागांवर आघाडी घेतली आहे. परंतु या ठिकाणी काँग्रेसचा पराभवास ईव्हीएम जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्ते करत आहे. त्यामुळे नवी दिल्लीत काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले.

हे सुद्धा वाचा

छत्तासगडमध्ये भूपेश बघेल यांची सत्ता होती. परंतु या ठिकाणी त्यांना सत्ता टिकवता आली नाही. छत्तीसगडमध्ये ९० पैकी ५३ जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. काँग्रेस ३६ जागा मिळताना दिसत आहे. यामुळे या ठिकाणी एक्झिट पोलचे अंदाजही फोल ठरताना दिसत आहे. काँग्रेसच्या पराभवास जबादार कोण याची चर्चा आता सुरु झाली आहे. राहुल गांधी, कमलनाथ, अशोक गेहलोत, भूपेश बघेल की अन्य कोणी…तर कार्यकर्ते एव्हीएमवर खापर फोडत आहे. नवी दिल्लीतील काँग्रेस मुख्यलयाबाहेरचे वातावरण बदलले आहे. या ठिकाणी सकाळी विजयाच्या जल्लोषाची तयारी झाली होती. परंतु आता आंदोलन केले जात आहे. हे आंदोलन इव्हीएम मशिनविरोधात आहे. लोकशाही वाचवण्यासाठी इव्हीएमने मतदान बंद करण्याची मागणी काँग्रेस कार्यकर्ते करत आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.