AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राशीतून चंद्रमा फिरतोय, चंद्रकांत खैरेंकडून दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल

औरंगाबाद : शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे  (Chandrakant Khaire) यांनी दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. खैरे यांनी दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरण्यामागील कारण अत्यंत धक्कादायक आहे. खैरेंनी ज्योतिष शास्त्रानुसार शुभ मुहूर्त म्हणून आज उमेदवारी अर्ज पुन्हा भरला. यापेक्षा संतापजनक म्हणजे राशीतून चंद्रमा विजय क्षेत्रातून फिरत आहे, म्हणून आज पुन्हा चंद्रकांत खैरे यांनी उमेदवारी अर्ज भरल्याचं सांगण्यात येत […]

राशीतून चंद्रमा फिरतोय, चंद्रकांत खैरेंकडून दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:06 PM

औरंगाबाद : शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे  (Chandrakant Khaire) यांनी दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. खैरे यांनी दुसऱ्यांदा उमेदवारी अर्ज भरण्यामागील कारण अत्यंत धक्कादायक आहे. खैरेंनी ज्योतिष शास्त्रानुसार शुभ मुहूर्त म्हणून आज उमेदवारी अर्ज पुन्हा भरला. यापेक्षा संतापजनक म्हणजे राशीतून चंद्रमा विजय क्षेत्रातून फिरत आहे, म्हणून आज पुन्हा चंद्रकांत खैरे यांनी उमेदवारी अर्ज भरल्याचं सांगण्यात येत आहे. अंधश्रद्धेत बुडालेले खासदार चंद्रकांत खैरेंनी मुहूर्तासाठी दुसऱ्यांदा अर्ज भरला.

समाजातील अंधश्रद्धा दूर करण्याचं काम लोकप्रतिनिधींचं आहे. मात्र खासदार चंद्रकांत खैरेंसारखे लोकप्रतिनिधीच अंधश्रद्धेत इतके बुडाल्याने, ते समाजातील अंधश्रद्धा कशी दूर करणार हा प्रश्न आहे.

भद्रा मारोतीच्या दर्शनाने पहिला फॉर्म

दरम्यान, चंद्रकांत खैरे यांनी आपला पहिला उमेदवारी अर्ज 30 मार्च रोजी दाखल केला. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेही उपस्थित होते. औरंगाबादेतील भद्रा मारोतीच्या दर्शनाने खैरेंनी आपला पहिला फॉर्म भरला होता. त्यानंतर आज खैरेंना राशीतून चंद्रमा विजय क्षेत्रातून फिरत असल्याची प्रचिती झाल्याने दुसरा अर्ज भरला. त्यामुळे अंधश्रद्धाळू खैरेंना भद्रा मारोतीवर विश्वास नव्हता का असा प्रश्न आहे.

औरंगाबादेतील लढत

दरम्यान, औरंगाबादेत शिवसेनेच्या चंद्रकांत खैरे यांच्याविरुद्ध काँग्रेसने सुभाष झांबड यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे इथे खैरे विरुद्ध झांबड असा सामना रंगणार आहे. मात्र झांबड यांच्या उमेदवारीमुळे काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला. इतकंच नाही तर त्यांनी काँग्रेस पक्ष कार्यालयातील स्वत:च्या खुर्च्याही नेल्या.

कोण आहेत अब्दुल सत्तार?

अब्दुल सत्तार हे औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार आहेत. गेल्या जवळपास 30 वर्षांपासून राजकारणात सक्रीय असून, 1984 साली ग्रामपचंयत निवडणुकीपासून त्यांनी राजकीय जीवनाची सुरुवात केली. सिल्लोड आणि परिसरात अब्दुल सत्तार यांची राजकीय ताकद मोठी आहे.

संबंधित बातम्या 

आदित्यसोबत भद्रा मारोतीचं दर्शन, चंद्रकांत खैरेंचा अर्ज दाखल  

काँग्रेस सोडल्यानंतर अब्दुल सत्तारांनी पक्ष कार्यलायातील खुर्च्याही घरी नेल्या! 

युती आणि आघाडी, कोणत्या मतदारसंघात कोणता उमेदवार लढणार?  

काँग्रेसची नववी यादी जाहीर, महाराष्ट्रातील 4 उमेदवार घोषित 

मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल.
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द.
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं.
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी.
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार.
आयएमएफकडून मिळालेल्या पैशातून पाकिस्तान टेरर फंडिंग करतो - राजनाथ सिंह
आयएमएफकडून मिळालेल्या पैशातून पाकिस्तान टेरर फंडिंग करतो - राजनाथ सिंह.
राऊतांच्या पुस्तकावर विचारताच फडणवीस म्हणाले, माझं वय बालवाङ्मय...
राऊतांच्या पुस्तकावर विचारताच फडणवीस म्हणाले, माझं वय बालवाङ्मय....
ट्रम्पच्या हत्येच्या कट... ज्याच्यावर संशय तो म्हणतो कल्पनाच नव्हती की
ट्रम्पच्या हत्येच्या कट... ज्याच्यावर संशय तो म्हणतो कल्पनाच नव्हती की.
लालपरीच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, एसटी बस आता स्मार्ट होणार
लालपरीच्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी, एसटी बस आता स्मार्ट होणार.
ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शिरलं पाणी; रस्त्यांना आलं तलावाचं स्वरूप
ग्रामपंचायतीच्या कार्यालयात शिरलं पाणी; रस्त्यांना आलं तलावाचं स्वरूप.