Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वीजबिल माफीवरुन काँग्रेसने ठाकरे सरकारला शॅाक द्यावा; आशिष देशमुखांचा घरचा आहेर

वीजबिल माफीच्या मुद्द्यावरून काँग्रेसने जनतेसोबत राहावं. ठाकरे सरकारवर दबाव आणून या सरकारला शॉक द्यावा, अशी प्रतिक्रिया आशिष देशमुख यांनी व्यक्त केली आहे. (ashish deshmukh slams thackeray government over power bill issue)

वीजबिल माफीवरुन काँग्रेसने ठाकरे सरकारला शॅाक द्यावा; आशिष देशमुखांचा घरचा आहेर
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 2:38 PM

नागपूर: वीजबिलाच्या माफीवरून काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे. वीजबिल माफीच्या मुद्द्यावरून काँग्रेसने जनतेसोबत राहावं. ठाकरे सरकारवर दबाव आणून या सरकारला शॉक द्यावा, अशी प्रतिक्रिया आशिष देशमुख यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे वीजबिलाच्या मुद्द्यावरून काँग्रसे आणि राज्य सरकार आमने-सामने उभे ठाकण्याची चिन्हे दिसत आहेत. (ashish deshmukh slams thackeray government over power bill issue)

आशिष देशमुख ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते. वीजबिल माफीवर ठाकरे सरकारचं घूमजाव म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. त्यामुळे या मुद्द्यावर काँग्रेसने महाविकास आघाडीला शॉक दिलाच पाहिजे. वीजबिल माफीच्या मुद्द्यावरून जनतेत रोष आहे. राज्यातील पाच कोटी ग्राहकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. त्यामुळे काँग्रेसने जनतेसोबत राहावं. हे सरकार काँग्रेस आमदारांच्या भरवशावर आहे. त्यामुळे वीजबिल माफीसाठी काँग्रेसने या सरकारवर दबाव निर्माण करावा, असं देशमुख यांनी म्हटलं आहे.

राजीनामे खिशात ठेवा

फडणवीस सरकारमध्ये असताना शिवसेनेच्या मंत्र्यांनी खिशामध्ये राजीनामे ठेवले होते. काँग्रेसनेही तेच करावं. जनतेच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी खिशात राजीनामे ठेवावेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, वीजबिलाच्या मुद्द्यावरून राज्यातील प्रमुख राजकीय पक्ष आक्रमक झाले आहेत. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि मनसेने राज्यातील नागरिकांना वीजबिल न भरण्याचे आवाहन केलं आहे. मनसेने तर काल पत्रकार परिषद घेऊन सोमवारपर्यंत वीजबिल माफी न झाल्यास राज्यात मंगळवारपासून उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. तर, भाजपने आजपासूनच वीजबिल माफीवरून आंदोलन सुरू केलं आहे. भाजपच्या महिला आघाडीने वांद्रे येथील ‘प्रकाशगडा’वर आज मोर्चा काढला. यावेळी भाजप नेत्या चित्रा वाघ आणि आमदार अतुल भातखळकर उपस्थित होते. पोलिसांनी हा मोर्चा अडवण्याचा प्रयत्न केल्याने मोर्चेकरी महिलाही आक्रमक झाल्या होत्या. त्यामुळे येत्या काळात वीजबिल माफीचं आंदोलन राज्यात पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.

संबंधित बातम्या:

‘महावितरणचे 67 हजार कोटी रुपये भाजप सरकारच्या काळातच थकीत’, जयंत पाटलांचा भाजपवर पलटवार

आमच्या सरकारच्या काळात फायद्यात असलेली महावितरण कंपनी 11 महिन्यात तोट्यात कशी?, चंद्रशेखर बावनकुळेंचा सवाल

फडणवीसांना उठाबशा काढू द्या, आम्ही चितपट करु, जयंत पाटलांनी दंड थोपटले

(ashish deshmukh slams thackeray government over power bill issue)

महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग..
महाराष्ट्रात विमानाने यायचा, रेल्वेने सोलापूर गाठायचा अन् मग...
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ
गोरेंच्या सुपुत्राचा प्रताप! भैय्या पाटलांनी ट्विट केला व्हिडिओ.
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट
कराडने अनेक छोटे-मोठे गुंड जेलमध्ये बोलावून घेतलेत; आव्हाडांचं ट्विट.
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते
वाल्मिक कराडने जेलरच्या ऑफिसमध्ये बसून सगळं प्लॅनिंग केलं - मीरा गीते.
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट
कराडला, घुलेला मारहाण होत असताना, बबन गीतेने शेअर केली पोस्ट.
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी
मारहाण घटनेनंतर महादेव गीतेसह चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी.
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे
'...अन् देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी एकमेकांना संपवतील' - मनोज जरांगे.
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.