Chhagan Bhujbal : दिल्लीत महत्त्वाची घडामोड, छगन भुजबळ यांच्या विरोधात मविआचा उमेदवार कोण?

Chhagan Bhujbal : येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत आरक्षण महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. त्यात येवल्यामध्ये छगन भुजबळ यांना घेरण्याचा महाविकास आघाडीकडून पुरेपूर प्रयत्न होईल. छगन भुजबळ मागच्या 20 वर्षांपासून येवल्यामध्ये आमदार आहेत. छगन भुजबळांविरोधात उमेदवार ठरवण्यासाठी दिल्लीत महत्त्वाची घडामोड घडली आहे.

Chhagan Bhujbal : दिल्लीत महत्त्वाची घडामोड, छगन भुजबळ यांच्या विरोधात मविआचा उमेदवार कोण?
छगन भुजबळImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 11, 2024 | 12:46 PM

मागच्या काही महिन्यांपासून येवला विधानसभा मतदारसंघ चर्चेत आहे. नाशिक जिल्ह्यात येवला विधानसभा मतदारसंघ येतो. राज्यातील दिग्गज नेते छगन भुजबळ या मतदारसंघात मागच्या चार टर्मपासून आमदार आहेत. सध्या छगन भुजबळ हे अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटात आहेत. मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी येवल्यातून छगन भुजबळ यांना हरवण्याच आवाहन केलं आहे. त्यामुळे यंदा येवल्याची निवडणूक छगन भुजबळांसाठी सोपी नसेल. छगन भुजबळ मागच्या 20 वर्षांपासून येवल्यामध्ये आमदार आहेत.

येवल्यामध्ये छगन भुजबळ यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून दत्ता आव्हाड यांना उमेदवारी मिळू शकते. दत्ता आव्हाड काँग्रेसने नेते असून त्यांनी दिल्लीत काँग्रेस नेत्यांची भेट घेतली आहे. काँग्रेसचे विचार विभागाचे राष्ट्रीय सचिव दत्ता आव्हाड छगन भुजबळ यांच्या विरोधात मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. काँग्रेस नेते दत्ता आव्हाड यांनी येवला विधानसभा मतदारसंघासंदर्भात राजधानी दिल्ली इथं काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि मधुसुदन मिस्री यांची भेट घेतली.

‘सगळ्यांनी मविआ म्हणून आपण लढलं पाहिजे’

त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी 20 वर्ष राहिलेल्या सन्मानीय पाहुण्याला निरोप देण्याची वेळ आली आहे असं म्हणत छगन भूजबळ यांच्यावर टीका केली आहे. “मी काँग्रेस नेत्यांची भेट घेतली. नाशिक येवला मतदारसंघाची त्यांना माहिती दिली. भुजबळ जातीयवादी पक्षांच्या मांडीला मांडी लावून बसलेत. एवढ्या वर्षात येवला मतदारसंघाचा विकास झाला नाही. येवल्यात प्रक्रिया उद्योग आणला असता तर फायदा झाला असता. मी पवार साहेबांची, जयंत पाटील यांची भेट घेतली होती, सगळ्यांनी मविआ म्हणून आपण लढलं पाहिजे, अशी भूमिका मांडली आहे. केवळ सरकारी इमारती बांधणे म्हणजे विकास नव्हे. 20 वर्ष राहिलेल्या सन्मानीय पाहुण्याला निरोप देण्याची वेळ आली आहे” असं दत्ता आव्हाड म्हणाले.

येवला मतदारसंघाचं राजकीय गणित

मराठा समाजः 1 लाख 25 हजार

ओबीसीः 1 लाख 20 हजार

एस्सी आणि एसटीः 45 हजार

मुस्लीमः 35 हजार

इतरः 10 हजार

नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?
नवनीत राणा विधानसभा निवडणूक लढणार की नाही?, रवी राणा नेमक काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स
'लाडक्या बहिणीं'चा डंका थेट दिल्लीत, प्रत्येक बस स्टॉपवर झळकले बॅनर्स.
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड
पुण्यात चाललंय काय? पिस्तुल-कोयत्यानं मारहाण अन् वाहनांची तोडफोड.
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट
नवी मुंबई विमानतळावर सी-295 विमानाचं यशस्वी लँडिग होताच वॉटर सल्यूट.
नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी; हवाई दलाच्या विमानांची भरारी
नवी मुंबई विमानतळाच्या धावपट्टीची चाचणी; हवाई दलाच्या विमानांची भरारी.
'...पण माझं वय कसं कॉपी करणार?', रोहित पवारांचा कोणाला टोला?
'...पण माझं वय कसं कॉपी करणार?', रोहित पवारांचा कोणाला टोला?.
पंकजा मुंडे अन् जरांगे काय बोलणार? बीडमध्ये एकाच दिवशी दोन दसरा मेळावे
पंकजा मुंडे अन् जरांगे काय बोलणार? बीडमध्ये एकाच दिवशी दोन दसरा मेळावे.
निवडणुकीआधीच सरकारचा मास्टरस्ट्रोक, कॅबिनेटमध्ये ८० निर्णयांचा धडाका
निवडणुकीआधीच सरकारचा मास्टरस्ट्रोक, कॅबिनेटमध्ये ८० निर्णयांचा धडाका.
अनमोल 'रत्न' हरपला... सामान्य लोकं हळहळतील असा शेवटचा उद्योगपती गेला
अनमोल 'रत्न' हरपला... सामान्य लोकं हळहळतील असा शेवटचा उद्योगपती गेला.
उद्योग साम्राज्याचा सूर्य मावळला.. रतन टाटा यांना साश्रूनयनांनी अलविदा
उद्योग साम्राज्याचा सूर्य मावळला.. रतन टाटा यांना साश्रूनयनांनी अलविदा.