AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Politics : नशिबापेक्षा कष्ट महत्वाचे, घरात बसून काहीच मिळणार नाही, मुख्यमंत्र्यांचा आता थेट निशाणा

शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना कायम गद्दार म्हणून हिणवण्यात आले आहे तर पक्ष प्रमुख हे कुणाला भेटत नाहीत असा ठपका शिंदे गटाकडून ठेवण्यात आला आहे.

Politics : नशिबापेक्षा कष्ट महत्वाचे, घरात बसून काहीच मिळणार नाही, मुख्यमंत्र्यांचा आता थेट निशाणा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 18, 2022 | 7:11 PM

मुंबई :  (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांवर थेट आरोप न करता अप्रत्यक्ष चिमटे काढले होते. पण आता शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील (differences of opinion) मतभेद वाढत असून थेट आरोप-प्रत्यारोपास सुरवात झाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे कुणाला भेटत नाहीत असा ठपका शिंदे गटाने सुरवातीपासूनच ठेवलेला आहे. त्यामुळे घरात बसून काही मिळणार नाही, त्यासाठी कष्ट महत्वाचे असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. शिवाय मुख्यमंत्री पद हे सहाजासहजी मिळाले नसून त्यामागचे कष्टही विचारात घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले आहेत. एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांची स्तुती केली तर दुसरीकडे मुख्यमंत्र्यांनी ठाकरेंवर हा निशाणा साधला आहे.

शिवसेनेतून बंड केल्यानंतर पक्षप्रमुख आणि ठाकरे कुटुंबियांवर टोकाची टीका करु नका अशा सूचना एकनाथ शिंदे यांनीच आपल्या आमदारांना दिल्या होत्या. मात्र, दरम्यानच्या काळात या दोन्ही गटामध्ये आरोप-प्रत्यारोप वाढत गेले आणि आता जहरी टीका सुरु झाली आहे.

शिवसेनेकडून बंडखोर आमदारांना कायम गद्दार म्हणून हिणवण्यात आले आहे तर पक्ष प्रमुख हे कुणाला भेटत नाहीत असा ठपका शिंदे गटाकडून ठेवण्यात आला आहे. मुख्यमंत्रीच नाही तर शिंदे गटातील मंत्री आणि आमदारही आता पक्षप्रमुखांवर टीका करु लागले आहेत. मुख्यमंत्र्यांनी तर घरात बसून काहीच मिळत नसल्याचे म्हणत ठाकरेंवर बोचरी टीका केली आहे.

केवळ नशिबालाच दोष देत न बसता कष्टही तेवढेच गरजेचे आहेत. फळाची अपेक्षा न ठेवता अविरत परिश्रम केल्यास फळ हे मिळणारच आहे. असे म्हणत आपण मुख्यमंत्री पदाची आशा न बाळगता केवळ कष्टातून मिळालेले हे फळ असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. त्यामुळे घरी बसून काही मिळणार नसल्याचे म्हणत त्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

कुणाला माफी करणे हे दखील एवढे सोपे नाही. क्षमा करुन कोणतीही गोष्ट आत्मसाथ करता येते पण तो गुण नसेल तर काय होऊ शकते हे संपूर्ण महाराष्ट्र उघड्या डोळ्याने पाहत आहे.क्षमा करण्यासाठी देखील मोठे मन लागतं असे म्हणत त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.