Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरद पवारांनी काँग्रेसवर टीका केली नाही, ते राहुल गांधींना समजावून सांगतील : हसन मुश्रीफ

"राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रस नेते राहुल गांधींवर टीका केली नाही", असं हसन मुश्रीफ म्हणाले (Hasan Mushrif on Sharad Pawar statement).

शरद पवारांनी काँग्रेसवर टीका केली नाही, ते राहुल गांधींना समजावून सांगतील : हसन मुश्रीफ
Follow us
| Updated on: Jul 01, 2020 | 2:44 PM

मुंबई :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काँग्रस नेते राहुल गांधींवर टीका केली नाही (Hasan Mushrif on Sharad Pawar statement). याबाबत राहुल गांधींना पवार समजावून सांगतील. राहुल गांधी ज्या आक्रमकपणाने बोलत आहेत, ते फार चांगलं काम करत आहेत,” असं राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी स्पष्ट केलं (Hasan Mushrif on Sharad Pawar statement).

“राहुल गांधी केंद्र सरकारला फार आक्रमकपणे प्रश्न विचारत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कालच्या भाषणावर त्यांनी शेरोशायरीतून प्रश्न विचारला आहे. त्याबद्दल आमचं काही मत नाही”, असं हसन मुश्रीफ म्हणाले. याशिवाय “शरद पवार द्विपक्षीय कराराबद्दल बोलले होते. त्यात शस्त्र हाती घ्यायची नाहीत, असं त्यांना म्हणायचं होतं”, असंदेखील हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.

हेही वाचा : “खरे राजकारण कोण आणि का करत आहे?” शरद पवारांना काँग्रेसचे उत्तर

भारत-चीन सीमावाद सुरु असताना काँग्रेसकडून सातत्याने केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली जात आहे. भारत आणि चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी वारंवार केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत. याशिवाय काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन भारत-चीन सीमावादावरुन केंद्र सरकारवर टीका केली. त्यानंतर शरद पवार यांनी “ही राजकारणाची वेळ नाही” म्हणत काँग्रेस नेत्यांना टोला लगावला.

“1962 साली 45 हजार चौ.किमीचा भूभाग गेला. ते कसं विसरता येईल? त्यामुळे ही राजकारणाची वेळ नाही”, असं शरद पवार म्हणाले होते. शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेसकडून राजू वाघमारे यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आलं. “ज्या पक्षाच्या कार्यकाळात कित्येक युद्ध जिंकण्यात आली, तो पक्ष देशाच्या सुरक्षिततेच्या बाबतीत राजकारण करण्याचा प्रश्नच येत नाही” असं वाघमारे म्हणाले. त्यानंतर राष्ट्रवादीकडून हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण आलं आहे.

दरम्यान, पत्रकार परिषदेत हसन मुश्रीफ यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या उपाययोजनाबद्दलही माहिती दिली. “कोरोनाच्या आपत्तीचे इष्टापत्तीत रुपांतर करण्याची संधी ग्रामविकास विभागाला मिळाली आहे. कोरानाच्या काळात आमच्या विभागाने महिला बचतगटांना ऑनलाईन मार्केट उपलब्ध करुन दिली आहे”, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

“अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट या ऑनलाईन विक्री करणार्‍या पोर्टलवर बचतगटांच्या उत्पादनांची विक्री मोठ्या प्रमाणात सुरु आहे. ही ऑनलाईन विक्री मे महिन्यात सुरु केली. महिला बचतगटांना यामुळे जागतिक बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. 100 महिला बचतगट आता जोडले गेलेले आहेत. त्यात वाढ करण्याचा ग्रामविकास विभागाचा प्रयत्न आहे. महिला बचत गटांनी आतापर्यंत 85 लाख मास्कची निर्मिती केली”, असंदेखील त्यांनी यावेळी सांगितलं.

रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल
रायगडचं पालकमंत्रिपद गोगावलेंना नाही; ठाकरेंच्या नेत्यानं कारण सांगितल.
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी
बॉलीवूडच्या भाईजानचं टेंशन वाढलं; गाडी उडवून देण्याची मिळाली धमकी.
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही
'पुन्हा भिसे प्रकरण...', 'दीनानाथ' मधील घटनेनंतर चाकणरांची मोठी ग्वाही.
ढोल वाजवण्यात आणि लेझिम खेळण्यात सुरेश धस रमले
ढोल वाजवण्यात आणि लेझिम खेळण्यात सुरेश धस रमले.
प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर दाऊदची संपत्ती मुक्त केली; राऊतांची टीका
प्रफुल पटेल भाजपसोबत गेल्यावर दाऊदची संपत्ती मुक्त केली; राऊतांची टीका.
बळीराजासाठी 2 दिवस चिंतेचे... पुन्हा अवकाळीचं सावट, IMD चा अंदाज काय?
बळीराजासाठी 2 दिवस चिंतेचे... पुन्हा अवकाळीचं सावट, IMD चा अंदाज काय?.
लालपरीच्या प्रवाशांसाठी गुड न्यूज, येत्या महिन्याभरात एसटी महामंडळ...
लालपरीच्या प्रवाशांसाठी गुड न्यूज, येत्या महिन्याभरात एसटी महामंडळ....
राऊतांना घेऊन आमच्या पक्षाचं वाटोळ करायचं आहे का? भूमरेंचा खोचक टोला
राऊतांना घेऊन आमच्या पक्षाचं वाटोळ करायचं आहे का? भूमरेंचा खोचक टोला.
एकसंघ भारताचं श्रेय संविधानाला जातं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
एकसंघ भारताचं श्रेय संविधानाला जातं - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमीवर अभिव
राज्यपाल, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून चैत्यभूमीवर अभिव.