विदर्भात काँग्रेसचा, तर उत्तर महाराष्ट्रात भाजपचा दबदबा; महाराष्ट्रात कोण शक्तीशाली?; आकडे काय सांगतात?

राज्यात विधानसभा निवडणुका होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील कोणत्या भागात कोणत्या पक्षाचं प्राबल्य आहे, कुणाची ताकद वाढू शकते आणि कुणाची कमी होऊ शकते याचा घेतलेला हा आढावा. 2014 आणि 2019च्या निवडणुकीच्या निकालांचा तुलनात्मक अभ्यास करून भविष्यातील निवडणुकीचे अंदाज वर्तवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

विदर्भात काँग्रेसचा, तर उत्तर महाराष्ट्रात भाजपचा दबदबा; महाराष्ट्रात कोण शक्तीशाली?; आकडे काय सांगतात?
maharashtra leadersImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 22, 2024 | 12:33 PM

येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात एका टप्प्यातच निवडणुका होणार आहेत. एकूण 288 जागांवर मतं टाकली जाणार आहेत. त्यानंतर अवघ्या तीन दिवसात म्हणजे 23 नोव्हेंबर रोजी निकाल येणार आहेत. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नुकत्याच लोकसभा निवडणुका झाल्या. त्यातील आकडेवारी पाहता विदर्भात काँग्रेसचा दबदबा असल्याचं दिसून आलं आहे. तर उत्तर महाराष्ट्रात भाजपला पर्याय नसल्याचं अधोरेखित झालं आहे. इतर भागात काय परिस्थिती आहे? आकडे काय सांगतात? यावर टाकलेला हा प्रकाश…

आकडे बोलतात…

महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा आहेत. बहुमतासाठी 145 जागांची गरज आहे. विदर्भात एकूण 62 जागा आहेत. त्यापैकी भाजपचे 15, शिंदे गटाचे 4, काँग्रेसचे 29, शरद पवार गटाचे 5, ठाकरे गटाचे 8 आणि एका जागेवर अन्य आमदार निवडून आलेले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात एकूण 70 जागा आहेत. त्यापैकी भाजपकडे 17, शिंदे गटाकडे 11, अजितदादा गटाकडे 2, काँग्रेसकडे 10, शरद पवार गटाकडे 19, उद्धव ठाकरे गटालाकडे 6 तर इतरांकडे 5 जागा आहेत.

उत्तर महाराष्ट्रात एकूण 35 जागा आहेत. त्यातील 20 जागा भाजपकडे आहेत. शिंदे गटाकडे दोन, काँग्रेसकडे 5, शरद पवार गटाकडे 4 आणि ठाकरे गटाकडे 4 जागा आहेत. उत्तर महाराष्ट्रात अजितदादा गटाचा एकही आमदार नाही. मराठवाड्यात एकूण 46 जागा आहेत. त्यात भाजपकडे 8, शिंदे गटाकडे 4, काँग्रेसकडे 14, शरद पवार गटाकडे 3, ठाकरे गटाकडे 15 आणि इतरांकडे दोन जागा आहेत. मराठवाड्यातही अजितदादा गटाचं अस्तित्व नाहीये.

ठाणे आणि कोकणात मिळून एकूण 39 जागा आहेत. या ठिकाणी भाजपकडे 11, शिंदे गटाकडे 12, अजितदाद गटाकडे 4, शरद पवार गटाकडे दोन, ठाकरे गटाकडे 9 आणि इतरांकडे एक जागा आहे. ठाणे आणि कोकणात काँग्रेसचं अस्तित्वच नाहीये. दुसरीकडे मुंबईत एकूण 36 जागा आहेत. मुंबईत भाजपकडे 9, शिंदे गटाकडे 7, काँग्रेसकडे 5, ठाकरे गटाकडे 15 जागा आहेत. विशेष म्हणजे मुंबईत काँग्रेस, अजितदादा आणि शरद पवार गटाचं अस्तित्व नाहीये.

मागच्या निवडणुकीचा निकाल काय?

मागच्या म्हणजे 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 122 जागा मिळाल्या होत्या. काँग्रेसला 42, एनसीपीला 41 आणि शिवसेनेला 63 जागा मिळाल्या होत्या. तर अन्य 20 जण निवडून आले होते. त्यानंतर 2019मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 105, काँग्रेसला 44, एनसीपीला 54 आणि शिवसेनेला 56 जागा मिळाल्या होत्या. इतरांना यावेळी 29 जागा मिळाल्या होत्या.

Non Stop LIVE Update
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?
फडणवीस रात्री उशिरा शिंदेंच्या भेटीला, वर्षावर खलबतं, तासभर काय चर्चा?.
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?
पुण्यात खासगी वाहनातून 5 कोटींची रोकड जप्त, नेमकं प्रकरण काय?.
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी
राजकीय समीकरणांची खिचडी अन् एकएक मतांसाठी लढाई; 2024ला आघाडी की बिघाडी.
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?
'ते' एका बापाची औलाद नाहीत, संजय राऊत नेमके कशावरून भडकले ?.
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम
जरांगे कोणाचा खेळ बिघडवणार? मराठवाड्यात48 जागा, जरांगे फॅक्टरचा परिणाम.
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की..
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की...
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.