AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पवारांनी सोयीचं राजकारण केलं, जे झालं ते महाराष्ट्र पाहत आहे, दरेकरांची पवारांवर टीका

Maharashtra Political Crisis : काल दुपारपासून महाराष्ट्रात राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर जोरादार टीका करीत आहेत. थोड्यावेळ्यापूर्वी प्रवीण दरेकरांनी शरद पवारांवरती जोरदार टीका केली आहे.

पवारांनी सोयीचं राजकारण केलं, जे झालं ते महाराष्ट्र पाहत आहे, दरेकरांची पवारांवर टीका
pravin drarekarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 03, 2023 | 1:42 PM

महाराष्ट्र : भाजपने पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा तीस आमदारांचा गट फोडल्यामुळे राजकारण (Maharashtra Political Crisis) मोठी खळबळ माजली आहे. मागच्या कित्येक दिवसांपासून महाराष्ट्रात पुन्हा एकदा राजकारणात भूकंप होण्याची शक्यता अनेकांनी व्यक्त केली होती. ती गोष्ट काल खरी ठरली असं म्हणायला हरकत नाही. काल राजकारणात तिसऱ्यांदा भूकंप झाल्यामुळे राजकीय नेते (Ajit pawar) एकमेकांवर जोरदार टीका करीत आहेत. प्रवीण दरेकरांनी शरद पवार (sharad pawar) यांच्यावरती जोरदार टीका केली आहे. वसंत दादाच्या वेळेला लोकशाही वेगळी होती का? शरद पवार यांनी आजवर सोयीचे राजकारण आजवर केले आहे. त्याचबरोबर आदित्य ठाकरे यांनी सुरुवातीला हिंदुत्व शिकायची गरज आहे असंही प्रवीण दरेकर (bjp leader pravin darekar) म्हणाले.

राष्ट्रवादीचा एक गट फुटल्यामुळे अनेकांना धक्का बसला आहे. महाराष्ट्रात काल दुपारी सगळ्यांना धक्का बसला आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्याचबरोबर इतर नऊ राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी सुध्दा शपथ घेतली आहे. त्यानंतर भाजपवरती अनेक नेत्यांनी जोरदार टीका केली. त्यावेळी टीकेला उत्तर देताना, प्रवीण दरेकर म्हणाले की, आदित्य ठाकरे यांना “हिंदुत्व शिकायची गरज आहे, त्यांनी यावर बोलू नये. संजय राऊत ज्योतिषी आहेत का?,हवेत गोळीबार करायचा आणि त्यातून संभ्रम निर्माण करण्याचं काम करतात”

काल महाराष्ट्रात राष्ट्रावादीचा गट फुटल्यानंतर देशासह संपूर्ण महाराष्ट्रात लक्ष पवारांच्या भूमिकेकडं होतं. परंतु काल दुपारी पवारांनी मी या गोष्टीचं समर्थन करीत नाही असं सांगितलं. त्यानंतर पुन्हा राजकीय घडामो़डींना वेग आला होता. आज शरद पवारांनी कराडमध्ये प्रीती संगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आपली भूमिका स्पष्ट केली. म्हणाले, सध्या जे भाजप सरकार करीत आहे. त्यामुळे लोकांच्या मनात एक प्रकारची भीती निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा

“अनेक राज्यात भाजपनं सरकारं फोडली आहेत. जिथं चांगला कारभार चालू होता. तिथं त्यांनी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तसाचं प्रकार महाराष्ट्रात सुरु आहे. ज्यांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादी पक्ष फोडला आहे,” त्यांना सोडणार नाही अशी टीका शरद पवारांनी भाजपवर केली.

27 नागरिकांचे मृत्यू हे सरकारने घेतलेले नरबळी; संजय राऊतांचा घणाघात
27 नागरिकांचे मृत्यू हे सरकारने घेतलेले नरबळी; संजय राऊतांचा घणाघात.
मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल, पाकची तंतरली अन् मध्यरात्री मोठा दावा
मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल, पाकची तंतरली अन् मध्यरात्री मोठा दावा.
पहलगामनंतर CCSची बैठक, 'सिंधू जल' स्थगितीनंतर कोणता मोठा निर्णय होणार?
पहलगामनंतर CCSची बैठक, 'सिंधू जल' स्थगितीनंतर कोणता मोठा निर्णय होणार?.
पाकिस्तानची मस्ती काय उतरेना..भारतीय लष्कराबाबत समर्थकांकडून खोटे दावे
पाकिस्तानची मस्ती काय उतरेना..भारतीय लष्कराबाबत समर्थकांकडून खोटे दावे.
यूट्यूब चॅनल बंद केले; याला बदला म्हणायचं का? संजय राऊतांचा सवाल
यूट्यूब चॅनल बंद केले; याला बदला म्हणायचं का? संजय राऊतांचा सवाल.
पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर
पहलगाम हल्ल्याबाबत एनआयएच्या तपासात मोठी माहिती समोर.
पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र
पहलगाम हल्ल्याबाबत पंतप्रधान मोदींच्या निर्णयाला RSSचा पाठिंबा - सूत्र.
भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी
भारत-पाकिस्तान वादात संयुक्त राष्ट्रसंघाची मध्यस्थी.
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'
मोठी बातमी, मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल; म्हणाले 'वेळ अन् टार्गेट'.
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?
पहलगामचा मास्टमाईंड कॅमेऱ्यात कैद, पाक सैन्याची कनेक्शन, काय होता डाव?.