Independence Day : भारतीय स्वातंत्र्यानंतर पण राज्यातील हा प्रदेश होता पारतंत्र्यात, ‘ऑपरेशन कबड्डी’ने आणली स्वातंत्र्याची पहाट; मग डौलात फडकला तिरंगा
Operation Polo : भारताला स्वातंत्र्य मिळवून 77 वर्षे पूर्ण झाली. पण राज्यातील या प्रदेशाला देशात स्वातंत्र्याची पहाट उगवून सुद्धा एक वर्ष 32 दिवस पारतंत्र्यात घालवावी लागली होती. जनतेने नेटाने लढा दिला. तत्कालीन केंद्र सरकारने पोलीस कारवाई केली. तेव्हा हा प्रदेश गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झाला.

भारताला स्वातंत्र्य मिळवून 77 वर्षे पूर्ण झाली आहेत. आपण स्वातंत्र्याचा नुकताच अमृत महोत्सव साजरा केला आहे. तर आता देशाची वाटचाल शताब्दी महोत्सवाकडे सुरु आहे. इंग्रजांच्या जुलमी राजवटीतून भारत स्वतंत्र झाला. त्यासाठी अनेक जणांनी प्राणांची आहुती दिली. तुरुंगवास सहन केला. तेव्हा आजचा भारत आकाराला आला. पण राज्यातील या प्रदेशाला देशात स्वातंत्र्याची पहाट उगवून सुद्धा एक वर्ष 32 दिवस पारतंत्र्यात घालवावी लागली होती. जनतेने नेटाने लढा दिला. तत्कालीन केंद्र सरकारने पोलीस कारवाई केली. तेव्हा हा प्रदेश गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झाला. इंग्रजांची शेवटची चाल भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास 535 लहानसहान संस्थाने खालसा करण्यात आली. मोठ्या संस्थानांना पाकिस्तानात...