Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘कामगिरीच्या आधारावर खरं तर पंतप्रधानांनी पायउतार व्हावं’, मंत्रिमंडळ विस्तारावरुन काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना टोला

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधलाय. कामगिरीच्या आधारावर जर फेरबदल होत असतील तर पंतप्रधान मोदींनीही पदावरुन बाजूला झालं पाहिजे, असा टोला सुरजेवाला यांनी लगावलाय.

'कामगिरीच्या आधारावर खरं तर पंतप्रधानांनी पायउतार व्हावं', मंत्रिमंडळ विस्तारावरुन काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना टोला
रणदीप सुरजेवाला, काँग्रेस प्रवक्ते
Follow us
| Updated on: Jul 07, 2021 | 3:50 PM

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या दुसऱ्या टप्प्यातील पहिला मंत्रीमंडळ विस्तार अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय. अशावेळी कामगिरी चांगली नसल्याचं सांगत काही विद्यमान मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आलाय. तर 20 नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी पंतप्रधान मोदींवर जोरदार निशाणा साधलाय. कामगिरीच्या आधारावर जर फेरबदल होत असतील तर पंतप्रधान मोदींनीही पदावरुन बाजूला झालं पाहिजे, असा टोला सुरजेवाला यांनी लगावलाय. (Randeep Surjewala criticizes PM Narendra Modi over Union Cabinet expansion)

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा मंत्रिमंडळ विस्तार फक्त ‘डिफेक्टर एडजस्टमेंट एक्सरसाईज’ असल्याची टीका सुरजेवाला यांनी केलीय. जर कामगिरीच्या आधारावर मंत्रिमंडळात फेरबदल केले जात असतील तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पदाचा राजीनामा द्यावा. कारण त्यांच्या कार्यकाळातच चीनने आपल्या जमिनीवर कब्जा केलाय. अमित शाह यांनीही गृहमंत्रीपदावरुन दूर व्हावं. कारण, त्यांच्या कार्यकाळातच मॉब लिंचिंग आणि कस्टोडियल डेथसारखे गंभीर प्रकार घडले आहेत. नक्षलवाद्यांनीही डोकं वर काढलं आहे, अशा शब्दात सुरजेवाला यांनी सिंह आणि शाह यांच्यावरही जोरदार टीका केलीय.

धर्मेंद्र प्रधान यांनीही पेट्रोलियम मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे कारण त्यांच्या कार्यकाळात तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. कोरोना संकटातील खराब कामिगीरीमुळे डॉ. हर्षवर्धन यांनी राजीनामा द्यावा. तर अर्थव्यवस्थेतील मिसमॅनेजमेंटमुळे केंद्रीय अर्थमंत्र्यांनीही राजीनामा द्यायला हवा, असा टोला सुरजेवाला यांनी लगावलाय. सरतेशेवटी नरेंद्र मोदींनीही पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यायला हवा. कारण त्यांनी देशातील शांतता कचऱ्यात ढकलली आहे, अशी घणाघाती टीकाही सुरजेवाला यांनी केलीय.

8 विद्यमान मंत्र्यांचा राजीनामा

मोदी सरकारमधील एकूण 8 विद्यमान मंत्र्यांनी आपल्या खात्याचा राजीनामा दिला आहे. त्यात केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक, संतोष गंगवार, देबोश्री चौधरी, रावसाहेब दानवे पाटील, संजय धोत्रे, बाबुल सुप्रियो, सदानंद गौडा या मंत्र्यांचा समावेश आहे. दरम्यान, या नेत्यांना डच्चू मिळतो की दुसरं कुठलं खातं दिलं जातं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. डॉ. हर्षवर्धन यांना मात्र दुसरं खातं दिलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

संबंधित बातम्या :

Modi Cabinet Expansion: प्रीतम मुंडेंचं मंत्रीपद हुकलं, मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी पंकजांचं ट्विट, म्हणाल्या…

Modi Cabinet Reshuffle : मोदी कॅबिनेट विस्ताराआधीच धक्क्यावर धक्के, केंद्रीय शिक्षण मंत्र्यांपाठोपाठ आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धनचाही राजीनामा

Randeep Surjewala criticizes PM Narendra Modi over Union Cabinet expansion

करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय
करूणा शर्मा आणि धनंजय मुंडेंचे संबंध लग्नासारखेच - मुंबई सत्र न्यायालय.
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख
खुलताबादचं 'रत्नपूर' ही आमचीच मागणी, खैरेंनी केला बाळासाहेबांचा उल्लेख.
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा
आकाची टोळी अजूनही कार्यरत अन्..., धसांचा वाल्मिक कराडवर पुन्हा निशाणा.
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर
ठाकरेंना राऊतांकडून कृष्णाची उपमा, शहाजीबापूंनी 'धृतराष्ट्र'नं उत्तर.
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज..
मनसेला टार्गेट करणाऱ्यांच्या मागे महाशक्ती? खडसे म्हणाल्या, बंधू राज...
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्
ज्या कंपनीमुळे 'बीड'चा वाद, त्याच कंपनीत चोरांचा डल्ला, 15 जण आले अन्.
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी
रूग्णालयासाठी ज्यांनी जमीन दिली, त्यांच्यावरच अन्याय? खिलारेंची कहाणी.
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक
चिमुकलीवर अत्याचार आणि हत्या प्रकरणी स्थानिक पुन्हा आक्रमक.
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन
इमारतीवरून उडी मारून आजीने नातवासह संपवलं जीवन.
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी
'त्या' बाळांचं पालकत्व घ्याव, BJP आमदाराची मंगेशकर कुटुंबीयांकडे मागणी.