AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजे म्हणाले, सत्तेतील लोकांनी, पवारांनी लक्ष घालावं, मोदींवरच्या प्रश्नावर म्हणाले राजकारण नको!

मराठा आरक्षणावर लक्ष घालून तोडगा काढावा, अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे.

राजे म्हणाले, सत्तेतील लोकांनी, पवारांनी लक्ष घालावं, मोदींवरच्या प्रश्नावर म्हणाले राजकारण नको!
Follow us
| Updated on: Feb 11, 2021 | 6:41 PM

मुंबई : भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकल्यानंतर आज पहिल्यांदाच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ही भेट झाल्याची उदयनराजे यांनी सांगितलं. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर शरद पवार यांनी लक्ष घालून तोडगा काढण्याची मागणी केल्याचंही ते म्हणाले. पवारांची नैतिक जबाबदारी आहे. मराठा आरक्षणावर लक्ष घालून तोडगा काढावा, अशी मागणी उदयनराजे यांनी केली आहे.(MP Udanayaraje Sharad Pawar’s meeting on Maratha reservation issue)

उदयनराजेंचं पवारांना आवाहन

शरद पवारांची भेट घेतली, मोदींची भेट घेणार का? असा प्रश्न पत्रकारांनी उदयनराजेंना विचारला. त्यावेळी “हा प्रश्न राजकीय नाही. यात राजकारण कुणी आणू नये. हा विशिष्ट समाजाचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात जे सत्तेत आहेत त्यात पाहिलं तर मराठा समाजाचे सर्वाधिक आमदार आहेत. महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टात बाजू मांडायला हवी. ती होताना दिसत नाही. याबाबत मी पवारसाहेबांना सांगितलं की, आपल्याकडून काही मार्गदर्शन महाराष्ट्र सरकारला झालं पाहिजे. राज्यातील सरकार पवारसाहेबांमुळे. त्याची बांधणी पवारसाहेबांनीच केली. त्यामुळे पवारसाहेबांनीच मराठा आरक्षणावर मार्ग काढायला हवा”, अशी प्रतिक्रिया उदयनराजे यांनी दिली आहे.

अन्यथा उद्रेक होईल, राजेंचा इशारा

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे पवारांची नैतिक जबाबदारी आहे. मराठा आरक्षणावर लक्ष घालून तोडगा काढावा. मराठा आरक्षण देणार नसाल तर दिशाभूल का? एक श्वेतपत्रिका काढा. सरकारनं याबाबत खुलासा करावा, अशी मागणीही उदयनराजेंनी केलीय. मराठा आरक्षणाबाबत सरकार गंभीर नाही. वकिलांनी कोर्टात योग्य बाजू मांडली नाही. वडिलकीच्या नात्यानं पवारांनी यात लक्ष घालावं, अन्यथा राज्यात मोठा उद्रेक होईल, अशा इशाराही उदयनराजे यांनी दिलाय.

करायचं नसेल तर नाही म्हणून सांगा : उदयनराजे

“तुम्हाला करायचं नसेल तर नाही म्हणून सांगा. श्वेतपत्रिका काढा, जाहीर करा, पण ते तसं करत नाहीत. अशोक चव्हाण यांना हे समजायला हवं. त्यांना अनुभव आहे, आर्थिक, सामाजिकरित्या मराठा समाज मागे आहे. राज्याने कायदा केला आहे, श्वेतपत्रिका जारी करायला हवी, अशी अपेक्षा उदयनराजे यांनी व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या :

Special Report | पुण्यात लग्न समारंभात उदयनराजे आणि रामराजेंची गळाभेट

सर्व आरक्षणं रद्द करुन गुणवत्तेनुसार आरक्षण द्या, खासदार उदयनराजेंची मागणी

MP Udanayaraje Sharad Pawar’s meeting on Maratha reservation issue

पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!
पाकिस्तानला भारताचा आणखी एक दणका!.
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला
5 तारखेला लग्न झालं अन् फोन आला, हळदीच्या अंगाने जवान सीमेवर परतला.
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री
टेररीस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी धार्मिक स्थळांचा आसरा - विक्रम मिस्री.
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं
दहशतवाद्यांचे अड्डे हेच आमचं टार्गेट,विक्रम मिस्रींनी स्पष्टच सांगितलं.
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी
ड्रोन, मिसाईलला हवेतच निकामी केलं - कर्नल सोफिया कुरेशी.
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले
एअर स्ट्राईकनंतर आता वॉटर स्ट्राईक! बगलिहार, सलाल धरणाचे दरवाजे उघडले.
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?
पाकिस्तानला धुळीत लोळवणारं एस-400 सिस्टिम काय आहे?.
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय
हार्पी ड्रोनची ताकद अन् पाक उद्ध्वस्त, भारताकडून करारा जवाब, घडतंय काय.
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर
भारताकडून पहिल्यांदा S-400 सिस्टिमचा वापर.
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?
बलुच नागरिकांचं टोकाचं पाऊल, पाकविरोधात बंडाचं हत्यार; कारण काय?.