AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदींचं नेतृत्व स्ट्राँग! विरोधकहो, कितीही बैठका घ्या, पण जिंकणार तर मोदीच!- रामदास आठवले

Ramdas Athwale on PM Narendra Modi : बिहारमध्ये विरोधी पक्षांची बैठक, रामदास आठवले यांची टीका तर पंतप्रधान मोदींचं कौतुक; म्हणाले...

मोदींचं नेतृत्व स्ट्राँग! विरोधकहो, कितीही बैठका घ्या, पण जिंकणार तर मोदीच!- रामदास आठवले
Follow us
| Updated on: Jun 24, 2023 | 11:36 AM

मुंबई : बिहारमधील पाटन्यामध्ये देशाच्या 15 विरोधी पक्षांची काल एकत्रित बैठक पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पराभवासाठी एकत्र येण्याच्या मुद्द्यावर दीर्घ चर्चा झाली. सर्व पक्षांनी आगामी काळातील निवडणुका एकत्र लढवण्याचं ठरवलं आहे. विरोधी पक्षातील या बैठकीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली आहे. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरही आठवले यांनी भाष्य केलंय.

नरेंद्र मोदी यांचं कौतुक

बिहारमध्ये विरोधी पक्षातील नेते जातील आणि आपली भूमिका नरेंद्र मोदी यांच्या विरोधात मांडतील. नरेंद्र मोदीजींचं नेतृत्व स्ट्रॉंग आहे 2024 या निवडणुका आम्ही जिंकू. विरोधकांना पराभूत करण्याची नीती आमच्याकडे आहे. यांनी कितीही बैठका घेतल्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींना हरवणं सोपं नाही, असं आठवले म्हणालेत.

नीतीश कुमार यांच्यावर टीका

युतीचा भाग असणारी जेडीयू बाहेर पडली. नीतीश कुमार यांनी युतीतून बाहेर पडले. त्यांनी आरजेडीसोबत जात सत्ता स्थापन केली. या सरकारमध्ये नीतीश कुमार हे मुख्यमंत्री तर तेजस्वी यादव हे उपमुख्यमंत्री झाले. या घडामोडीवरही रामदास आठवले यांनी भाष्य केलंय.

बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार आमच्यासोबत युतीत होते. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये ते रेल्वेमंत्री होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काळात देखील ते अनेक वर्ष भाजपसोबत होते. बिहारमध्ये त्यांच्या कमी जागा आल्यानंतर देखील नरेंद्र मोदी यांनी नीतीश कुमार यांनाच मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. पण आता त्यांची भाषा बदलली आहे, असं आठवले म्हणाले.

इस्कॉनची भूमिका आहे ती मानव जातीमध्ये शांती निर्माण झाली पाहिजे. आज देशाभरामध्ये आणि जगभरामध्ये इस्कॉन चे 1000 मंदिरं आहेत. शांतीचा संदेश देणारी ही संस्था आहे. सर्वधर्मसमभावची त्यांची भूमिका आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या जे संविधान आहे. हे सर्व धर्माच्या लोकांना न्याय देणारं आहेत. एकमेकांच्या धर्माच्या कार्यक्रमांमध्ये सहभागी होणे आपली जबाबदारी आहे. शांतीच्या संदेश देत देत हे रथ यात्रा इथून निघणार आहे, असं आठवले म्हणाले.

नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....
पहलगाम दहशतवाद्यांनी 4 वेळा लोकेशन बदललं; घनदाट जंगलात शोध सुरू
पहलगाम दहशतवाद्यांनी 4 वेळा लोकेशन बदललं; घनदाट जंगलात शोध सुरू.