Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ग्रामपंचायतीत नंबर वन कोण? शरद पवारांकडून आकडेवारीच सादर; शिवसेनेचा आकडा मात्र…

आई किंवा वडील यांच्यापैकी एकच व्यक्ती हयात आहेत, जिवंत आहेत, अशा मुलांची संख्या 20 हजार आहे. ज्यांचे आई वडील गेले अशा मुलांची संख्या 700 आहे. या मुलांकडे बघण्याचा दृष्टीकोण सहानभूतीचा आणि समंजसपणाचा असावा.

ग्रामपंचायतीत नंबर वन कोण? शरद पवारांकडून आकडेवारीच सादर; शिवसेनेचा आकडा मात्र...
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Sep 21, 2022 | 3:04 PM

सुनील काळे, मुंबई: राज्यातील काही जिल्ह्यांतील ग्रामपंचायतीच्या (gram panchayat election) निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत आम्हीच नंबर वन असल्याचा दावा भाजपने केला आहे. आपण नंबर वन असल्याचं सांगताना भाजपने आकडेवारीही सादर केली आहे. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांनी भाजपचा (bjp) हा दावा फेटाळून लावला आहे. पवारांनी थेट आकडेवारीच सादर करून राष्ट्रवादी काँग्रेसच ग्रामंपंचायत निवडणुकीत नंबर वन असल्याचा दावा केला आहे. तसेच भाजप-शिंदे गटाच्या युतीपेक्षा महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळाल्याचा दावाही पवारांनी केला आहे. त्यामुळे आता भाजप पवारांच्या या आकडेवारीवर काय उत्तर देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आहेत. काही पक्ष वेगळी आकडेवारी सांगत आहे. आम्ही आकडेवारी गोळा केली. ठरावीक जिल्ह्यांमध्ये ही निवडणूक झाली. ग्रामपंचायतीच्या एकूण 608 जागा होत्या. त्यापैकी राष्ट्रवादीने 173, काँग्रेसने 84, भाजपने 168 आणि शिंदेगटाने 42 जागा जिंकल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.

यावेळी शरद पवार यांनी शिवसेनेची आकडेवारी मात्र सांगितली नाही. शिवसेनेची पूर्ण आकडेवारी आली नाही, असं म्हणत पवारांनी ही आकडेवारी सांगणं टाळलं. तसेच ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडीने 277 जागा जिंकल्यात आहेत. तर शिंदे गट-भाजपला 210 जागा मिळाल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रवादीने तरुण कार्यकर्त्यांना संधी दिली. त्यांचा फरमॉर्न्स चांगला होता, असंही ते म्हणाले. आम्हाला माहीत आहे आमच्या जागा किती आहेत. त्यामुळे आम्ही आकडेवारी सांगितली. इतरांना जर वाटत असेल त्यांच्या जागा जास्त आहेत तर त्यांनी त्या आनंदात राहावं, असा टोलाही त्यांनी लगावला.

राज्यात अनेक प्रश्न आहे. काही बाबत लोकांमध्ये अस्वस्थता आहे. कारण राज्य सरकारने काही निर्णय बदलले आहेत. कोरोना काळात काही मुलं किंवा पालक मृत्यूमुखी पडले. त्यांना मदत करण्यात आली. तत्कालीन अर्थमंत्री अजित पवारांनी मदतीचं धोरण जाहीर केलं होतं. अडीच हजार रुपये अनुदान जाहीर केलं होतं. ते स्थगित केल्याची माहिती आहे, असं ते म्हणाले.

आई किंवा वडील यांच्यापैकी एकच व्यक्ती हयात आहेत, जिवंत आहेत, अशा मुलांची संख्या 20 हजार आहे. ज्यांचे आई वडील गेले अशा मुलांची संख्या 700 आहे. या मुलांकडे बघण्याचा दृष्टीकोण सहानभूतीचा आणि समंजसपणाचा असावा, असं त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्राच्या बाहेर अशीच स्थिती झाली. त्या त्या सरकारने असंच अनुदान दिलंय. उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, दिल्ली, अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू आदींनी अनुदान दिलं आहे. महाराष्ट्रातील अनुदानात वाढ करण्याचा निर्णय मागच्या सरकारने घेतला होता. या गोष्टीकडे राज्य सरकारने तातडीने लक्ष द्यावं, असं आवाहन त्यांनी केलं.

मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.
...तुम्ही औरंगजेबापेक्षा कमी आहे का?, कडूंची सरकारला औरंगजेबाची उपमा?
...तुम्ही औरंगजेबापेक्षा कमी आहे का?, कडूंची सरकारला औरंगजेबाची उपमा?.
कबरीचा वाद सुरूच... NIA चं पथक संभाजीनगरात, 'पुरातत्व'चं संरक्षण अन्..
कबरीचा वाद सुरूच... NIA चं पथक संभाजीनगरात, 'पुरातत्व'चं संरक्षण अन्...
56 वरून वाद पेटला, चित्रा वाघांचा थेट इशारा; पुन्हा नादाला लागाल तर...
56 वरून वाद पेटला, चित्रा वाघांचा थेट इशारा; पुन्हा नादाला लागाल तर....
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक, 'या' वेळात प्रवास कराल तर...
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक, 'या' वेळात प्रवास कराल तर....
येत्या 48 तासात महाराष्ट्रावर मोठं संकट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट
येत्या 48 तासात महाराष्ट्रावर मोठं संकट, 'या' राज्यांना IMD कडून अलर्ट.
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.