AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitish Kumar : इंडिया आघाडीला पहिला मोठा सुरूंग, आघाडीचं पुढे काय?

मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार आज संध्याकाळी एनडीएच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. नितीश यांच्या या निर्णयाने आरजेडीला मोठा धक्का बसला असून त्याची सत्ता गेली आहे. नितीश यांच्या या 'दगाबाजी'मुळे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे.

Nitish Kumar : इंडिया आघाडीला पहिला मोठा सुरूंग, आघाडीचं पुढे काय?
नितीश कुमारImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 28, 2024 | 12:50 PM

पाटना : बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे. यावरून इंडिया आघाडी (India Alliance) मोठा सुरूंग लागला आहे. ही युती ज्या उत्साहाने सुरु झाली होती त्याच गतीने तुटत असल्याचे चित्र आहे. नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. राजभवनात त्यांनी राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द केला. मिळालेल्या माहितीनुसार, नितीश कुमार आज संध्याकाळी एनडीएच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. नितीश यांच्या या निर्णयाने आरजेडीला मोठा धक्का बसला असून त्याची सत्ता गेली आहे. नितीश यांच्या या ‘दगाबाजी’मुळे काँग्रेसला मोठा फटका बसला आहे. काँग्रेस नेत्यांमध्ये इतका रोष आहे की, त्यांनी नितीश यांची तुलना रंग बदलणाऱ्या सरड्याशी केली आहे. जनता त्यांना कधीही माफ करणार नाही असेही ते म्हणाले. आहा प्रश्न हा पडलाय की आघाडीचे पुढे काय होणार?

आघाडीचं पुढे काय?

भाजपाची शक्ती कमकुवत करण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली. अनेक बैठका झाल्या. एनडीएच्या विरोधात पर्यायाची घोषणा करण्यात आली. वातावरण निर्मितीचा प्रयत्न झाला, मात्र ठोस परिणाम निघाला नसल्याचे चित्र आहे. या सळ्यांमध्ये काँग्रेस मोठा भाऊ म्हणून भूमिका पार पाडत होती. मात्र आता या आघाडीत बिघाडी झाल्याचे दिसत आहे. पश्चिम बंगालमधून ममतांचा एकला चलोचा नारा, दिल्ली आणि पंजाबमधील सामान्य माणसाची वृत्ती आणि या आघाडीचे मुख्य नियोजक नितीशकुमार, एनडीएमध्ये सामील होणे तसेच उत्तर प्रदेशात अखिलेश यादव यांनी काँग्रेसला आपली नेमकी स्थिती सांगणे यामुळे या आघाडीला सुरूंग लागला आहे.

हे सुद्धा वाचा

सध्याची परिस्थिती पाहाता ही युती आपल्या गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्याआधीच तुटत असल्याचं दिसत आहे. यामागचे मूळ कारण असे होते की, ज्या राज्यांत आपला जनमानस गमावला होता, त्या राज्यांतील स्थानिक पक्षांशी हातमिळवणी करून काँग्रेसला आपली ताकद वाढवायची होती. लोकसभा निवडणूकींआधी जागा वाटपांवरून मतभेद होण्याची शक्यता असल्याचे भाकित राजकिय विश्लेषकांकडून अनेकदा वर्तवण्यात आले. ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे इतर पक्षांच्या भूमिकेत बदल होणार का हे येत्या काळात स्पष्ट होईल.

ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग
ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग.
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?
राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?.
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं
ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं.
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही.
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल
नालेसफाईची पोलखोल, मनसे कार्यकर्ते उतरले नाल्यात अन् खेळले हॉलीबॉल.
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं
शुकशुकाट.. युद्धाच्या भितीनं अटारी सीमेवर राहणाऱ्या लोकांनी गाव सोडलं.
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात
युद्धविरामानंतर जैसलमेरमध्ये जनजीवन पूर्वपदावर यायला सुरुवात.
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं
ओवैसींचं पाकला चॅलेंज, चीनचा उल्लेख करत PM शरीफ अन् मुनीरलाच डिवचलं.
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल
भाकरी फिरली! भाजपकडून राज्यात मोठे संघटनात्मक बदल.
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा
तर आम्ही जशात तसं उत्तर देऊ; मोदींचा पाकला करड्या शब्दांत इशारा.