Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मलिक अंबरने जेवढा पाणीप्रश्न सोडवला, तेवढा कोणत्याच जलसंपदा मंत्र्याला जमला नाही : जितेंद्र आव्हाड

उर्दू ही खऱ्या अर्थाने भारतीय भाषा आहे. पण त्या भाषेला आपण एक टोपी आणि एक दाढी लावली आणि सोडून दिली, असं राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड म्हणाले. ते 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या समारोपाप्रसंगी बोलत होते.

मलिक अंबरने जेवढा पाणीप्रश्न सोडवला, तेवढा कोणत्याच जलसंपदा मंत्र्याला जमला नाही : जितेंद्र आव्हाड
Jitendra Awhad
Follow us
| Updated on: Sep 27, 2021 | 1:33 PM

औरंगाबाद : उर्दू ही खऱ्या अर्थाने भारतीय भाषा आहे. पण त्या भाषेला आपण एक टोपी आणि एक दाढी लावली आणि सोडून दिली, असं राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) म्हणाले. ते 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाच्या (Aurangabad Sahitya Sammelan) समारोपाप्रसंगी बोलत होते. मुघल-निजामांच्या काळात मलिक अंबरने औरंगाबादच्या पाण्याचा प्रश्न जेवढा सोडवला तेवढा कोणत्याच जलसंपदा मंत्र्याने सोडवला नाही, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

निजामाला पंडित नेहरूंनी विचारलं तुला भारतात रहायचंय की पाकिस्तानत जायचंय तेव्हा निजाम म्हणाला पाकिस्तानात जायचंय, आणि आज त्याचीच काही माणसं इथे काही नगरपालिका, महानगरपालिका आणि नगर परिषदांवर राज करत आहेत. मराठवाडा हे क्रांतीचं उगमस्थान आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतरही निजामाच्या विरोधात इथली जनता लढत राहिली. मलिक अंबरने औरंगाबादच्या पाण्याचा प्रश्न जेवढा सोडवला तेवढा कोणत्याच जलसंपदा मंत्र्याने सोडवला नाही, असं जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

औरंगाबाद ते अजिंठा आणि वेरूळ अशी लोकल ट्रेन सुरू करा याला माझा पाठिंबा आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

उर्दू खरी भारतीय भाषा

उर्दू भाषा ही खऱ्या अर्थाने भारतीय भाषा आहे. पण त्या भाषेला आपण एक टोपी आणि एक दाढी लावली आणि सोडून दिली. पण तसं नाहीय ती आपली खरी भाषा आहे, असं आव्हाड म्हणाले.

नॉर्मल कॉल नको, व्हॉट्सअॅप कॉल करा

आज सामान्य माणूस सध्या नॉर्मल व्हाईस कॉलवर बोलायला घाबरतो, लगेच व्हॉट्सअॅप कॉल कर म्हणतात, ही अवस्था देशाची आहे, असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांनी मोदी सरकारला टोला लगावला.

अशोक चव्हाणांच्या हस्ते उद्घाटन

महाराष्ट्रात मराठी भाषा विद्यापीठ (Marathi Language University) स्थापन होण्याची शक्यता दाट निर्माण झाली आहे, असे वक्तव्य सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी केलं. सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते हे औरंगाबाद शहरात 41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे दिमाखात उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात ते बोलत होते.

या कार्यक्रमात मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबु बिरादार (Babu Biradar), मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील (Kautikrao Thale Patil), आमदार सतिश चव्हाण, मधुकर अण्णा मुळे, के. एस. अतकरे, मावळते संमेलन अध्यक्ष ऋषीकेश कांबळे, साहित्यिक दादा गोरे यांच्यासह मान्यवर साहित्यिक उपस्थित होते.

संबंधित बातम्या 

महाराष्ट्रात मराठी विद्यापीठ स्थापन होण्याची दाट शक्यता, 41व्या मराठवाडा साहित्य संमेलनात अशोक चव्हाणांचे वक्तव्य

41 व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्या अशोक चव्हाणांच्या हस्ते, दोन दिवस विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण

ईडी कार्यालयाबाहेर कॉंग्रेसचं आंदोलन; खासदार वर्षा गायकवाड जखमी
ईडी कार्यालयाबाहेर कॉंग्रेसचं आंदोलन; खासदार वर्षा गायकवाड जखमी.
ATM: प्रवास करताना पैसे संपले तरी आता धावत्या रेल्वेत पैसे काढता येणार
ATM: प्रवास करताना पैसे संपले तरी आता धावत्या रेल्वेत पैसे काढता येणार.
वाघ्याच्या वादात पडळकरांची उडी, पवारांवर टीकास्त्र तर उदयनराजेंबद्दल..
वाघ्याच्या वादात पडळकरांची उडी, पवारांवर टीकास्त्र तर उदयनराजेंबद्दल...
'दारात आलेल्या कुत्र्याला..', भिडेंच्या आडून राजू पाटलांचा टोला कोणाला
'दारात आलेल्या कुत्र्याला..', भिडेंच्या आडून राजू पाटलांचा टोला कोणाला.
निर्धार नाही, पक्ष बचाव मेळावा आहे; संजय शिरसाट यांची टीका
निर्धार नाही, पक्ष बचाव मेळावा आहे; संजय शिरसाट यांची टीका.
अमरावतीचं माझ्यावर कर्ज,फडणवीस विमानतळाच्या लोकार्पणानंतर काय म्हणाले?
अमरावतीचं माझ्यावर कर्ज,फडणवीस विमानतळाच्या लोकार्पणानंतर काय म्हणाले?.
मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या अंगावर फेकला कोळसा
मुलुंडमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या अंगावर फेकला कोळसा.
'या' जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई अन् तरूणांना लग्नासाठी कुणी मुली देईना
'या' जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई अन् तरूणांना लग्नासाठी कुणी मुली देईना.
मी पोलिसांना शरण येतो; निलंबित रणजित कासलेचा नवा व्हिडीओ
मी पोलिसांना शरण येतो; निलंबित रणजित कासलेचा नवा व्हिडीओ.
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच नाव बदलणार?कोणी केली मागणी, नवं नाव काय?
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाच नाव बदलणार?कोणी केली मागणी, नवं नाव काय?.