AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra politics : आता शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव नॉट रिचेबल; शिंदे गटात सहभागी?

शिवसेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव हे नॉट रिचेबल झाले आहेत. भास्कर जाधव हे कालपर्यंत शिवसेनेसोबत होते. मात्र आता भास्कर जाधव यांचा फोन लागत नसल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. भास्कर जाधव हे देखील शिंदे गटात सहभागी झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Maharashtra politics : आता शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव नॉट रिचेबल; शिंदे गटात सहभागी?
भास्कर जाधव रस्त्यांची दुImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 24, 2022 | 7:52 AM

शिवसेनेला (shivsena) आता आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे गुहागरचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) हे नॉट रिचेबल झाले आहेत. भास्कर जाधव हे कालपर्यंत शिवसेनेसोबत होते. मात्र आता भास्कर जाधव यांचा फोन लागत नसल्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आले आहे. भास्कर जाधव हे देखील शिंदे गटात सहभागी झाले असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असे झाल्यास हा शिवसेनेसाठी मोठा धक्का असणार आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना सध्या अपक्ष आमदार धरून एकूण 49 आमदारांचा पाठिंबा आहे. तर शिवसेनेकडे भास्कर जाधव यांच्यासह काल केवळ 15 आमदार होते. मात्र आता भास्कर जाधव यांचा देखील फोन लागत नाही. ते नॉटरिचेबल आहेत. भास्कर जाधव देखील शिंदे गटात सहभागी झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र अद्याप खात्रीलायक माहिती समोर आलेली नाही.

शिंदे गटातील आमदारांच्या संख्येत वाढ

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी बंडखोरी केल्यापासून शिवसेनेला गळती सुरूच आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या संख्येत वाढ होत आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात आता अपक्ष आमदारांसह एकूण 49 आमदार सहभागी झाले आहेत. या सर्व आमदारांना आसाममध्ये ठेवण्यात आले आहे. या आमदारांना आसाममध्ये ज्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे, त्या हॉटलभोवती मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आमदारांची संख्या कमी होत असल्याने शिवसेनेच्या गोटात चिंतेचे वातावरण आहे. महाविकास आघाडी सरकारपुढील अडचणी वाढल्या आहेत.

हे सुद्धा वाचा

शरद पवारांचा भाजपावर निशाणा

राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काल राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी म्हटले की, या आमदारांना कोण मदत करत आहे. हे आमदार सुरतवरून आसामला कसे पोहोचले. त्यांना तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी कोणी मदत केली, हे सर्वांना माहीत आहे. मला त्यांचे नाव घ्यायची गरज वाटत नाही, असे म्हणत त्यांनी भाजपावर अप्रत्यक्ष निशाणा साधला. तर दुसरीकडे अजित पवार यांनी या प्रकरणात गृहविभाग आणि पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. राज्यात एवढी मोठी घडामोड घडते, याची साधी भनक देखील पोलिसांना कशी काय लागली नाही असा प्रश्न अजित पवार यांनी उपस्थित केला आहे.

पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?
पहलगाम हल्ल्यात मुश्ताक अहमद जरगरचा हात?.
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?
पाकिस्तानचे पश्तून लोक भारतासोबत; काय आहे कारण?.
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश
युद्धाची चाहूल? राज्यांना सुरक्षा यंत्रणांची मॉक ड्रिल घेण्याचे आदेश.
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?
राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी दाखल, काय होणार चर्चा?.
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं
'मेरा ये वतन..', काश्मीरच्या शाळकरी मुलींनी गायलं देशभक्तीचं गाणं.
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन
'तुला पुढे काय शिकायचं?', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा वैभवीला फोन.
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट
विशेष दलाची शोध मोहीम, tv9 चा ग्राऊंड रिपोर्ट.
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड
काहीतरी मोठं होणार? पंतप्रधान मोदींचा लष्कराला फ्री हँड.
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?
पाकसोबतचा वाद, पुतीन यांचा मोदींना फोन, युद्धजन्य परिस्थितीत काय घडतय?.
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन
कशाचे पेढे अन् काय.., 12वीचा निकाल लागताच सुप्रिया सुळेंचा वैभवीला फोन.