Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rajya Sabha Election : आघाडीचा जीव भांड्यात ! भाजपच्या दोन्ही आमदारांचे आक्षेप पीठासीन अधिकाऱ्यानं फेटाळले, आव्हाड, ठाकूरांची मतं वैध

भाजपच्या दोन्ही आमदारांचे आक्षेप पीठासीन अधिकाऱ्यानं फेटाळले.

Rajya Sabha Election : आघाडीचा जीव भांड्यात ! भाजपच्या दोन्ही आमदारांचे आक्षेप पीठासीन अधिकाऱ्यानं फेटाळले, आव्हाड, ठाकूरांची मतं वैध
जितेंद्र आव्हाड, मंत्रीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 10, 2022 | 1:59 PM

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (yashomati thakur) यांच्या मतदानावर भाजपनं (BJP) आक्षेप घेतला होता. आव्हाडांनी मतपत्रिका जयंत पाटलांच्या हातात दिली. तर ठाकूर यांनी मतपत्रिका एजंटला दाखवली. त्यामुळे ही दोन्ही मते बाद करण्याची मागणी भाजपनं केली होती. मात्र, निवडणूक अधिकाऱ्याने ही मागणी फेटाळली असून महाविकास आघाडीचा जीव भांड्यात पडलाय. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी आधीच घोडेबाजार होत असल्याच्या चर्चा होत्या. यातच राजकीय पक्षांनी आपापल्या आमदारांना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवलं होतं. कोणताही आमदार फुटू नये, यासाठी प्रत्येक राजकीय पक्षाकडून खबरदारी घेतली जात होती. आज राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान झालं. यावेळी अगदी एक-एक मतासाठी महाविकास आघाडी आणि भाजपकडून प्रयत्न होत असल्याचंही दिसून आलं. त्यातच आव्हाड आणि यशोमती ठाकूर यांची मते अवैध ठरवण्याची मागणी भाजपनं केली होती. यामुळे महाविकास आघाडीचे नेते आणखी चिंतेत आले होते.

नेमकं काय झालं?

राज्यसभेच्या निवडणुकीचं मतदान सुरू असताना यात दोन पोलिंग एजंटनें तीन मतांवर आक्षेप घेतला. भाजप आमदार पराग आळवणी आणि अतुल सावे यांच्या पोलिंग एजंटने आक्षेप घेतला. यानंतर व्हिडीओ शूटिंग बघितलं जावं, अशी मागणी करण्यात आली. यशोमती ठाकूर, सुहास कांदे, आणि जितेंद्र आव्हाड यांच्या मतदानावर भाजपनं यावेळी आक्षेप घेतला. ठाकूर आणि जितेंद्र आव्हाड यांनी मतपत्रिका एजंटच्या हातात दिली. हातात द्यायची नसते तर दुरून दाखवायची असते, असं त्यावेळी म्हटलं गेलं. दरम्यान, भाजपच्या दोन्ही आमदारांचे आक्षेप पीठासीन अधिकाऱ्यानं फेटाळले आणि महाविकास आघाडीचा जीव भांड्यात पडला.

आव्हाडांची जोरदार टीका

दरम्यान, भाजप नेते बावचाळले, अशी जोरदार टीका मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलीय. जितेंद्र आव्हाड काय म्हणाल पाहा…

हे सुद्धा वाचा

यशोमती ठाकूर यांची टीका

भाजपनं केलेल्या मागणीवर काँग्रेसच्या नेत्या आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की,  महाविकास आघाडीचे उमेदवार येत आहेत. दुसरीकडे मात्र भाजपचे पडत आहेत. जसं महाराष्ट्रात वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न भाजपने केला तसाच प्रयत्न पोलिंग बूथ ठिकाणी करण्यात आला. त्यांचा उमेदवार पडणार लक्षात आल्यानंतर त्यांनी असा प्रयत्न केला, अशी टीका देखील यशोमती ठाकूर यांनी यावेळी केली आहे. तर महाविकास आघाडीच्या इतरही नेत्यांनी यावेळी टीका केलीय.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.