Rahul Gandhi मणिपूरवरुन पायी चालत येणार मुंबईत, शरद पवार-उद्धव ठाकरे सहभागी होऊन साथ देणार का?

काँग्रेसच्या 'भारत न्याय यात्रेला' 14 जानेवारीपासून सुरुवात होईल. राहुल गांधी यावेळी मणिपूरहून मुंबईपर्यंत चालत येणार आहेत. हा यात्रामार्ग एकूण 6200 किलोमीटरचा आहे. एकूण 14 राज्यातून ही यात्रा जाईल. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणूगोपाल यांनी माहिती दिलीय.

Rahul Gandhi मणिपूरवरुन पायी चालत येणार मुंबईत, शरद पवार-उद्धव ठाकरे सहभागी होऊन साथ देणार का?
Rahul Gandhi
Follow us
| Updated on: Dec 27, 2023 | 12:21 PM

नवी दिल्ली : काँग्रेसची ‘भारत न्याय यात्रा’ 14 जानेवारीपासून सुरु होणार आहे. राहुल गांधी यावेळी मणिपूर ते मुंबई यात्रा करणार आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणूगोपाल यांनी बुधवारी ही माहिती दिली. राहुल गांधी यांचा यात्रामार्ग 6200 किलोमीटरचा असणार आहे. 14 जानेवारी ते 20 मार्चपर्यंत ‘भारत न्याय यात्रा’ चालेल. काँग्रेसची ही न्याय यात्रा एकूण 14 राज्यातून जाईल.

काँग्रेसची ही ‘भारत न्याय यात्रा’ 14 राज्य आणि 85 जिल्ह्यांमधून जाणार आहे. मणिपुर, नागालैंड, असम, मेघालय, बंगाल, बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगढ़, यूपी, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र मुंबईत येणार आहे. यात्रामार्ग मोठा आहे. काही ठिकाणी बसने तर काही ठिकाणी पायी प्रवास होईल. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे ‘भारत न्याय यात्रेला’ हिरवा झेंडा दाखवतील.

मणिपूरमधून यात्रेची सुरुवात का?

“मणिपूर देशाचा महत्त्वाचा भाग आहे. आम्ही तिथल्या लोकांच्या जखमेला मलम लावण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही काही राजकीय यात्रा नाही. जे पीडित आहेत, त्या सर्वसामान्य लोकांसाठी ही यात्रा आहे म्हणून मणिपूरमधून यात्रेची सुरुवात होईल” असं काँग्रेस सरचिटणीस वेणुगोपाल यांनी सांगितलं.

यात्रेचा हेतू-उद्देश काय?

काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी सांगितलं की, ‘भारत जोड़ो यात्रा’ भारताला जोडण्यासाठी होती. आता ‘भारत न्याय यात्रा’ असेल. भारत जोड़ो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी मुद्दे उपस्थित केले होते. आर्थिक विषमता, सामाजिक ध्रुवीकरण आणि राजकीय हुकूमशाही. आता भारत न्याय यात्रेचा मुद्दा आर्थिक न्याय, सामाजिक न्याय आणि राजकीय न्याय आहे”

शरद पवार सहभागी होणार का?

राहुल गांधी यांच्या ‘भारत न्याय यात्रेचा’ समारोप मुंबईत होण्याची शक्यता आहे. याआधी त्यांच्या ‘भारत जोड़ो यात्रेत’ आदित्य ठाकरे सहभागी झाले होते. आता राहुल यांची यात्रा मुंबईत येईल, तेव्हा त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सहभागी होतील का? सध्या इंडिया आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरु आहे. इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा चेहरा ठरत नाहीय.

भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार
भाजपचं ठरलं? विधानसभा निवडणुकीत 'इतक्या' जागा लढवणार.
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?
'महाराष्ट्र विकणाऱ्यांमध्ये शिंदेंचं नाव वर...', कोणी केला हल्लाबोल?.
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?
अजित पवार गट भाजप नेत्यांची दिल्लीत तक्रार करणार, पण कारण नेमकं काय?.
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'
एकनाथ खडसेंचा चाकणकरांना खोचक टोला; म्हणाले, 'दुसऱ्याच्या घरात...'.
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत...
चाकणकर अन् रोहिणी खडसेंमध्ये पुन्हा जुंपली, शाब्दिक वॉर बापापर्यंत....
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, आमरण उपोषण सुरूच.
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
'मी मुख्यमंत्रिपदाचा चेहरा', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी
तिकीट कन्फर्म! जागावाटपासंदर्भात बैठक,दादांकडून विद्यमान आमदारांना हमी.
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम
पुण्यात यंदा तब्बल 'इतके' तास विसर्जन मिरवणूक, 2 वर्षांचा रेकॉर्ड कायम.
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?
'पोरांनो...'त्या' भानगडीत पडू नका', इंदुरीकरांचा तरूणांना काय सल्ला?.