AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही : राम शिंदे

रद्द झालेल्या ओबीसी आरक्षणावरून माजी मंत्री राम शिंदे यांनी सरकारला धारेवर धरले आहेय. ओबीसींना आरक्षण पुनर्स्थापन झाले पाहिजे तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, असा पवित्रा राम शिंदे यांनी घेतलाय.

ओबीसींना पुन्हा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही : राम शिंदे
Follow us
| Updated on: Jun 22, 2021 | 11:41 PM

अहमदनगर : रद्द झालेल्या ओबीसी आरक्षणावरून माजी मंत्री राम शिंदे यांनी सरकारला धारेवर धरले आहे. ओबीसींना आरक्षण पुनर्स्थापन झाले पाहिजे तोपर्यंत निवडणुका होऊ देणार नाही, असा पवित्रा राम शिंदे यांनी घेतलाय. ते अहमदनगर येथे टीव्ही 9 मराठीशी बोलत होते. या सरकारमधले मंत्रीच आरक्षणाचा वाद पेटवत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केलाय. तसेच ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात सरकारचा निष्काळजीपणा आणि नाकार्तेपणा समोर आल्याचं त्यांनी म्हटलंय (Ram Shinde warn MVA government over OBC reservation and upcoming election).

“सरकारमधील ओबीसी नेतेच स्वतः मोर्चा आंदोलनाची भाषा करत आहेत”

राम शिंदे म्हणाले, “महाविकासआघाडी सरकारमधील ओबीसी नेतेच स्वतः मोर्चा आंदोलनाची भाषा करत आहेत. ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार स्वतः त्यांचं कुणी ऐकत नाही असं सांगत आहेत. त्यामुळे ओबीसी समाजात असंतोष निर्माण झालाय. ओबीसी समाजाला न्याय देण्यासाठी येणाऱ्या 26 जून रोजी 1 हजार ठिकाणी चक्काजाम आंदोलन करणार आहोत.”

“‘कोणी कोणाचा ऐकायचं नाही ‘ हा एकच सरकारमधील किमान समान कार्यक्रम”

“सरकारमधल्या मंत्र्यांनी निर्णय करायचा असतो, मात्र दुर्दैवाने तेच आंदोलन करत आहेत. ‘कोणी कोणाचा ऐकायचं नाही ‘ हा एकच किमान समान कार्यक्रम या सरकारमध्ये आहे. एका मंत्र्याने घेतलेला निर्णय दुसऱ्याने जाहीर करायचा आणि तिसऱ्याने सांगायचा असं सुरू आहे. कोणी कोणाचं ऐकत नाही, तर मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाही. त्यामुळे मराठा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला,” अशी टीका राम शिंदे यांनी केली.

“मलिदा खाणं आणि एकमेकांची जिरवणे यातच सरकारचा वेळ चाललाय”

राम शिंदे म्हणाले, “सरकारला आरक्षण द्यायचेच नाही. त्यामुळे वेळकाढूपणा चालू असून चांगलं काम करायला वेळ नाही. त्यांचा मलिदा खाणं आणि एकमेकांची जिरवणे यातच वेळ चाललाय. सरकारमध्ये कुठलाही समन्वय नाही. जर ओबीसींचे गेलेले आरक्षण पुन्हा मिळाले नाही, तर तीव्र आंदोलन करू,” असा इशारा शिंदे यांनी राज्य सरकारला दिलाय.

हेही वाचा :

राम शिंदेंना धक्का, जामखेडमध्ये नगराध्यक्षांसह 10 नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीत

राम शिंदेंच्या मुलीचा विवाह सोहळा, रोहित पवार-फडणवीस आमनेसामने आले आणि…

मोठी बातमी: अजित पवार आणि राम शिंदेंची गुप्त बैठक?

व्हिडीओ पाहा :

Ram Shinde warn MVA government over OBC reservation and upcoming election

तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....
पहलगाम दहशतवाद्यांनी 4 वेळा लोकेशन बदललं; घनदाट जंगलात शोध सुरू
पहलगाम दहशतवाद्यांनी 4 वेळा लोकेशन बदललं; घनदाट जंगलात शोध सुरू.
Pahalgam Attack :भारतात बंदी असलेल्या 'या' फोनचा दहशतवाद्यांकडून वापर?
Pahalgam Attack :भारतात बंदी असलेल्या 'या' फोनचा दहशतवाद्यांकडून वापर?.
अणुबॉम्ब डागू शकणाऱ्या 26 राफेल विमानांची खरेदी; नौदलाची ताकद वाढणार
अणुबॉम्ब डागू शकणाऱ्या 26 राफेल विमानांची खरेदी; नौदलाची ताकद वाढणार.
पाक लष्करी जवानांची उडाली घाबरगुंडी, हजारो सैनिकांचे धडाधड राजीनामे
पाक लष्करी जवानांची उडाली घाबरगुंडी, हजारो सैनिकांचे धडाधड राजीनामे.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला 2 महिने; पदाची पाटी मात्र अद्याप तशीच
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याला 2 महिने; पदाची पाटी मात्र अद्याप तशीच.
BIG Update: जंगलातून 22 तास चालले, 'त्या' दहशतवाद्यांची अखेर ओळख पटली!
BIG Update: जंगलातून 22 तास चालले, 'त्या' दहशतवाद्यांची अखेर ओळख पटली!.
'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य
'...तेवढा वेळ दहशतवाद्यांकडे होता?', वडेट्टीवारांचं वादग्रस्त वक्तव्य.
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला
हल्ल्यात मृत झालेल्यांची काय चूक होती? - ओमर अब्दुल्ला.