AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“काँग्रेस रसातळाला गेलाय, गुलाम नबी आझादांप्रमाणे तुम्हीही पक्ष सोडा” आठवलेंचा अशोक चव्हाणांना सल्ला

रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी अशोक चव्हाण यांना मोलाचा सल्ला दिलाय.

काँग्रेस रसातळाला गेलाय, गुलाम नबी आझादांप्रमाणे तुम्हीही पक्ष सोडा आठवलेंचा अशोक चव्हाणांना सल्ला
Follow us
| Updated on: Sep 02, 2022 | 4:20 PM

मुंबई : सणवाराच्या दिवसात महाराष्ट्रात मात्र राजकारणीय चर्चांना उधाण आलंय. कोण-कुणाला भेटतं, काय चर्चा होतेय. काँग्रेस नेते अशोक चव्हाण (Ashok Chavan) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) एकमेकांना भेटल्याची माहिती उघड झाली आहे. या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. अश्यात रिपाईचे नेते रामदास आठवले यांनी अशोक चव्हाण यांना मोलाचा सल्ला दिलाय. “काँग्रेस रसातळाला गेलाय. आता काँग्रेसमध्ये काहीही उरलेलं नाही. काही दिवसांआधी गुलाम नबी आझाद यांनी काँग्रेसला रामराम केला. तसं तुम्हीही पक्ष सोडा”, असा सल्ला रामदास आठवलेंनी अशोक चव्हाणांना दिलाय. गणपतीनिमित्त रामदास आठवले यांची टीव्ही 9 मराठीवर मुलाखत झाली. तेव्हा त्यांनी हे भाष्य केलंय.

ती गुप्त भेट

काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात काल भेट झाली. ही गुप्त भेट आता उघड झाली आहे. अशोक चव्हाण भाजपचे प्रवक्ते आशिष कुलकर्णी यांच्या घरी गणपती दर्शनासाठी गेले होते. तिथेच देवेंद्र फडणवीसही गणपतीच्या दर्शनासाठी आले होते. दोन्ही नेते एकमेकांच्या समोरासमोर आले. त्यांच्यात भेट झाली. तिथे त्यांच्यात काहीवेळ भेट झाली. त्यांच्यात झालेली भेट सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरली आहे. अशोक चव्हाण काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाणार असल्याचं बोललं जात आहे.

हे सुद्धा वाचा

आठवले मनसे भाजप युतीवर काय म्हणाले?

रिपाई नेते रामदास आठवले यांनी राज ठाकरेंच्या व्यक्तीमत्वाचं कौतुक केलं. शिवाय त्यांनी मनसे भाजप युतीवरही भाष्य केलं. “राज ठाकरे चांगले नेते आहेत. सभा होतात. पण त्यांना मतं मिळत नाहीत. त्यामुळे राज ठाकरेंना भाजपने सोबत घ्यावं हे माझं मत नाही. भाजपला तशी आवश्यकताच नाही.राज ठाकरेंना भाजपने सोबत घेतलं तर त्यांना उत्तर भारतीय, साउथ इंडियन मतं मिळणार नाहीत. मनसेला सोबत घेतलं तर देशपातळीवर नुकसान होऊ शकतं. राज ठाकरेंची भूमिका मराठी माणसांसाठी महत्त्वाची आहे. पण मुंबईतल्या इतर लोकांना विरोध करण्याच्या भूमिकेमुळे भाजपाला हे परवडणारं नाही”, असं आठवले म्हणालेत.

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....