AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमच्यात मतभेद असले तरी वैमनस्य नाही, राऊत-फडणवीस भेटीवर रावसाहेब दानवेंचं भाष्य

संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. सरकार पाडण्याचा प्रयत्न नसल्याचे सांगतानाच शिवसेनेशी वैमनस्य नसल्याचं रावसाहेब दानवे यांनी म्हटलं आहे. ( Raosaheb Danve on Sanjay Raut and Devendra Fadnavis meeting)

आमच्यात मतभेद असले तरी वैमनस्य नाही, राऊत-फडणवीस भेटीवर रावसाहेब दानवेंचं भाष्य
Follow us
| Updated on: Sep 27, 2020 | 1:29 PM

औरंगाबाद : शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात गुप्त बैठक झाल्यानंतर राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. राज्यात वेगळी समीकरणं आखली जात आहेत का?, अशी विचारणा होत असतानाच, महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा कोणताही प्रयत्न नसल्याचं, भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी स्पष्ट केलं आहे. त्याचबरोबर, राजकीय मतभेद असले तरी; आमच्यात वैमनस्य नसल्याचं सांगत दानवे यांनी संदिग्धता कायम ठेवली आहे. ( Raosaheb Danve on Sanjay Raut and Devendra Fadnavis meeting)

संजय राऊत-देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठकमुंबईत सांताक्रूज येथील सप्ततारांकित हॉटेल ग्रँड हयातमध्ये संजय राऊत आणि देवेंद्र फडणवीस यांची शनिवारी (26 सप्टेंबर) बैठक झाली. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास बंद दाराआड दोन तास चर्चा झाली. चर्चेचं नेमकं कारण न समजल्याने राजकीय गोटात वेगवेगळ्या चर्चा होत्या. राज्यात वेगळी राजकीय समीकरणं आखली जात आहेत का? अशीही विचारणा होत आहे. रावसाहेब दानवे यांनी याबाबत अधिकचे स्पष्टीकरण देत महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा कोणताही प्रयत्न नसल्याचं सांगितलं.

फडणवीस-राऊत यांच्या भेटीबाबत बोलताना त्यांनी म्हटलंय, “काही दिवसांपूर्वी मी संजय राऊत यांना भेटलो. त्यांनी चहाचं निमंत्रण दिल्याने त्यांच्याकडे गेलो. देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यातही अशीच भेट झाली. दोन पक्षांचे नेते भेटत असतात, चर्चा करत असतात. त्यामुळे अशा भेटींमधून राजकीय अर्थ काढण्यासारखं काहीही नसतं.” तसेच भाजपाची भूमिका स्पष्ट करताना, महाविकास आघाडी सरकार पाडण्याच्या प्रयत्नात नसल्याचंही त्यांनी सांगितलं.

हे ही वाचा : अशा भेटी होतच असतात, चंद्रकांत पाटलांचं सूचक विधान

पुढे बोलताना, एकमेकांच्या पायात पाय घालून महाविकास आघाडी सरकार पडलं तर भाजपाला दोष देऊ नये, असही त्यांनी म्हटलं. त्यामुळे सकारच्या स्थिरतेबद्दल सामान्यांच्या मनात शंका उपस्थित होत आहेत. त्याचबरोबर, राजकीय मतभेद असले तरी आमच्यात वैमनस्य नसल्याचं सांगत दानवे यांनी संदिग्धता कायम ठेवली. त्यामुळे भाजप आणि शिवसेना आगामी काळात एकत्र येणार का?, असा सवाल विचारला जात आहे.

संबंधित बातम्या :

संजय राऊत- देवेंद्र फडणवीस भेटीने आनंद : प्रवीण दरेकर

संजय राऊतांची आधी दानवेंसोबत चर्चा, आता फडणवीसांसोबत गुप्त भेट

सेना-भाजप खूप दूर, देवेंद्र फडणवीस उद्या अजित पवारांनाही भेटू शकतात : सुधीर मुनगंटीवार

( Raosaheb Danve on Sanjay Raut and Devendra Fadnavis meeting)

'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली
'मोदी, फक्त 1 तास...', पहलगाम हल्ल्यावरून बांगर भडकले अन् जीभही घसरली.
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले
राजस्थानजवळ पाकने जैश-ए-मोहम्मदचे 4 दहशतवादी तळ बांधले.
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय
अतिरेक्यांची बंदूक हिसकवण्याच्या प्रयत्नात आदिलनं गमावला जीव, घडलं काय.
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट
'त्यानं जीवाची बाजी लावली अन्', भाजप नेत्याची नजाकत भाईंसाठी खास पोस्ट.
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण
उधमपूरमध्ये दहशतवाद्यांशी चकमक; अली शेख यांना वीरमरण.
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?
'उर्दूही पहिलीपासून शिकवली पाहिजे', शिंदेंच्या नेत्यानं काय म्हटलं?.
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे
खळबळजनक! मालेगावमध्ये 9 ठिकाणी ईडीचे छापे.
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?
पहलगाममध्ये गोळ्या झाडल्या तिथे 25-30 सिलेंडर? अतिरेक्यांचा मोठा डाव?.
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला
पाणी थांबवाल तर श्वास थांबवू म्हणणारा दहशतवादी हाफिज सईद घाबरला.
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई
पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलाची मोठी कारवाई.