राज्यात अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडणार… आता तिसरी आघाडी निर्माण होणार; महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय?

लोकसभा निवडणुकीच्या निकाला नंतर राज्यातील राजकीय समीकरणेच बदलली आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी पक्षांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी स्पेस निर्माण झाली आहे. ही स्पेस घेण्यासाठी आता छोटे राजकीय पक्ष पुढे सरसावले आहेत. त्यामुळेच राज्यात तिसरी आघाडी स्थापन होण्याचे संकेत मिळत आहेत.

राज्यात अभूतपूर्व राजकीय घडामोडी घडणार... आता तिसरी आघाडी निर्माण होणार; महायुती आणि महाविकास आघाडीला पर्याय?
nana patoleImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jul 06, 2024 | 4:31 PM

लोकसभा निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात आता अभूतपूर्व घडामोडी घडणार आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला प्रचंड अपयश आलं. या निवडणुकीत मोदी लाट पूर्णपणे फेल गेल्याने छोट्या छोट्या राजकीय पक्षांचं बळ वाढलं आहे. त्यामुळेच विधानसभा निवडणुकीत आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी छोटे राजकीय पक्ष राज्यात तिसरी आघाडी निर्माण करणार आहे. ही तिसरी आघाडी निर्माण करण्यासाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पुढाकार घेतला आहे. अनेक छोट्या पण ताकदवान पक्षांना सोबत घेऊन रविकांत तुपकर तिसऱ्या आघाडीचा प्रयोग करणार आहेत.

रविकांत तुपकर यांनी मीडियाशी संवाद साधताना तिसरी आघाडी स्थापन करणार असल्याचं स्पष्ट केलं. आम्ही विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. इतर कोणत्याही राजकीय पक्षाची ऑफर आल्यावर आम्ही कार्यकर्त्यांच्या बैठकीत त्याचा निर्णय घेऊ, असं सांगतानाच बच्चू कडू यांच्याशी काल भेट झाली. आम्ही तिसरी आघाडी करण्याच्या तयारीत आहोत. या तिसऱ्या आघाडीत येण्यास बच्चू कडू यांनी होकार दिला आहे. पण जो काही निर्णय घ्यायचा तो आम्ही कार्यकर्त्यांना विचारूनच घेऊ, असं रविकांत तुपकर यांनी स्पष्ट केलं. या संदर्भात राजू शेट्टी यांच्याशी अद्याप कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

तर सहा जागा लढणार

तिसरी आघाडी झाली नाही तर आम्ही स्वबळावर लढण्याचीही तयारी सुरू केली आहे. जिल्ह्यात 6 विधानसभा मतदारसंघात आम्ही स्वतंत्र उमेदवार देणार आहोत. तसा निर्णय आजच्या बैठकीत झाला आहे, असं रविकांत तुपकर यांनी सांगितलं. तसेच तुपकर स्वत: विधानसभेची निवडणूक लढणार आहेत, तशी माहिती त्यांनी दिली.

बैठकीत काय ठरलं?

रविकांत तुपकर यांनी आज कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. यावेळी जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा, खामगाव, जळगांव जामोद आणि मेहकर विधानसभा लढवण्याचा निर्णय झाला. तसेच आजपासून कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. पुन्हा एकदा 13 किंवा 14 जुलै रोजी पुण्यात राज्यातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत राज्यात आणखी कुठे कुठे लढायचे याचा निर्णय होणार आहे. शिवाय राज्यातील, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पालिकात सुद्धा उमेदवार उभे करण्यात येणार असून विधानसभेत स्वबळावर लढायचं की तिसरी आघाडी स्थापन करायची याचाही विचार करण्यात येणार आहे, अशी माहितीही तुपकर यांनी दिली.

शेतकरी आणि दिव्यांगांची ताकद दिसणार

रविकांत तुपकर यांनी तिसरी आघाडी स्थापन केल्यास आणि या आघाडीला राजू शेट्टी तसेच बच्चू कडू यांची साथ मिळाल्यास राज्यात पहिल्यांदाच विधानसभेत शेतकरी आणि दिव्यांगांची ताकद दिसणार आहे. आजपर्यंत जातीय समीकरणावर निवडणूक लढल्या जात होत्या. मात्र, आता पहिल्यांदाच शेतकरी आणि दिव्यांग एकत्र येऊन निवडणूक हाती घेण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळे ही आघाडी कशा स्वरुपात तयार होते आणि आघाडीत कोण कोण सामील होतंय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री
शरद पवारांना सोडून गेलेल्या या 9 जणांना पुन्हा राष्ट्रवादीत नो एन्ट्री.
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा
शरद पवार यांचा अजित पवार यांना मोठा धक्का, बबनराव शिंदेंची मोठी घोषणा.
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी
राज्य मंत्रिमंडळ बैठकीत 'बहिणीं'साठी मोठा निर्णय,41 निर्णयांना मंजुरी.
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?
आम्ही प्रचंड अस्वस्थ, तिसऱ्या आघाडीसंदर्भात काय म्हणाले शरद पवार?.
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?
गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, अभिनेत्याची पहिली प्रतिक्रिया काय?.
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?
आता शांत झोप लागेल का?; भाजप सोडताच हर्षवर्धन पाटील काय म्हणाले?.
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?
सत्ताधारी आमदारांनीच घेतल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या, पण कारण काय?.