AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राजीनामा दिला तो स्वीकारतील का नाही अजून माहित नाही, फडणवीस अजूनही सरकारवर साशंक

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या राजीनाम्याविषयी साशंकता व्यक्त केली आहे.

राजीनामा दिला तो स्वीकारतील का नाही अजून माहित नाही, फडणवीस अजूनही सरकारवर साशंक
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
Follow us
| Updated on: Feb 28, 2021 | 4:17 PM

मुंबई: पहिल्याच दिवशी हे प्रकरण बाहेर आलं त्याच दिवशी राजीनामा यायला हवा होता. एवढे पुरावे असताना मंत्री म्हणून रहायला नको होतं. राजीनामा दिला खरं पण ते स्वीकारतील का नाही अजून माहित नाही, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या राजीनाम्याविषयी साशंकता व्यक्त केली आहे. (Sanjay Rathod resignation Devendra Fadnavis slams Sanjay Rathod and Mahavikas Aghadi Government in Pooja Chavan Suicide case)

हा उशिरा आलेला राजीनामा

खरं म्हणजे पहिल्याच दिवशी प्रकरण पुढं आल्यावर राजीनामा घ्यायला हवा होता. संजय राठोड यांना वरिष्ठांचा आशीर्वीद असल्याचं वाटत असल्यानं राजीनामा द्यायला उशीर झाला. प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसांवर काय कारवाई करणार आहेत? राजीनामा घेतला आहे पण एफआयआर दाखल झाला पाहिजे. बूंद से गयी वो हौदसे नही आती, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

त्या पोलिसांवर कारवाई का नाही?

पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येला 20 दिवस होऊन गेले तरी देखील पोलिसांनी कारवाई केली नाही. या प्रकरणात सर्व पुरावे असताना पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही. त्या पोलिसांवर कारवाई झालं पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. चित्रा वाघ यांनी हा विषया लावून धरला त्यामुळे राजीनामा दिला गेला. माध्यमांनी हे प्रकरण लावून धरल म्हणून हे झाले. राजीनामा झाला, आता एफआयआर करा, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली.

संजय राठोडांना शक्तीप्रदर्शन महागात पडलं?

गंभीर आरोप झाल्यानंतर 15 दिवसांनी संजय राठोड माध्यमांसमोर आले. मात्र, त्यांनी यावेळी आपल्या भोवतीचं संशयाचं धुकं कमी करण्याऐवजी शक्तीप्रदर्शन केलं. विशेष म्हणजे राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने मुख्यमंत्र्यांनी जनतेशी संवाद साधत गर्दी न करता नियम पाळण्याचं आवाहन केलं होतं. त्याला संजय राठोड यांनी हरताळ फासत मोठी गर्दी जमवली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची नाचक्की झाली. कोरोनाचा विचार करुन मुख्यमंत्र्यांसह शरद पवार आणि इतर अनेकांनी आपले दौरे रद्द केले होते. मात्र, संजय राठोड यांनी या काळातही गर्दी जमवत शक्ती प्रदर्शन केल्यानं आघाडी सरकारबाबत चुकीचा संदेश केला. यावरुन भाजपनेही सत्ताधाऱ्यांची चांगलीच कोंडी केली.

संबंधित बातम्या

संजय राठोड यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला! ‘वर्षा’ बंगल्यावर नेमकं काय घडलं?

संजय राठोडांच्या ‘त्या’ 10 चुका ज्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला

(Sanjay Rathod resignation Devendra Fadnavis slams Sanjay Rathod and Mahavikas Aghadi Government)

त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले
त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले.
पिक्चर अभी बाकी है, ऑपरेशन सिंदूरनंतर त्या ट्वीटनं पाकला पुन्हा धडकी
पिक्चर अभी बाकी है, ऑपरेशन सिंदूरनंतर त्या ट्वीटनं पाकला पुन्हा धडकी.
मसुद अझरचं कुटुंब जिथे नेस्तनाभूत झालं, त्या कोटलीमधील फोटो आले समोर
मसुद अझरचं कुटुंब जिथे नेस्तनाभूत झालं, त्या कोटलीमधील फोटो आले समोर.
ऑपरेशन सिंदूरचे 3 मोठे शिकार, 5 टॉप कमांडरचा खात्मा, नावासह फोटो समोर
ऑपरेशन सिंदूरचे 3 मोठे शिकार, 5 टॉप कमांडरचा खात्मा, नावासह फोटो समोर.
दहशतवाद्याना प्रत्युत्तर देण्यास भारताने आपला अधिकार..- परराष्ट्र सचिव
दहशतवाद्याना प्रत्युत्तर देण्यास भारताने आपला अधिकार..- परराष्ट्र सचिव.
निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही अशी काळजी घेतली- कर्नल सोफिया कुरेशी
निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही अशी काळजी घेतली- कर्नल सोफिया कुरेशी.
तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध उघड झाले -परराष्ट्र सचिव मिस्री
तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध उघड झाले -परराष्ट्र सचिव मिस्री.
भारताच्या स्ट्राईकनंतर संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर मसूद अजहर म्हणाला
भारताच्या स्ट्राईकनंतर संपूर्ण कुटुंब ठार झाल्यानंतर मसूद अजहर म्हणाला.
म्हणून दहशतवाद्यांनी पहलगामवर केला हल्ला, परराष्ट्र सचिवांनी सांगितलं
म्हणून दहशतवाद्यांनी पहलगामवर केला हल्ला, परराष्ट्र सचिवांनी सांगितलं.
भारतावर आणखी दहशतवादी हल्ल्याचा डाव? परराष्ट्र सचिवांचा मोठा दावा काय?
भारतावर आणखी दहशतवादी हल्ल्याचा डाव? परराष्ट्र सचिवांचा मोठा दावा काय?.