AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : बंडखोरातही बंडखोरी होऊ शकते, काही आमदार आमच्या संपर्कात; संजय राऊतांचं सूचक विधान

बंडखोरांमध्ये देखील बंडखोरी होऊ शकते. बंडोखोर आमदारांपैकी काही आमदार आमच्या संपर्कात असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Sanjay Raut : बंडखोरातही बंडखोरी होऊ शकते, काही आमदार आमच्या संपर्कात; संजय राऊतांचं सूचक विधान
Follow us
| Updated on: Jun 26, 2022 | 11:13 AM

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांनी शिवसेनेतून (shivsena) बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi government) अस्थिर बनले आहे. शिवसेनेमध्ये फुट पडली आहे. शिवसेनेच्या तब्बल 40 पेक्षा अधिक आमदारांनी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिल्यामुळे महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आल्याचे चित्र आहे. आता यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी रविवारी प्रतिक्रिया दिली. बंडखोरातही बंडखोरी होऊ शकते, काही आमदार अजूनही आमच्या संपर्कात असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. तसेच त्यांनी आम्हालाही रेडिसन ब्लू हॉटेलमध्ये कार्यक्रमासाठी 40 खोल्या लागत होत्या. त्याबाबत आम्ही हॉटेल व्यवस्थापनाला मेल केला आहे. मात्र अद्यापही मेलला उत्तर आले नाही, असे म्हणत आसामच्या मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. अडीच वर्ष मलाईदार खाती होती तेव्हा अन्याय आठवला नाही का?, असा सावलही यावेळी राऊतांनी उपस्थित केला आहे.

नेमकं काय म्हणाले राऊत?

एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसेनेमध्ये फूट पडली आहे. यावर बोलताना राऊत यांनी म्हटले की जरा संयम ठेवा, बंडखोरांमध्ये देखील बंडखोरी होऊ शकते. बंडखोर आमदारांपैक काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. माझं बंडखोर आमदारांना आव्हान आहे की त्यांच्यामध्ये धमक असेल तर त्यांनी आपल्या पदाचे राजीनामे द्यावेत आणि पुन्हा निवडणूक लढावी. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. अडीच वर्ष मलाईदार खाती होती, तेव्हा अन्याय आठवला नाही का असा सवाल राऊतांनी केला आहे. बाळासाहेबांचे भक्त आहोत असे सांगून पाठीत खंजीर खुपसला, अशी घणाघाती टीका यावेळी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर केली आहे.

हे सुद्धा वाचा

‘रोखठोक’मधून निशाणा

संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधील रोखठोक या सदरातून देखील बंडखोरांवर निशाणा साधला आहे. फुटिरांबरोबर सरकार बनवणे म्हणजे अस्वलाच्या गुदगुल्या ठरतील, राणे, भुजबळ मुख्यमंत्री झाले नाहीत मग शिंदे मुख्यमंत्री होणार काय असा सवाल राऊतांनी उपस्थित केला आहे. या बंडखोर आमदारांना भाजपाचीच साथ आहे. भाजप जर मदत करत नसते तर हे आमदार पहिल्यांदा सुरतला गेलेच नसते. सुरतवरून त्यांना स्पेशल विमानाने आसाममध्ये नेण्यात आले. आसाममध्ये देखील भाजपाचेच सरकार आहे. आसाममध्ये भाजपाने या आमदारांची व्यवस्था केली, असा आरोप देखील संजय राऊत यांनी केला आहे.

ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?.
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट.
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज.
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन.
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही.
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्...
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्....
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?.
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय.
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब.