AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादावर शहाजी बापू पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले…

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादावर शहाजी बापू पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय....

बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादावर शहाजी बापू पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...
Follow us
| Updated on: Oct 30, 2022 | 1:16 PM

सांगोला : बच्चू कडू आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यातील वाद आता चांगलाच पेटलाय. यावर सांगोल्याचे, शिंदेगटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. बच्चू कडू यांची नाराजी ही रवी राणा यांच्यावर, त्यांच्या विधानावर आहे. त्यामुळे ही नाराजी शिंदे सरकारवर आहे, असं म्हणता येणार नाही. रवी राणा आणि बच्चू कडू (Bacchu kadu) यांच्यातील वाद लवकरच मिटेल, अशी आशा आहे, असं शहाजीबापू पाटील (ShahajiBapu Patil) म्हणालेत.

बच्चू कडू रवी राणा हे दोन्ही आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शब्द पाळतील, असं शहाजीबापू म्हणालेत.

बच्चू कडू यांनी खोके घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला. त्यावरून बच्चू कडू चिडले. लवकरात लवकर पुरावे द्यावेत. अन्यथा रवी राणा यांनी आपले शब्द मागे घ्यावेत, असं बच्चू कडू म्हणाले. हे प्रकरण सध्या चांगलंच तापलंय. आज दुपारी तीन वाजता रवी राणा मुख्यमंत्री शिंदे यांना भेटणार आहेत. तर संध्याकाळी आठ वाजता बच्चू कडू शिंदेंना भेटण्यासाठी मुंबईला रवाना होणार आहेत.

सांगोला तालुक्यात यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा दौरा केला आहे. सांगोला तालुक्यात उद्धव ठाकरे आले. म्हणून काही फरक पडणार नाही, असंही शहाजीबापू म्हणालेत.

गेली चाळीस वर्षे गणपतराव देशमुख आणि शहाजी पाटील यांचे सांगोला तालुक्यातील घराघरात आपुलकीचे आणि प्रेमाचे नाते आहे. उद्धव ठाकरे सांगोला तालुक्यात आल्याने काही फायदा होणार नाही सांगोला तालुका शेतकरी कामगारांचा पक्षाचा आहे, असं शहाजी बापू पाटील म्हणालेत.

लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण
लाईट इन्फंट्रीचे रायफलमन सुनील कुमार यांना वीरमरण.
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.