AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Subhash Desai : एकनाथ शिंदे हे भाजपच्या पटलावरील प्यादे, सुभाष देसाईंची सडकून टीका

Subhash Desai : आम्ही एक पक्षकार आहोत. जे सरकार स्थापन झालेलं आहे ते बेकायदेशीर आहे. आम्ही आमची बाजू मांडली आहे. वकिलानं आमची बाजू चांगली मांडली आहे. न्यायालय बारकाईनं हे प्रकरण ऐकत आहे. या सुनावणीचा देशावर परिणाम होईल.

Subhash Desai : एकनाथ शिंदे हे भाजपच्या पटलावरील प्यादे, सुभाष देसाईंची सडकून टीका
एकनाथ शिंदे हे भाजपच्या पटलावरील प्यादे, सुभाष देसाईंची सडकून टीकाImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 04, 2022 | 10:36 AM

नवी दिल्ली: शिवसेनेचे नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (cm eknath shinde) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. महाराष्ट्रातील शिंदे सरकार बेकायदेशीर आहे. राज्यात अधिवेशन बोलावणं, नव्या विधानसभा अध्यक्षांची नियुक्ती करणं या सर्व गोष्टी बेकायदेशीर आहेत. त्यालाच आम्ही कोर्टात आव्हान दिलं असून कोर्ट आम्हाला न्याय देईल, असा आम्हाला विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया सुभाष देसाई यांनी व्यक्त केली. तसेच एकनाथ शिंदे हे भाजपच्या (bjp) पटलावरील छोटसं प्यादं आहे. त्यांचा कसा कसा वापर केला जातोय हे दिसून येतंय. पुढे कसा केला जाणार हेही दिसणार आहे, अशी टीकाही सुभाष देसाई यांनी केली. सर्वोच्च न्यायालयात राज्यातील सत्ता संघर्षावर सुनावणी सुरू आहे. त्याकरिता सुभाष देसाई हे कालपासून दिल्लीत तळ ठोकून आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना एकनाथ शिंदे यांना लक्ष्य केलं.

शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आम्ही एक पक्षकार आहोत. जे सरकार स्थापन झालेलं आहे ते बेकायदेशीर आहे. आम्ही आमची बाजू मांडली आहे. वकिलानं आमची बाजू चांगली मांडली आहे. न्यायालय बारकाईनं हे प्रकरण ऐकत आहे. या सुनावणीचा देशावर परिणाम होईल. काल न्यायमुर्तींना लेखी म्हणणं द्यावं असं सांगितलं होते. त्यामुळे शिंदे गटाचे वकील त्यांचं लेखी म्हणणं मांडणार आहे. परंतु एकंदरीत कालचा युक्तिवाद पाहता आम्हाला न्याय मिळेल, असं सुभाष देसाई म्हणाले.

हे सुद्धा वाचा

तेव्हा तेव्हा शिवसेना बहरली

सगळे युक्तीवाद अजून पूर्ण झाले नाहीत. दोघांनाही अजून बाजू मांडण्यासाठी वेळ आहे. जर सर्वांना न्याय दिला असता तर न्यायालयात यावं लागलं नसतं, असं देसाई म्हणाले. शिवसेनेत यापूर्वीही फूट पडलेली आहे. त्यामुळे शिवसेनेला हे प्रकरण नवीन नाही. पण हे प्रकरण जरा मोठं आहे. शिवसेना अशा घटनांतून तावूनसलाखून निघालेली आहे. जेव्हा जेव्हा बंड झालं तेव्हा शिवसेना बहरली. शिवसेना पसरली आहे इतिहासाची पुनरावृत्ती पहायला मिळेल. बंडखोरीनंतर भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक यांचा पराभव पाहायला मिळाला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

महाशक्ती कोण हे उघड झालं

महाशक्ती कोण आता हे उघड झालं आहे. शिंदेना माहिती नाही ते भाजपच्या पटलावरील एक प्यादे आहेत. त्यांचा वापर केला जात आहे. पुढेही केला जाणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.