“बेस्टच्या ताफ्यात अशी बस असतानाही गुजरातहून का आणली?” संजय राऊतांचा संताप; म्हणाले “महाराष्ट्राला कमीपणा दाखवण्यासाठी…”

जर नसती तर ती एका रात्रीत बनवून घेतली असती, तेवढी क्षमता मुंबईत आहे. खास गुजरातहून बस पाठवण्यात आली. गुजरात आहे म्हणून देश आहे, असे दाखवताय का?" असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला.

बेस्टच्या ताफ्यात अशी बस असतानाही गुजरातहून का आणली? संजय राऊतांचा संताप; म्हणाले महाराष्ट्राला कमीपणा दाखवण्यासाठी...
Follow us
| Updated on: Jul 05, 2024 | 10:56 AM

Sanjay Raut On Gujarat Open Deck Bus : टी 20 विश्वचषकातील विजेतेपद मिळवल्यानंतर टीम इंडिया गुरुवारी सकाळी भारतात दाखल झाली. यानंतर भारतीय संघाचे मुंबईत जोरदार स्वागत करण्यात आले. मुंबईतील नरीमन पाईंटपासून वानखेडे स्टेडियमपर्यंत त्यांचे विजयी यात्रा काढण्यात आली. यावेळी टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी एक ओपन बस तयार करण्यात आली होती. ही बस गुजरातला बनवल्याचे त्याच्या नंबर प्लेटवरुन समोर आले आहे. आता शिवसेना नेते संजय राऊत यांनी यावर जोरदार निशाणा साधला.

“बेस्टच्या ताफ्यात अशा प्रकारच्या बस आहेत. जर नसती तर ती एका रात्रीत बनवून घेतली असती, तेवढी क्षमता मुंबईत आहे. पण काल वापरलेल्या बसमुळे महाराष्ट्राला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. मुंबईत सर्व काही असताना तुम्हाला गुजरातमधून या गोष्टी का आणाव्या लागतात”, असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित केला.

महाराष्ट्राला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न

“हा महाराष्ट्राला खालीपणा दाखवण्याचा प्रयत्न आहे. त्याआधीही वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारतीय टीम जेव्हा मुंबईत आली होती, तेव्हा या ठिकाणच्या बस, गाड्यांचा वापर जल्लोष करण्यासाठी केला जात होता. पण काल वापरलेल्या बसमुळे महाराष्ट्राला कमीपणा दाखवण्याचा प्रयत्न केला गेला. संपूर्ण देशात सर्व काही गुजरात आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न सुरु आहे. गुजरात आहे म्हणून देश आहे, हे दाखवण्याचा सतत प्रयत्न सुरु आहे. पण हे जास्त दिवस चालणार नाही”, असेही संजय राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

MCA ने आक्षेप घ्यायला हवा होता

“मुंबईत बेस्टच्या किंवा इतर खासगी बसेस आहेत. याआधीही मुंबईत जेव्हा अशा प्रकारचा जल्लोष झाला होता. महाराष्ट्र हे औद्योगिक केंद्र आहे. या ठिकाणी सर्व काही आहे, उलट तुम्ही आमच्याकडून शिकला आहात. मुंबई क्रिकेट असोसिएशनने यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करायला हवं होतं. तुमच्या क्रिकेट असोसिएशनच्या नावापुढे मुंबई आहे आणि मुंबई महाराष्ट्राची आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या कार्यकारिणीवर अनेक मराठी लोक आहेत. त्यात शिवसेनेचीही लोक आहेत. त्यांनी यावर आक्षेप घ्यायला हवा होता”, असेही संजय राऊतांनी म्हटले.

गुजरात आहे म्हणून देश आहे, असे दाखवताय का?

“मुंबईत क्रिकेटपटूंचे आगमन होतंय, रोहित शर्मा हा मुंबईचा खेळाडू आहे. अनेक खेळाडू हे मुंबई इंडियन्सचे आहेत. मग त्यांच्या स्वागतासाठी तुम्हाला गुजरातहून बस आणावी लागते, याद्वारे तुम्ही काय दाखवू इच्छिता. यापूर्वीही अशाप्रकारे उत्सव झाले तेव्हा मुंबईने जोरदार स्वागत केले आहे. बेस्टच्या ताफ्यात अशा प्रकारच्या बस आहेत. जर नसती तर ती एका रात्रीत बनवून घेतली असती, तेवढी क्षमता मुंबईत आहे. खास गुजरातहून बस पाठवण्यात आली. गुजरात आहे म्हणून देश आहे, असे दाखवताय का?” असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केला.

“वाराणसीमध्ये मोदींचा पराभव होता होता राहिला. मुंबईतही भाजपचा झालेला दारुण पराभव यामुळेच झालेला आहे. मुंबई ही या देशाची आर्थिक राजधानी आहे. मुंबईत सर्व काही आहे. मुंबईतूनच पैसा गुजरातला जातो. इथूनच लूट होते आणि तिथे जाते. एक बस आली म्हणून इतकं काही नाही, पण यातून वृत्ती दिसते. आमचं गुजराती भाषेशी, समाजाशी काहीही भांडण नाही. हे वारंवार मी सांगितलं आहे. मुंबईत मराठी आणि गुजराती हा वाद गुजरातच्या राज्यकर्त्यांनी मोदी शहांनी लावला आहे. आम्ही तो वाद लावलेला नाही. मराठी आणि गुजराती हा वाद नाही. तो कधी असूच शकत नाही. मुंबईत सर्व काही असताना तुम्हाला गुजरातमधून या गोष्टी का आणाव्या लागतात. हा मुंबईला कमी दाखवण्याचा प्रयत्न आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.