‘मोदी, शाहांचे सरकार कुबड्यांवरचे’, संजय राऊत यांचे रोखठोक वक्तव्य, म्हणाले ‘ईडी, सीबीआय नसेल तर…’

ईडी व सीबीआय ही त्यांची तगडी व अवजारे आहेत. व्यापाऱ्यांचे राज्य येते, तेव्हा शौर्य आणि स्वाभिमानाचा ऱ्हास होतो. महाराष्ट्राला आता आपला बाणा दाखवावा लागेल", असे संजय राऊत यांनी सांगितले.

'मोदी, शाहांचे सरकार कुबड्यांवरचे', संजय राऊत यांचे रोखठोक वक्तव्य, म्हणाले 'ईडी, सीबीआय नसेल तर...'
संजय राऊत
Follow us
| Updated on: Jul 07, 2024 | 11:46 AM

Sanjay Raut Target PM Modi : “मोदी-शहांच्या हाती ईडी, सीबीआय नसेल तर ते काहीच करू शकणार नाहीत. महाराष्ट्राला आता आपला बाणा दाखवावा लागेल”, असे आवाहन शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केले आहे. ‘सामना’ वृत्तपत्राच्या ‘रोखठोक’ सदरातून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अमित शाहांवर निशाणा साधला.

“आता आपला बाणा दाखवावा लागेल”

“ब्रिटिशांचे राज्य हे व्यापाऱ्यांचे राज्य होते. ते गेले. गुजरातच्या एका ‘बनिया’ने त्यांना ‘चले जाव’चा आदेश दिला. त्याच गुजरातमधल्या व्यापाऱ्यांचे राज्य पुन्हा देशावर आले. ईडी व सीबीआय ही त्यांची तगडी व अवजारे आहेत. व्यापाऱ्यांचे राज्य येते, तेव्हा शौर्य आणि स्वाभिमानाचा ऱ्हास होतो. महाराष्ट्राला आता आपला बाणा दाखवावा लागेल”, असे संजय राऊत यांनी सांगितले.

व्यापारी हा धाडसी नसतो

“भारतीय जनता पक्षाचे लोक हे व्यापारी आहेत. व्यापारी हा धाडसी नसतो. पंतप्रधान मोदी एकदा म्हणाले होते, “गुजरातचे व्यापारी हे आपल्या जवानांपेक्षा जास्त धाडसी असतात. ते जास्त धोका पत्करतात.” मोदी हे ज्या राज्यातून येतात त्या राज्यातील किती टक्के लोक भारताच्या सैन्यदलात आहेत”, असा प्रश्नही संजय राऊतांनी उपस्थित केला आहे.

हे सुद्धा वाचा

महुआ मोईत्रांच्या भाषणावेळी मोदींनी पळ काढला

“मोदी व शहांसमोर बहुसंख्य खासदारांनी त्यांच्या भाषणात निर्भयपणे सांगितले, ‘ईडी आणि सीबीआय हीच तुमची हत्यारे आहेत. ती नसतील तर तुमच्यात दम नाही. तुम्ही डरपोक शिरोमणी आहात.’ हे खरेच आहे. लोकसभेत प. बंगालच्या महुआ मोईत्रा बोलायला उभ्या राहिल्या तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी सभागृहातून पळ काढला. मोदी यांना उद्देशून महुआ म्हणाल्या, “मि. मोदी, थांबा. माझे भाषण ऐकून जा. माझ्या कृष्णनगर मतदारसंघात तुम्ही दोन वेळा आलात, पण मी विजयी झाले. कृष्णनगरला आपल्याला भेटता आले नाही. तुम्ही माझे भाषण ऐकून जा.” पण श्रीमती मोईत्रा यांचे भाषण ऐकण्याची हिंमत पंतप्रधान मोदी दाखवू शकले नाहीत”, असे संजय राऊत म्हणाले.

“ईडी व सीबीआयच्या कुबड्यांवर”

“कारण त्यांचे सरकार कुबड्यांवरचे आहे. तसे त्यांचे शौर्यही ईडी व सीबीआयच्या कुबड्यांवरचे आहे. मोदी-शहांच्या हाती ईडी, सीबीआय नसेल तर ते काहीच करू शकणार नाहीत. शौर्य वगैरे तर पुढचा विषय”, असे संजय राऊत यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?
देवेंद्र फडणवीस रात्री येऊन ठाकरेंना भेटले ? काय म्हणाले राऊत ?.
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी
कॉंग्रेस देशातील सर्वात बेईमान आणि भ्रष्ट पार्टी - नरेंद्र मोदी.
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.