AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Special Report | शरद पवार आणि राजू शेट्टी यांच्या मैत्रीचा नवा अध्याय, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानातील संघर्ष ते मैत्रीचा राजकीय प्रवास

राष्ट्रवादी काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना विधानपरिषदेची आमदारकी दिली (Raju Shetty-Sharad Pawar Friendship) आहे.

Special Report | शरद पवार आणि राजू शेट्टी यांच्या मैत्रीचा नवा अध्याय, राष्ट्रवादी आणि स्वाभिमानातील संघर्ष ते मैत्रीचा राजकीय प्रवास
Follow us
| Updated on: Jun 20, 2020 | 7:47 PM

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना विधानपरिषदेची आमदारकी दिली आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राजू शेट्टी यांच्या मैत्रीचा अध्याय सुरु झाला आहे. एकमेकांना टोकाचा विरोध ते पक्षाच्या चिन्हावर विधानपरिषद सदस्य असा हा प्रवास आहे. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा शत्रू किंवा मित्र नसतो हे शरद पवार आणि राजू शेट्टी यांच्यात घट होत चाललेल्या मैत्रीवरुन पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वाभिमानीमधील संघर्ष ते मैत्री राजकीय प्रवास या स्पेशल रिपार्टमधून… (Raju Shetty-Sharad Pawar Friendship)

शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर मिळवून देण्याच्या उद्देशाने 20 वर्षांपूर्वी राजू शेट्टी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली. ऊस दराचा प्रश्न कारखानदारांचे संबंधित असल्याने साहजिकच राजू शेट्टी यांनी कारखानदारांना लक्ष करायला सुरुवात केली. तत्कालीन परिस्थितीत राज्यातील बहुतांशी कारखानदार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार या कारखानदारांचे नेते होते आणि आज ही आहेत. त्यामुळे राजू शेट्टी यांचा हा संघर्ष सहाजिकच शरद पवार यांच्यापर्यंत गेला. राजू शेट्टी यांनी संधी मिळेल तेथे तत्कालीन कृषीमंत्री असलेल्या शरद पवार यांच्यावर आरोप केले.

अगदी उसाच्या दरापासून ते कांदा निर्यात बंदीला देखील शेट्टी यांनी पवार यांना जबाबदार धरलं. शरद पवार यांनी राजू शेट्टी यांच्या आरोपाला कधी फारसं गांभीर्यानं घेतलं नसलं तरी सातत्याने होणाऱ्या आरोपामुळे शरद पवार आणि पर्यायाने राष्ट्रवादीच्या राजकीय वाटचालीवर परिणाम होत गेले. स्वाभिमानी आणि राष्ट्रवादीमधील संघर्ष इतका टोकाला गेला की राजू शेट्टी यांनी थेट बारामतीमध्ये जाऊन पवार यांच्या विरोधात आंदोलन केलं.

2014 च्या निवडणुकांमध्ये शेट्टी यांनी पवारांना विरोध म्हणून भाजपसोबत जाणं पसंत केलं. मात्र अवघ्या दोन वर्षात त्यांचा भ्रमनिरास झाला. 2019 ला शेट्टी यांना काँग्रेस राष्ट्रवादी सोबत जाणं भाग पडलं.

2019 च्या निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकासआघाडी सोबत गेली. मात्र शरद पवार यांच्याविरोधात शेट्टी यांनी आंदोलन केलं. तेच शेट्टी कारखानदार आणि शरद पवार यांच्यासोबत एकाच व्यासपीठावर बसणं शेतकऱ्यांना आवडलं नाही. त्याचा परिणाम म्हणून राजू शेट्टी यांना पराभवाला सामोरे जावं लागलं.

मागच्या वर्षी झालेल्या निवडणुकीनंतर शरद पवार आणि राजू शेट्टी यांच्यातील दुरावा संपूर्ण मैत्रीचा एक नवं पर्व सुरू झालं. आता राष्ट्रवादीच्या कोट्यातून शेट्टी यांना विधानपरिषदेवर पाठवण्याचा निर्णय घेऊन शरद पवार यांनी ही मैत्री अधिक घट्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या निर्णयामुळे स्वाभिमानीत अस्वस्थता निर्माण झाली मात्र राजू शेट्टी आपल्या सहकाऱ्यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी झाले आहेत.

देशाच्या राजकारणात मुरब्बी राजकारणी असलेले शरद पवार आपल्यावर झालेल्या आरोपांना थेट उत्तर देत नसले हे त्यांच्या लक्षात असतात. योग्य वेळी ते आपल्या कृतीतून ते दाखवून देतात. राजू शेट्टी यांनी शरद पवार यांच्यावर केलेले टोकाचे आरोप आणि त्यानंतर शरद पवार यांनी मैत्रीसाठी पुढे केलेला हात आजही अनेकांना शंकास्पद वाटत आहे. मात्र तूर्तास तरी स्वाभिमानीला आपलं अस्तित्व टिकवायचं असेल, तर शरद पवार यांचा हात धरुन पुढे जावं लागणार आहे.  (Raju Shetty-Sharad Pawar Friendship)

संंबंधित बातम्या : 

राजू शेट्टींच्या विधानपरिषदेचा मार्ग मोकळा, स्वाभिमानीतील वाद मिटला

तुम्ही आमदारकी स्वीकारावी, ही शेतकऱ्यांची भावना, राजू शेट्टी यांना महिला प्रदेशाध्यक्षाचं रक्ताने लिहिलेलं पत्र

पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO
पाक पंतप्रधानाच्या सल्लागाराचं घर बॉम्बस्फोटानं हादरलं, बघा VIDEO.
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती
तहानलेल्या पाकने गुडघे टेकले...भारताला थेट पत्र, केली 'ही' एकच विनंती.
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?
अझहरला सरकारकडून 14 कोटी, पाकमध्ये पुन्हा अतिरेक्यांचे अड्डे होणार?.
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा...
पाकच्या अणुबॉम्ब अड्ड्यावर हल्लामुळे रेडिएशन? किराना हिल्सचा मुद्दा....
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?
सोफिया कुरेशींबद्दल भाजप मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, काय म्हणाले?.
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार
आमची मध्यस्थी, भारत-पाकचा वाद अमेरिकेने मिटवला,ट्रम्प यांचा पुनरूच्चार.
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला
मुंबईचा पहिला केबल-स्टे उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला.
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य
भारतानं कबरडं मोडलं पाकिस्तान वठणीवर, संरक्षण मंत्र्याचं मोठं वक्तव्य.
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं मोठं नुकसान.
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं
चीनविरोधात मोठी भारताची अ‍ॅक्शन, तणावादरम्यान खोटा प्रचार करणं भोवलं.