AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray : ‘…तर तुमच्या वजनानेच बाबरी पडली असती’, फडणवीसांच्या अयोध्या दौऱ्याच्या दाव्यावर उद्धव ठाकरेंचा जोरदार टोला

देवेंद्र फडणवीस यांच्या अयोध्येच्या दाव्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार टोला लगावलाय. 'तुम्ही खरच तिकडे गेला होतात तर नुसता चढायचा प्रयत्न केला असता तरी बाबरी तुमच्या वजनाने खाली आली असती', असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray : '...तर तुमच्या वजनानेच बाबरी पडली असती', फडणवीसांच्या अयोध्या दौऱ्याच्या दाव्यावर उद्धव ठाकरेंचा जोरदार टोला
उद्धव ठाकरे, शिवसेना पक्षप्रमुखImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 9:17 PM

मुंबई : राज्यात सध्या हिंदुत्वाचा (Hindutva) मुद्दा चांगलाच गाजतोय. अयोध्या आणि बाबरी मशिदीवरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बाबरी मशिद पाडली त्यावेळी अयोध्येत होतो असा दावा केला होता. तेव्हा शिवसेनेचा एकही नेता तिथे नव्हता असा दावाही फडणवीस यांनी केला होता. फडणवीसांच्या याच दाव्यावर आता शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार टीका केलीय. ‘तुम्ही खरच तिकडे गेला होतात तर नुसता चढायचा प्रयत्न केला असता तरी बाबरी तुमच्या वजनाने खाली आली असती’, असा जोरदार टोला उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना लगावलाय.

फडणवीसांच्या दाव्यावर जोरदार टीका

उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘ते म्हणतात बाबरीच्या वेळेला शिवसैनिक नव्हतेच. मी गेलो होतो म्हणे तिकडे. अरे तुमचं वय काय? शाळेच्या सहलीला गेला होतात? चला चला चला अयोध्येला चला, बाबरी बघायला चला… तुम्ही आमच्यावर शंका उपस्थित करताय तर माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही तरी हिंदुत्वासाठी काय केलं? देवेंद्रजी तुम्ही खरच तिकडे गेला होतात तर नुसता चढायचा प्रयत्न केला असता तरी बाबरी तुमच्या वजनाने खाली आली असती. या लोकांना श्रमच करावे लागले नसते. तुम्ही एक पाय ठेवला असता तरी बाबरी खाली आली असती’

बाळासाहेबांची अयोध्येतील ‘ती’ आठवणही सांगितली

‘मला आठवतंय, मी साक्ष आहे. लाखोंच्या संख्येनं सगळ्यांना अयोध्याला बोलावलं होतं. त्यात शिवसैनिकही होती. अडवाणींचा मुलाखतीचा तो व्हिडीओ आहे. ते म्हणाले की ती लोकं चढली होती ती मराठी होती. प्रमोदला सांगितलं की जा त्यांना सांग. प्रमोद गेला पण त्यांचंही ती लोकं ऐकायला तयार नव्हती. मग प्रमोदचं न ऐकणारी लोकं कोण होती? तो दिवस, तो प्रसंग मला आजही आठवतो. टीव्हीवर सुरु होतं. लोकं चढलेत आणि बाबरी पाडली बाबरी पाडली. जुनं मातोश्री होतं, धावत गेलो आणि बाळासाहेबांना सांगितलं की बाबरी पाडली. बाळासाहेब म्हणाले बाबरी पाडली अरे वा… तेवढ्यात इंटरकॉमची बेल वाजली. बाळासाहेबांनी फोन घेतला. तिकडून कुणीतरी बोलत होतं. एवढंच म्हणाले मग… चांगलंय की मग… शिवसैनिकांनी पाडलं असेल तर मला त्याचा गर्व आहे, मला अभिमान आहे. फोन ठेवला की मला म्हणाले, ही कसली याची औलाद. लोकांना बोलावतात कार सेवा करा… म्हणजे काय अयोध्येला येऊन गाड्या धुवायच्या? हे असलं नेतृत्व काय कामाचं’, अशी आठवण सांगत उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांची एक आठवणही सांगितली.

हे सुद्धा वाचा

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.