Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नसणाऱ्या मातृसंस्थेच्या पिल्लांनी सावरकरांवर बोलू नये; उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल

संघ स्वातंत्र्य लढ्यात नव्हता. संघाला आता 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान काय आहे? हे आधी सांगा. बाष्कळपणा बंद करा.

स्वातंत्र्य लढ्यात सहभागी नसणाऱ्या मातृसंस्थेच्या पिल्लांनी सावरकरांवर बोलू नये; उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्लाबोल
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 17, 2022 | 12:21 PM

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर टीका केल्यानंतर भाजपने ठाकरे गटाला घेरण्यास सुरुवात केली आहे. भाजपच्या या टीकेला खुद्द उद्धव ठाकरे यांनीच उत्तर दिलं आहे. राहुल गांधी यांच्या त्या विधानाशी आम्ही सहमत नाही, असं सांगतानाच स्वातंत्र्य लढ्यात ज्यांचा कधीच सहभाग नव्हता, अशा मातृसंस्थांच्या पिल्लानी आम्हाला सावरकरांविषयी प्रश्न विचारू नये. पंतप्रधानांना भारतरत्न पुरस्कार देण्याचे अधिकार असतात. तरीही 8 वर्षात सावरकरांना भारतरत्न पुरस्कार का दिला नाही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळाला अभिवादन केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांवरील चित्रप्रदर्शनाला भेट दिली. त्यानंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. सावरकरांचा मुद्दा उपस्थित केला हे बरं झालं. सावरकरांबद्दल आमच्या मनात प्रेम आहे. नितांत आदर आहे. ज्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नव्हता. अशा मातृसंस्थांच्या पिल्लांनी आम्हाला प्रश्न विचारावा हे दुर्देव आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

हे सुद्धा वाचा

संघ स्वातंत्र्य लढ्यात नव्हता. संघाला आता 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यांचं स्वातंत्र्य लढ्यातील योगदान काय आहे? हे आधी सांगा. बाष्कळपणा बंद करा. आपल्या मातृसंस्थेचा स्वातंत्र्य लढयात भाग नव्हता त्यांनी आम्हाला प्रश्न विचारू नये. असं सांगतानाच निजामांच्या काळात हिंदूंवर अत्याचार होत होते. त्यावेळी तुमची मातृसंस्था कुठे होती? त्यांनी हिंदूंवरील किती अत्याचार थांबवले? असा सवालच त्यांनी केला.

तसेच पंतप्रधानांकडे भारतरत्न देण्याचे अधिकार असतात. मग गेली 8 वर्ष सावरकरांना भारतरत्न का दिला नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. राहुल गांधी यांच्या विधानाशी आम्ही सहमत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बाळासाहेब ठाकरे यांचं स्मारक होत आहे. त्यामुळे जिवंत अनुभव स्मारकात पाहता येणार आहे. त्याचं सादरीकरण झालं. व्यंगचित्रकार ही बाळासाहेबांची ओळख होती. बाळासाहेबांवरील चित्रं आणि व्यंगचित्रं असतील तर द्या, असं ते म्हणाले.

काही लोकांना बाळासाहेब समजायला दहा वर्ष लागली. बाळासाहेबांविषयी प्रेम आणि भावना व्यक्त केली पाहिजे. फक्त त्याचा बाजार करू नये. बाजारूपणा करू नये. कृती असावी. विचार असावा. बाजार कोणी मांडू नये. प्रेम श्रद्धा समजू शकतो. त्यांना साजेसं काम करावं, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नाव न घेता लगावला.

मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल
मनसेच्या पहिल्या मुंबई अध्यक्षांचा 'तो' व्हिडिओ व्हायरल.
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार
सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी फडणवीसांचा अॅक्शन प्लॅन तयार.
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल
राज ठाकरेंनी फिरवली भाकरी; पराभवानंतर पक्ष संघटनेत केले 'हे' मोठे बदल.
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका
'जयंत पाटील हा घर घर लागलेला माणूस..', गोपीचंद पडळकरांची टीका.
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली
खोक्या भोसलेच्या बायकोची प्रकृती खालावली.
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका
नवहिंदुत्ववादाच्या राजकारणावरून राऊतांची भाजपवर टीका.
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा.
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.