‘त्या’ दिवशी भाजप अर्धा फुटलेला असेल; उद्धव ठाकरे यांनी तारीखच सांगितली

"हे दगाबाज आहेत. घरात घुसले तर आग लावून पळतात बाहेर. आमचं सोडा. आमच्या ताकदीने आम्ही आहोत. मोदी आणि भाजपसमोर कोणता प्रश्न असेल की भाजपचं काय होईल?", असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

'त्या' दिवशी भाजप अर्धा फुटलेला असेल; उद्धव ठाकरे यांनी तारीखच सांगितली
उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: May 16, 2024 | 7:13 PM

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीची शेवटच्या टप्प्याच्या मतदानासाठीची रणधुमाळी सुरु आहे. लोकसभेच्या शेवटच्या टप्प्याच्या प्रचारासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिलेले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीतील अनेक नेते आपल्यासोबत येतील, असा दावा केला आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप पक्षाच्या फुटीबाबतची भविष्यवाणी वर्तवली आहे. विशेष म्हणजे यासाठी उद्धव ठाकरेंनी तारीख देखील सांगून टाकली आहे. त्यामुळे आगामी काळातल्या राजकीय घडामोडी या अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत. उद्धव ठाकरे यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला विशेष मुलाखत दिली. ‘टीव्ही 9 मराठी’चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या भवितव्याबद्दल मोठं भाकीत वर्तवलं.

“मला चिंता आहे की, ४ जूनला सरकार जातंय. त्या दिवशी अर्धा भाजप तिथेच फुटेल. परत पंतप्रधानपद गेलेलं असेल. त्यांनी ७५ वर्षाची अट टाकलेली आहे. दोन वर्षांनी मोदी रिटायर होणार. मग भाजपचं काय होईल? एक जमाना असा होता, की अटलबिहारींचा पराभव झाला होता. दोनच खासदार भाजपचे होते. पुन्हा ३०२ वरून दोन झाले तर काय करतील भाजपवाले? यांना कुठे विलीन व्हायला पक्षही राहणार नाही. यांना कोणीही घेणार नाही, असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला.

“हे दगाबाज आहेत. घरात घुसले तर आग लावून पळतात बाहेर. आमचं सोडा. आमच्या ताकदीने आम्ही आहोत. मोदी आणि भाजपसमोर कोणता प्रश्न असेल की भाजपचं काय होईल. कारण मोदींचा चेहराही राहिला नाही. सत्ता गेल्यावर त्यांच्याकडे आलेले उंदीर कोणत्या दारात जाणार? कारण आता दारंही राहिली नाहीत. पुन्हा हे गद्दार पक्ष काढणार का?”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

‘गंगेच्या साफ सफाईचं काय झालं?’

“परवा मोदींनी अर्ज भरला. त्यावेळी त्यांची मुलाखत घेतली. २०१४ मध्ये गंगा माँ ने बुलाया था. आता गंगा माँने मला दत्तक घेतलं असं मोदी म्हणाले. त्या गंगेत कोरोनाच्या काळात प्रेते तरंगली. तेव्हा गंगेचे अश्रू का पुसले नाहीत? का तिचे अश्रू पाहिले नाही? काही तरी बोलत आहे. गंगेच्या साफ सफाईचं काय झालं? काहीतरी बोलत आहेत. का तुम्हाला दत्तक घेतलं जात आहे?”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

‘मला कठपुतळ्यांबद्दल बोलायचं नाही’, ठाकरेंचा शिंदेंवर घणाघात

“मिंधे हा या निवडणुकीत विषय होऊ शकत नाही. त्यांची योग्यता नाही. ते फक्त कठपुतली आहेत. आम्ही भाजपसोबतच होतो. २५ ते ३० वर्ष भाजपसोबत होतोच ना. कसे वागले ते? तुम्ही अडीच वर्ष भोगलंत ना सगळं? म्हणून मला कठपुतळ्यांबद्दल बोलायचं नाही”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.