AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वडेट्टीवारांकडून ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, मेटेंचा आरोप

आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातंय' अशी राज्य सरकारची अवस्था आहे, असेही विनायक मेटे म्हणाले. (Vinayak Mete Comment on Maratha Reservation Issue) 

वडेट्टीवारांकडून ओबीसी आणि मराठा समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न, मेटेंचा आरोप
Follow us
| Updated on: Sep 26, 2020 | 8:43 AM

सातारा : मराठा आरक्षणाबाबत योग्य दिशा ठरविण्यासाठी आणि मराठ्यांची एकी वाढवण्यासाठी येत्या 3 ऑक्टोबरला पुण्यात मराठा विचार मंथन बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी या बैठकीचे निमंत्रण छत्रपती खासदार उदयनराजे भोसले यांना दिले. यावेळी त्यांनी महाविकासआघाडीवर जोरदार निशाणा साधला. (Vinayak Mete Comment on Maratha Reservation Issue)

मराठा आरक्षणाबाबत गांभीर्याने घेण्याचं काम हे सरकार करत नाही. मराठा समाजामध्येही एकी दिसून येत नाही. त्यामुळे येत्या 3 ऑक्टोबरला पुण्यात संपूर्ण राज्यातील मराठा समाजातील प्रमुख मंडळी एकत्र आणण्याचे काम केलं जाणार आहे. यावेळी ‘मराठा विचार मंथन’ बैठकीच्या माध्यमातून पुढील काळात मराठा आरक्षणाबाबत नेमकी दिशा काय असणार हे यात ठरवले जाणार आहे, अशी माहिती विनायक मेटे यांनी साताऱ्यातील पत्रकार परिषदेत दिली.

“ओबीसी आणि मराठा समाजात काही नेते मंडळी तेढ निर्माण होतील असे वक्तव्य करत आहेत. यामध्ये मंत्री विजय वडेट्टीवार हेच पुढाकार घेत आहेत. वडेट्टीवारांसारखी मंडळी राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचे काम करत असल्याचा आरोप मेटे यांनी केला. ‘आंधळं दळतय आणि कुत्रं पीठ खातंय’ अशी राज्य सरकारची अवस्था आहे, असेही विनायक मेटे म्हणाले.”

गृह आणि आरोग्य खाती राष्ट्रवादीकडे, तेच भरती काढतात

“मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर गृहखात्यापाठोपाठ आरोग्य खात्यानेही भरती काढली आहे. ही दोन्ही महत्त्वाची खाती राष्ट्रवादीकडे आहेत आणि तेच भरती काढत आहेत.

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार मात्र आरक्षणावर मार्ग काढायचा आहे असे म्हणतात, पण त्यावर मार्ग काढत नाहीत. याबाबत त्यांना मी अनेकदा बोललो आहे. ते राज्यातील छोटे-छोटे प्रश्न सोडवतात मग हा आरक्षणाचा प्रश्न का सोडवत नाहीत,” असा सवाल मेटेंनी उपस्थित केला.

“हे राज्य हा देश..हिंदवी स्वराज्य..हे छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे. अशा थोर व्यक्तींचे वंशज त्यांच्या गादीला आदर आहे. अशा व्यक्तींनी समाजाला दिशा द्यावी यासाठी छत्रपती उदयनराजे भोसले हे यातून योग्य मार्ग काढतील यासाठी “मराठा विचार मंथन” बैठकीच्या निमंत्रणासाठी साताऱ्यात आलो असल्याचे विनायक मेटे यांनी सांगितले.”

मुख्यमंत्र्यांना कोणी चांगला सल्ला देत नाही

“महाआघाडी सरकारमध्ये मराठा समाजाचे नेते आहेत. ते आरक्षणाबाबत पुढाकार घेत नाहीत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्रीच्या बाहेर पडत नाहीत आणि त्यांना कोणी चांगला सल्ला देत नाही,” असा मिश्किल टोला विनायक मेटेंनी लगावला. (Vinayak Mete Comment on Maratha Reservation Issue)

संबंधित बातम्या : 

Dhangar reservation Live : ..तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर आंदोलन करु : गोपीचंद पडळकर

डिजिटल तंत्रज्ञानाच्या मदतीने कोरोना संकटावर मात करू: उद्योगमंत्री सुभाष देसाई

ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान
ऑपरेशन सिंदूर आता फक्त स्थगित केलंय... पंतप्रधान मोदींचं मोठं विधान.
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?
Operation Sindoor हे फक्त नाव नाही तर... पंतप्रधान मोदी काय म्हणाले?.
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट
ऑपरेशन सिंदूरवर पहिल्यांदाच बोलताना मोदींकडून भारतीय लष्कराला सॅल्यूट.
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज
असीम मुनीरनं असं काही केलं की पाकिस्तानी लोकांनाही वाटेल त्याची लाज.
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन
अतिरेक्यांच्या अंत्ययात्रेचा धक्कादायक व्हिडीओ, पाक आर्मी, राजकारणी अन.
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही
भारत-पाकच्या DGMO मधील फोनवरील चर्चा संपली, पाकनं दिली मोठी ग्वाही.
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्...
शाहिद आफ्रिदी मोठ्या भ्रमात... म्हणतो पाकचा विजय, रॅली काढली अन्....
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता LIVE, नेमकं काय बोलणार?.
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, आधी युद्धविरामासाठी विनंती अन् आता म्हणताय.
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब
जम्मूच्या एका गावातील भिंतीत आढळला जिवंत बॉम्ब.