AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Guruwar Vrat : गुरूवारचे व्रत कधीपासून सुरू करावे? व्रताचे महत्त्व आणि नियम

स्त्री आणि पुरुष दोघेही गुरुवारचा उपवास करू शकतात. काही लोकं नवस पूर्ण होईपर्यंत हे व्रत करतात. 16 गुरुवारी उपवास करणे चांगले मानले जाते. याशिवाय 1, 3, 4, 7 किंवा एक वर्षासाठी ठेवता येईल.

Guruwar Vrat : गुरूवारचे व्रत कधीपासून सुरू करावे? व्रताचे महत्त्व आणि नियम
भगवान विष्णू Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 04, 2024 | 8:17 AM

मुंबई : गुरुवारच्या व्रताला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूची पूजा करून व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. वास्तविक, आठवड्यातील गुरुवार हा भगवान विष्णू नारायण आणि बृहस्पती म्हणजेच गुरू देव यांना समर्पित आहे. अशा स्थितीत या दिवशी व्रत आणि उपासनेचे महत्त्व अधिक वाढते. मान्यतेनुसार, गुरुवारी व्रत (Guruwar Vrat) केल्यास भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. याशिवाय लग्नाशी संबंधित समस्याही दूर होतात. त्यामुळे जर तुम्हीही गुरुवारी उपवास ठेवणार असाल तर त्याआधी या व्रताशी संबंधित नियम जाणून घ्या.

या दिवसापासून गुरुवारचे व्रत सुरू करा

पौष महिन्यात गुरुवारी व्रत करू नये. गुरुवारी व्रत सुरू करण्यासाठी अनुराधा नक्षत्र आणि महिन्यातील शुक्ल पक्षाची तिथी शुभ मानली जाते. असे म्हटले जाते की या तारखांना गुरुवार व्रत सुरू केल्याने भगवान विष्णू आणि बृहस्पतिचे अपार आशीर्वाद मिळतात. जे लोकं आधीच गुरुवारी उपवास करतात ते पौष महिन्यात पूजा आणि उपवास करू शकतात.

एखाद्याने किती गुरुवारी उपवास करावा?

स्त्री आणि पुरुष दोघेही गुरुवारचा उपवास करू शकतात. काही लोकं नवस पूर्ण होईपर्यंत हे व्रत करतात. 16 गुरुवारी उपवास करणे चांगले मानले जाते. याशिवाय 1, 3, 4, 7 किंवा एक वर्षासाठी ठेवता येईल.

हे सुद्धा वाचा

गुरुवार व्रताचे नियम

  • गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करून व्रताचा संकल्प घ्यावा.
  • यानंतर भगवान विष्णू आणि भगवान बृहस्पति यांचे ध्यान करा.
  • गुरुवार व्रत : भगवान नारायणाला पिवळे वस्त्र, फुले, फळे, मिठाई इत्यादी अर्पण करा.
  • यानंतर गुरुवार व्रताची कथा वाचा.
  • पूजेत केळी आणि केळीच्या पानांचा अवश्य वापर करा.
  • पूजेनंतर भगवान विष्णूची आरती करावी.
  • गुरुवारच्या उपवासात तुम्ही दिवसातून एकदा मीठाशिवाय अन्न घेऊ शकता.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'जिथे खड्डे खोदले तिथेच..', वक्फच्या अधिकाऱ्यांना जलील यांची धमकी
'जिथे खड्डे खोदले तिथेच..', वक्फच्या अधिकाऱ्यांना जलील यांची धमकी.
मी निवडून आलो असतो, तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते - शहाजी बापू पाटील
मी निवडून आलो असतो, तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते - शहाजी बापू पाटील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर.
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार.
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.