AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nadi Dosh : काय असतो नाडी दोष? ज्यामुळे वैवाहिक जीवनात येतात समस्या

ज्योतिषांच्या मते नाडी दोष असल्यास वैवाहिक जीवन खूप कठीण होते. घटस्फोटही अनेक प्रसंगी होतात. यासाठी नाडी दोष असल्यास लग्न करू नये.

Nadi Dosh : काय असतो नाडी दोष? ज्यामुळे वैवाहिक जीवनात येतात समस्या
नाडी दोष काय असतोImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: May 02, 2023 | 9:20 PM

मुंबई :  हिंदू परंपरांमध्ये विवाहापूर्वी मुला मुलींची पत्रिका जुळविण्याची प्रथा आहे. पत्रिका मिलनावरून कळते की वधू-वरांचे वैवाहिक जीवन कसे असेल? यातून नाडी दोष, भकूट दोष, गण, मैत्री स्वभाव इ. पत्रिका पाहतांना नाडी किंवा भकूट दोष आढळल्यास विवाहानंतर समस्या निर्माण होतात. यामध्ये नाडी दोष असल्यास लग्न न करण्याचा सल्ला दिला आहे. ज्योतिषांच्या मते नाडी दोष असल्यास वैवाहिक जीवन खूप कठीण होते. घटस्फोटही अनेक प्रसंगी होतात. यासाठी नाडी दोष असल्यास लग्न करू नये. असे असूनही, जर वधू-वरांना एकमेकांशी लग्न करायचे असेल तर ते ज्योतिषी सल्ला घेऊन लग्न करू शकतात. तर चला नाडी दोषाबद्दल सर्व काही जाणून घेऊया.

नाडी दोष म्हणजे काय ?

ज्योतिषांच्या मते वधू आणि वर दोघांची नाड एकच असेल तर हा दोष लागतो. ज्योतिषशास्त्रानुसार नाडीचे अनुक्रमे आदि नाडी, मध्य नाडी, अंत्य नाडी असे तीन प्रकार आहेत.

नाडी दोष प्रभाव

जर वधू आणि वर दोघांची नाडी समान असेल तर उपाय अनिवार्य आहे. जर वधू आणि वर यांनी उपाय न करता लग्न केले तर मुलीला म्हणजेच वधूला गर्भधारणेत समस्या येऊ शकतात. त्याच वेळी असामान्य मूल देखील जन्माला येऊ शकते. नाडीत बिघाड झाला की अचानक त्रास होत राहतो. त्याच वेळी वधू आणि वर यांच्यातील संबंध अत्यंत कटू राहतात. या परिस्थितीत नातं तोडण्याची देखील शक्यता उद्भवते. मध्य नाडी दोष असल्यास वधू-वरांपैकी एकाचा किंवा दोघांचा मृत्यू होण्याची शक्यता असते.

हे सुद्धा वाचा

नाडी दोष दूर करण्यासाठी काय करावे ?

नाडी दोष दूर करण्यासाठी वधू आणि वर दोघांनी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. यासोबतच नाडी दोष रोखणे अनिवार्य आहे. याशिवाय नाडी दोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी गाय, सोन्याचे धान्य, अन्न, वस्त्र यांचे दान करावे. अनेक ज्योतिषी नाडी दोष दूर करण्यासाठी वजनाच्या समान अन्न दान करण्याची शिफारस करतात.

नाडी दोष असलेल्या स्त्रिया आणि पुरुषांनाही शास्त्रात भगवान विष्णूच्या मूर्तीशी विवाह करण्याचे सांगितले आहे. या उपासना पद्धतीमुळे दोषाचा प्रभाव कमी करता येतो. विद्वान ज्योतिषाचा सल्ला घेतल्यानंतर हे करणे योग्य ठरेल. सोन्याचे दान केल्याने नाडीचे दोषही दूर होतात. अन्नदान केल्याने नाडी दोषांचा प्रभावही कमी होतो. सोन्याने बनवलेल्या नागाच्या आकाराचे दान केल्यानेही या दोषाचा प्रभाव कमी होतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)