Saturn Transit 2025 : सावधान! ‘या’ तीन राशींच्या आयुष्यात येणार भूकंप; शनि आणि राहू एकत्रितपणे करतील तांडव
Saturn Transit Effect On Zodiac Signs : तब्बल ३० वर्षांनंतर शनिदेव मीन राशीत भ्रमण करणार आहेत. त्यामुळे लवकरच शनिदेवाचे संक्रमण होणार आहे. याचा काही राशींच्या जीवनावर वाईट परिणाम होणार आहे.

३० वर्षांनंतर, शनिदेव मीन राशीत भ्रमण करणार आहेत. त्यामुळे लवकरच शनिदेवाचे संक्रमण होणार आहे. ज्योतिषशास्त्रात हे संक्रमण वाईट मानले जाते. हे महागोचर होताच, तीन राशींवर पिशाच योग तयार होईल. येत्या 29 मार्च रोजी हे संक्रमण होणार आहे. यामुळे या तीन राशींच्या अंतर्गत जन्मलेल्या लोकांना जीवनात अडचणी येऊ शकतात. त्यांना खूप सावधगिरी बाळगावी लागते. शनि आणि राहू हे एकत्रितपणे कोणतेही सामान्य संयोग तयार करत नाहीत. हे एक भयानक विनाशकारी संयोजन आहे.
‘या’ राशींनी ताकही फुंकुन प्याव..
मीन रास
मीन राशीच्या लोकांच्या जीवनात अशा परिस्थितीत अनेक प्रकारच्या समस्या उद्भवू शकतात. जीवनात आनंद आणि शांतीचा अभाव राहील. तुम्हाला शारीरिक आणि मानसिक ताणतणावाचा सामना करावा लागू शकतो. यासोबतच, कोणत्याही कामाच्या ठिकाणी स्वतःच्या कामाकडे लक्ष द्या. दुसऱ्याच्या गोष्टीत ढवळाढवळ करणे टाळा. कारण यामुळे तुमचेच नुकसान होऊ शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना भरपूर नफा मिळू शकतो. मात्र पैशांशी संबंधित कोणताही निर्णय काळजीपूर्वक विचार करून घ्या. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच, कौटुंबिक बाबींमुळे तुम्हाला थोडा ताण जाणवेल.
सिंह रास
ज्योतिषशास्त्रानुसार या राशीत शनि प्रवेश करताच कंटक शनीचे त्रास देखील सुरू होतात. सिंह राशीच्या आठव्या घरात पिशाच योग तयार होत आहे. अशा परिस्थितीत या राशीच्या लोकांनी त्यांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे. कोणताही जुना आजार पुन्हा उद्भवू शकतो. अनावश्यक खर्च टाळा कारण तुम्ही कर्जात अडकू शकता. न्यायालयीन प्रकरणांमध्येही काही समस्या उद्भवू शकतात. खर्चात अनपेक्षित वाढ होऊ शकते. कामाच्या ठिकाणी काही चढ-उतार येतील. पण जर तुम्ही कठोर परिश्रम केले, तर तुम्हाला नक्कीच यश मिळेल.
वृषभ रास
जेव्हा २९ मार्च रोजी शनिदेवाचे संक्रमण होईल, तेव्हा वृषभ राशीच्या लोकांच्या पाचव्या घरात शनिदेवाचा पिशाच योग तयार होईल. अशा परिस्थितीत, पोटाशी संबंधित काही आजार या राशीच्या लोकांना त्रास देऊ शकतात. मानसिक ताणामुळे तुमची बुद्धी गोंधळून जाऊ शकते. त्यामुळे मानसिक थकवा आणि ताण जाणवेल. एखाद्या गोष्टीवरून मित्र किंवा नातेवाईकांशी मतभेद होऊ शकतात. अशा परिस्थितीत मुलांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. विद्यार्थ्यांनीही थोडे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)