AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Solar Eclipse 2024 : या तारखेला दिसणार 2024 चे पहिले सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण

येत्या काही दिवसांत नवीन वर्षाला सुरूवात होणार आहे. जोतिषशास्त्र आणि खगोलशास्त्रात ग्रहणाला विशेष महत्त्व आहे. येणाऱ्या 2024 वर्षात सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण कधी होणार आहे ते जाणून घेऊया तसेच ग्रहण काळात अन्नामध्ये तुळस का टाकले जाते हे देखील जाणून घेउया.

Solar Eclipse 2024 : या तारखेला दिसणार 2024 चे पहिले सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण
सूर्य ग्रहणImage Credit source: Solar Eclipse
Follow us
| Updated on: Dec 07, 2023 | 5:40 PM

मुंबई : दरवर्षी अनेक सूर्यग्रहण (Solar Eclipse 2024) आणि चंद्रग्रहण होतात. हे ग्रहण अनेक देशांमध्ये दिसतात आणि अनेक देशांमध्ये दिसत नाहीत. भारतात ग्रहणाचे ज्योतिषशास्त्रीय महत्त्व मानले जाते. सूर्य आणि चंद्रग्रहणाचा शुभ आणि अशुभ प्रभाव राशींवर दिसून येतो. ज्या लोकांच्या कुंडलीत नकारात्मक प्रभाव दिसतो त्यांना अनेक प्रकारचे नुकसान सहन करावे लागते. ज्या लोकांच्या कुंडलीत त्याचे सकारात्मक परिणाम होतील त्यांना खूप फायदा होईल. अशा परिस्थितीत, आज आम्ही तुम्हाला येत्या वर्षात सूर्य आणि चंद्रग्रहण कधी दिसणार आहे हे सांगणार आहोत. यासोबतच हे ग्रहण भारतात दिसणार की नाही हे देखील सांगणार आहोत.

2024 मध्ये होणार्‍या ग्रहणांची यादी

पहिले ग्रहण

नवीन वर्षात म्हणजे 2024 मध्ये, पहिले चंद्रग्रहण नेहमीप्रमाणे पौर्णिमा तिथीला, सोमवार, 25 मार्च 2024 रोजी दिसणार आहे.

दुसरे ग्रहण

पुढील वर्षातील दुसरे सूर्यग्रहण सोमवार, 8 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. हे चंद्रग्रहण अवघ्या १४ दिवसांनी दिसणार आहे.

हे सुद्धा वाचा

तिसरे ग्रहण

2024 वर्षातील तिसरे ग्रहण हे चंद्रग्रहण असणार आहे जे बुधवार, 18 सप्टेंबर 2024 रोजी दिसणार आहे. हे ग्रहण केवळ अर्धवट राहील. हे चंद्रग्रहण या वर्षातील दुसरे आणि शेवटचे चंद्रग्रहण असेल.

चौथे ग्रहण

येत्या वर्षातील चौथे आणि शेवटचे ग्रहण 2 ऑक्टोबर 2024 रोजी म्हणजेच बुधवारी होणार आहे. या वर्षी हा निव्वळ योगायोग आहे की मागील सूर्यग्रहणाप्रमाणेच सूर्यग्रहण देखील 14 दिवसांनी होणार आहे.

या कारणांमुळे ग्रहण काळात अन्नपदार्थांमध्ये तुळशीची पाने टाकली जातात

तुळशीच्या पानांबाबत अशी एक धार्मिक धारणा आहे की ज्या वस्तूंमध्ये तुळशीची पाने पडतात त्यांचा कोणताही वाईट परिणाम होत नाही. तुळशीला अशुद्धतेचा नाश करणारा मानला जातो, म्हणून ज्यामध्ये तुळशीचे एक पान देखील असते अशी कोणतीही गोष्ट अशुद्ध असू शकत नाही.

दुसरीकडे, जर आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाबद्दल बोललो, तर तुळशीच्या पानांमध्ये पारा आणि आर्सेनिक गुणधर्म असतात, जे वातावरणात उपस्थित असलेल्या नकारात्मक किरणांच्या प्रभावामुळे गोष्टी दूषित होऊ देत नाहीत. आयुर्वेदात तुळशीला अँटी-बॅक्टेरियल मानले जाते. अशा परिस्थितीत तुळशीची पाने अन्नपदार्थांचे वातावरणात उपस्थित असलेल्या बॅक्टेरिया इत्यादींच्या प्रभावापासून संरक्षण करतात.

सुतकातील हे नियम लक्षात ठेवा

  • सुतक काळात पूजा करण्यास मनाई आहे, तथापि, मानसिक जप करता येतो.
  • या काळात गर्भवती महिलांना कात्री, चाकू, मशीन, सुया इत्यादी कोणत्याही धारदार वस्तू वापरण्यास मनाई आहे.
  • सुतक लावल्यापासून ग्रहणकाळापर्यंत गरोदर स्त्रियांना घराबाहेर पडण्यास मनाई आहे. हे असे आहे की मुलावर हानिकारक किरणांचा प्रभाव पडत नाही.
  • सुतक काळाच्या सुरुवातीपासून ते ग्रहण कालावधी संपेपर्यंत अन्न शिजवून खाणे वर्ज्य आहे. तथापि, वृद्ध आणि गर्भवती महिलांसाठी खाण्यापिण्यावर कोणतेही बंधन नाही.
  • सर्व खाद्यपदार्थांमध्ये तुळशीची पाने टाकण्याचा सल्ला दिला जातो. सुतक सुरू होण्यापूर्वी तुळशीची पाने घालून वस्तू झाकून ठेवाव्यात.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही
नागरिकांची पाकिस्तानात परतण्याची इच्छा नाही.
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध
वक्फ बोर्ड कार्यालयाच्या कामाला इम्तियाज जलील यांचा विरोध.
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?
आजही धास्ती, रायफलधारी लोक डोळ्यासमोर..जगदाळे कुटुंबीयांची मागणी काय?.
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त
देवेन भारती मुंबईचे नवे पोलिस आयुक्त.
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना....
पाकचं सोंग पडलं उघडं, जगासमोर पुन्हा तोंडघशी, मदतीचे हात पसरताना.....
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News...
मुख्यमंत्र्यांचा 'वर्षा'वर प्रवेश अन् लेकीबद्दलही दिली Good News....